शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

अधिका-यांनी मनावर घेतल्यास विकास होतो - राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 17:37 IST

नगर शहरात कृषी महोत्सवाचे उद्घाटन

अहमदनगर : गेल्या तीन वर्षांत केंद्र व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी विविध योजना आणल्या. या सर्वच योजना जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. या योजना राबविण्यासाठी प्रशासनाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे अधिका-यांनी मनावर घेतल्यास विकास झाल्याशिवाय राहात नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.नगर शहरातील तांबटकर मळा येथील मैदानावर जिल्हा प्रशासन, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने आयोजित अहमदनगर जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार दिलीप गांधी होते.पालकमंत्री शिंदे म्हणाले, गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान आणले आहे. देशाला व राज्याला जिल्हा मार्गदर्शक ठरत आहे. शेतक-यांसाठी विविध कृषी विषयक योजना, उपक्रमांची माहिती, अद्ययावत कृषी तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण प्रयोगशील शेतक-यांचे अनुभव, मार्गदर्शन या महोत्सवाच्या माध्यमातून शेतक-यांना उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून शेतक-यांच्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करू न दिली आहे. जिल्ह्याने जलयुक्त शिवार अभियान अतिशय चांगल्या प्रकारे राबविले. त्यामुळे मार्च महिन्यातही शिवारात पाणी दिसत असून, टँकरची मागणी एकाही गावातून नाही. हे यश शेतक-यांचे आहे. ठिबक सिंचन योजनेसाठी केंद्र शासनाचे १० कोटी रुपयांचे अनुदान जिल्ह्यासाठी आणले आहे. दिवसेंदिवस सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती करताना उत्पादन कमी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भाऊसाहे ब-हाटे यांनी कृषी महोत्सव आयोजनामागील भूमिका मांडली.याप्रसंगी महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, सभापती अजय फटांगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनाधिकारी कीर्ती जमदाडे-कोकाटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी, युवराज शेळके आदींची यावेळी उपस्थित होते.

आरोग्यपत्रिकेचे व्हावे योग्य मार्गदर्शन

शेतक-यांना कृषी विभागाकडून जमिनीची आरोग्यपत्रिका दिली जाते. मात्र आरोग्यपत्रिकेबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आवश्यक नसतानाही रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. यापुढील काळात आरोग्यपत्रिकेबाबत कृषी विभागाने शेतक-यांना मार्गदर्शन करावे, असेही राम शिंदे म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदे