शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
2
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
3
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
4
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
5
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
6
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
7
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
8
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
9
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
10
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
11
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
12
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
13
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
14
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
15
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
16
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
17
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
18
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
19
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
20
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची नकारघंटा

By admin | Updated: April 10, 2023 20:49 IST

साहेबरराव नरसाळे , अहमदनगर पहिलीच्या प्रवेशासाठी डोनेशन भरा, शिफारसपत्र द्या आणि मग मुलाखतीला या, असा फंडा जिल्ह्यातील शाळांमध्ये राबविण्यात येत आहे़

 साहेबरराव नरसाळे , अहमदनगर पहिलीच्या प्रवेशासाठी डोनेशन भरा, शिफारसपत्र द्या आणि मग मुलाखतीला या, असा फंडा जिल्ह्यातील शाळांमध्ये राबविण्यात येत आहे़ बालशिक्षण हक्क कायद्यानुसार मागासवर्गातील २५ टक्के मुलांना प्रवेश देणे सरकारने सक्तीचे केले आहे़ मात्र, हा नियम खुलेआम पायदळी तुडविला जात आहे़ मात्र, याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही, असे सांगून शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांनी कानावर हात ठेवले आहे़ विशेष म्हणजे, पहिलीला प्रवेश मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे यांची शिफारसपत्रे घेतली जात असून, जिल्ह्यात फक्त ९ टक्के विद्यार्थ्यांनाच आरक्षणानुसार प्रवेश देण्यात आला आहे़ अनुसूचित जाती-जमाती, अपंग, बहुविकलांग आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना जवळच्या शाळेत प्रवेश मिळावा आणि शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून बालशिक्षण हक्क कायदा लागू केला़ या कायद्याची अंमलबजावणी २००९ पासून करण्यात येत आहे़ विनाअनुदानित अल्पसंख्याक शाळा, सीबीएसई शाळा आणि सरकारी शाळा वगळता इतर सर्व शाळांना २५ टक्के आरक्षणानुसार प्रवेश राबविण्याची सक्ती करण्यात आली आहे़ मात्र, जिल्ह्यातील शाळांनी या कायद्याची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष केले आहे़ पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी अनेक शाळांनी पालकांच्या मुलाखती, डोनेशन घेण्यावर धडाका लावला आहे़ प्रतिष्ठित शाळांमध्ये पहिलीच्या प्रवेशासाठी थेट आमदार, खासदार आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची शिफारस मागितली जात आहे़ त्यासाठी अनेक पालकांनी अशी शिफारसपत्रे मिळविण्यासाठी धडपड चालविली आहे़ डोनेशन भरा, शिफारसपत्र द्या आणि मग मुलाखतीला या, असा हा फंडा पहिलीच्या प्रवेशासाठी राबविला जात आहे़ विशेष म्हणजे ही प्रवेश प्रक्रिया खुलेआम राबविली जात आहे़ तरीही शिक्षण विभागाला याबाबत काहीच माहिती नाही़ मात्र, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे शाळा प्रवेशासाठी धडाधड शिफारसपत्रांचे वाटप करीत आहेत़ या शिफारसपत्रांवरुन मुलांना शाळेमध्ये प्रवेशही मिळतो़ मात्र, २५ टक्के आरक्षणाचा नियम खुलेआम पायदळी तुडविला जातो़ २५ टक्के आरक्षण शाळा प्रवेशाच्या २५ टक्के आरक्षणानुसार अनुसूचित जाती, जमातीतील मुले, सरकारने सूचित केलेले प्रतिकूल परिस्थितील मुले (अपंग व बहुविकलांग मुले), दारिद्य्ररेषेखालील मुले यांना १ किलोमीटरच्या आतील शाळांमध्ये प्रवेश दिला जावा़ आरक्षणातून प्रवेशासाठी २५ टक्केपेक्षा जास्त मुलांनी अर्ज केल्यास चिठ्ठ्या काढून प्रवेश प्रक्रिया राबवावी़ प्रवेश प्रक्रियेसाठी कोणतेही डोनेशन, पालकांच्या मुलाखती, चाचणी किंवा पडताळणी, लेखी किंवा मौखिक परीक्षा घेऊ नये असे सरकारचे आदेश आहेत़ मात्र, हे आदेश पायदळी तुडवून प्रवेश प्रक्रिया राबविली जाते़ शिक्षण विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात २३० प्राथमिक शाळांना २५ टक्के आरक्षणानुसार पहिलीची प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आले आहे़ २५ टक्के आरक्षणानुसार या शाळांमधील प्रवेश क्षमता ४९३४ एव्हढी आहे़ मात्र, आतापर्यंत केवळ ५१४ (मुले-२९५ व मुली-२१९) विद्यार्थ्यांना आरक्षणानुसार प्रवेश दिला आहे़ हे प्रमाण फक्त ९़६ टक्के एवढेच आहे़