शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोदी सरकारकडून लोकशाही पायदळी : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 10:36 IST

लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या साडेचार वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहे.

राळेगणसिद्धी : लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या साडेचार वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहे. सर्वोच्च न्यायालय, लोकसभा, राज्यसभा अशा संवैधानिक संस्थांच्या निर्णयाचे पालनही ते करीत नाहीत. त्यामुळे या सरकारची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हा लोकशाहीसाठी मोठा धोका आहे, अशा तीव्र शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर टीका केली.अण्णा हजारे हे महात्मा गांधी पुण्यतिथीपासून (३० जानेवारी )लोकपाल, लोकायुक्त कायदा, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी राळेगणसिद्धी येथे उपोषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना बुधवारी पत्र पाठवून आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, देशात वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी २०११ साली कोट्यवधी जनता रस्त्यावर उतरली. त्यानंतरही वेळोवेळी आंदोलनानंतर २० डिसेंबर २०१३ रोजी लोकपाल,लोकायुक्त कायदा मंजूर झाला. भाजपचे सरकार केंद्रात मे २०१४ मध्ये सत्तेत आले. त्यानंतर लोकपाल, लोकायुक्त कायद्याची तत्काळ अंमलबजावणी गरजेची होती. २०१९ मध्ये केंद्र सरकारला सत्तेत येऊन पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याची वेळ आली.तरीही या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने फटकारले तरीही सरकार लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करायला तयार नाही. सर्वोच्च न्यायालयासारख्या संविधानिक संस्थांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करणारे सरकार हे लोकशाही सरकार आहे काय?असा प्रश्न उपस्थितहोतो.आपले सरकार महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना मानते. परंतु या महान नेत्यांनी सत्याचा जीवनात अंगीकार केला होता, त्या सत्याकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. सरकारने वेळोवेळी खोटे बोलणे सहन होऊ शकत नाही. त्यामुळे, महात्मा गांधी पुण्यतिथीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण आंदोलन करणार आहे, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.लोकपाल,लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीचे मतदारांना दिलेले आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाळले नाही. सत्तेत येण्यापूर्वी मोदी हे समाज व देशाची सेवा करतील असे वाटत होते. परंतु, देशासाठी खरा नेता मिळाला नाही. सत्तेसाठी सत्य सोडण्यामुळे माझा मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास उडाला आहे. - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे