शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 14:51 IST

Devendra Fadnavis : आमच्या लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिला आहे.

प्रशांत शिंदे

अहमदनगर - विरोधी पक्षाचे नेते सत्तेत आले तर लाडकी बहीण योजना बंद करणार आहेत. एक नेते म्हणाले, पंधराशे रुपयांत काय होतं पण तुम्ही चाळीस वर्षे राज्य केलं. फुटकी कवडी तरी बहिणींना दिली का? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांना पंधराशे रुपयांचे मोल समजू शकत नाही. खबरदार, आमच्या लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिला आहे.

शिर्डीत 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' लाभार्थी सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार अशुतोष काळे, माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते.

ते पुढं म्हणाले, लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते उभा राहून म्हणायचे फसवणूक केली जातीय, पैसे देता येणार नाही, पैसे पोहोचणार नाही, हे खोटं बोलत आहेत, ही लाच आहे. परंतु आज राज्यातील एक कोटी ९० लाख महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर केली.

तुम्हाला तुमच्या काही सावत्र भावांपासून सावध करायचे आहे. आम्ही योजना सुरु केल्यानंतर काही सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागले. नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार उच्च न्यायालयात गेले. त्यांनी कोर्टात सांगितले की लाडकी बहिणी योजना, मोफत शिक्षण योजना, पिंक रिक्षा योजना, मोफत सिलिंडरची योजना, अशा योजनांमुळे पैशांचा चुराडा होतो आहे. त्यामुळे या सगळ्या योजना स्थगीत करा, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केला.

ते पुढं म्हणाले, आम्ही मोठा वकील उभा केला आणि योजनांवर स्थगिती येऊ दिली नाही. पण सावत्र भावांची नियत बघा. कालपरवा आदित्य ठाकरे म्हणाले, आमचे सरकार येऊ द्या, महायुतीच्या सरकारने घेतलेले सर्व निर्णय आम्ही रद्द करुन टाकू. म्हणजे यांच्या डोक्यात सरकार आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करायाचा विचार आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे म्हणाल्या लाडकी बहीण योजना म्हणजे बहिणींना दिलेली लाच आहे. अरे काही बोलताना शरम करा. हा पैसा कोणाच्या बापाचा पैसा नाही, सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे. त्यांचेच पैसे आम्ही बहिणींच्या खात्यात टाकतोय तर आमच्या बहिणींना लाचखोर म्हणायचा अधिकार आहे का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर