शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चोंडीतील धनगर आरक्षण! २१ व्या दिवशी उपोषण सुटले; मंत्री गिरीश महाजनांनी मागितला ५० दिवसांचा वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 18:32 IST

मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दुपारी चौंडीत येत उपोषणकत्यांशी चर्चा केली.  

 अशोक निमोणकर

चोंडी (अहमदनगर) : धनगर आरक्षण देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही ५० दिवसात पूर्ण करण्यात येईल, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. त्यानंतर गत २० दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मंगळवारी, आज २१ व्या दिवशी सुटले. 

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी जामखेड तालुक्यातील चोंडी येथे  यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे, प्रदेश सरचिटणीस  सुरेश बंडगर, माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रुपनवर, गोविंद नरवटे, समाधान पाटील, नितीन धायगुडे, किरण घालमे, बाळा गायके हे ६ सप्टेंबरपासून उपोषणाला बसले होते. 

मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दुपारी चौंडीत येत उपोषणकत्यांशी चर्चा केली.  २१ सप्टेंबरला सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत चर्चेअंती एकमताने निर्णय घेतले आहेत. या बैठकीला यशवंत सेनेचे शिष्टमंडळ उपस्थित होते.  आरक्षणासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यात आला.  आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला.  आरक्षणासाठी अभ्यास करण्यासाठी  उच्च न्यायालयाचे निवृत्त  न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. या समितीमध्ये धनगर समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल.  आरक्षणाबाबतची ही कार्यवाही ५० दिवसात पूर्ण करण्याबाबत निर्णय झाला. त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती महाजन यांनी केली. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGirish Mahajanगिरीश महाजनDhangar Reservationधनगर आरक्षण