शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

मनपाचा विकासकामांचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST

अहमदनगर: कोरोनामुळे केला गेलेला लॉकडाऊन, पावसाळा आणि अमृत भुयारी गटार योजनेचे रखडलेले काम, यामुळे महापालिकेची कामे थांबली होती. ही ...

अहमदनगर: कोरोनामुळे केला गेलेला लॉकडाऊन, पावसाळा आणि अमृत भुयारी गटार योजनेचे रखडलेले काम, यामुळे महापालिकेची कामे थांबली होती. ही कामे आता सुरू झाली असून, विकासकामांचा धडाका सध्या शहरात सुरू आहे.

शासनाच्या जिल्हास्तर, नगरोत्थान, रस्ते विकास, दलित वस्ती सुधार योजना, दलितेत्तर आदी योजनेंतर्गत महापालिकेला मोठा निधी प्राप्त झाला होता; परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन केला गेला. लॉकडाऊनच्या काळात मजुरांअभावी रस्ते व गटारीची कामे पूर्णपणे बंद होती. त्यामुळे मागील मार्च महिन्यात कामे सुरू नव्हती. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. त्यामुळे ठेकेदारांनी कामे सुरू केली असून, ती वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. त्यात महापालिकेच्या चालू वर्षातील अंदाजपत्रकात प्रस्तावित असलेल्या कामांचे अंदाजपत्रक तयार करणे, निविदा प्रसिद्ध करणे, तांत्रिक मंजुरी घेऊन काम सुरू करण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. अंदाजपत्रकातील लेखाशीर्षकामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत, त्यापैकी ५० टक्के निधी खर्चालाच फक्त मंजुरी आहे. एका प्रभागात चार नगरसेवक आहेत. त्यामुळे प्रभागात अधिकाधिक कामे मंजूर करून घेण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. प्रभागातील सर्वाधिक कामे रस्ते व गटारीची आहेत. ही कामे ठेकेदारांनी सुरू केली असून, या कामांचा शुभारंभ नगरसेवकांच्या उपस्थित होत आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये एकप्रकारे विकासकामांचा शुभारंभ करण्याची स्पर्धा सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.

...

एकाचवेळी सर्व कामे सुरू

लॉकडाऊनमुळे गेल्या मार्चपासून विकासकामे ठप्प होती. गेल्या वर्षभरापासून बंद असलेली कामे एकाचवेळी सुरू झाली असून,सध्या सर्वत्र रस्ते खाेदून ठेवण्यात आले आहेत. रस्ते व गटारींची कामे आहेत. नारळ वाढवून ही कामे सुरू करण्यात येत आहेत.