शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

मोदी सरकारकडून लोकशाही पायदळी : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 10:36 IST

लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या साडेचार वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहे.

राळेगणसिद्धी : लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या साडेचार वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहे. सर्वोच्च न्यायालय, लोकसभा, राज्यसभा अशा संवैधानिक संस्थांच्या निर्णयाचे पालनही ते करीत नाहीत. त्यामुळे या सरकारची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हा लोकशाहीसाठी मोठा धोका आहे, अशा तीव्र शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर टीका केली.अण्णा हजारे हे महात्मा गांधी पुण्यतिथीपासून (३० जानेवारी )लोकपाल, लोकायुक्त कायदा, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी राळेगणसिद्धी येथे उपोषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना बुधवारी पत्र पाठवून आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, देशात वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी २०११ साली कोट्यवधी जनता रस्त्यावर उतरली. त्यानंतरही वेळोवेळी आंदोलनानंतर २० डिसेंबर २०१३ रोजी लोकपाल,लोकायुक्त कायदा मंजूर झाला. भाजपचे सरकार केंद्रात मे २०१४ मध्ये सत्तेत आले. त्यानंतर लोकपाल, लोकायुक्त कायद्याची तत्काळ अंमलबजावणी गरजेची होती. २०१९ मध्ये केंद्र सरकारला सत्तेत येऊन पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याची वेळ आली.तरीही या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने फटकारले तरीही सरकार लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करायला तयार नाही. सर्वोच्च न्यायालयासारख्या संविधानिक संस्थांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करणारे सरकार हे लोकशाही सरकार आहे काय?असा प्रश्न उपस्थितहोतो.आपले सरकार महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना मानते. परंतु या महान नेत्यांनी सत्याचा जीवनात अंगीकार केला होता, त्या सत्याकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. सरकारने वेळोवेळी खोटे बोलणे सहन होऊ शकत नाही. त्यामुळे, महात्मा गांधी पुण्यतिथीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण आंदोलन करणार आहे, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.लोकपाल,लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीचे मतदारांना दिलेले आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाळले नाही. सत्तेत येण्यापूर्वी मोदी हे समाज व देशाची सेवा करतील असे वाटत होते. परंतु, देशासाठी खरा नेता मिळाला नाही. सत्तेसाठी सत्य सोडण्यामुळे माझा मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास उडाला आहे. - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे