शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

मनाची प्रसन्नता आणि संस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:47 IST

मनाची प्रसन्नता ही संस्कार, दिनचर्या यावर आपले आदर्श जीवन अवलंबून असते. आपण सतत द्वेषमूलक वातावरणात मन प्रसन्न रहाणार नाही. मुले हे अनुकरण प्रिय असतात.

अध्यात्म/ राधेश्याम कुलकर्णी / मनाची प्रसन्नता ही संस्कार, दिनचर्या यावर आपले आदर्श जीवन अवलंबून असते. आपण सतत द्वेषमूलक वातावरणात मन प्रसन्न रहाणार नाही. मुले हे अनुकरण प्रिय असतात. सर्वात प्रथम ते आपल्या आई, वडिलांच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण करतात. त्याप्रमाणे अनुकरण करतात. त्यानंतर शिक्षकांचे अनुकरण करतात. त्यामुळे केवळ उपदेशाने संस्कार घडत नाहीत तर त्यांच्या समोर आदर्श असायला हवे आहेत. मनाला चांगल्या सवयी, संस्कार होण्यासाठी फार काही अवडंबर करण्याची आवश्यकता नसते. मात्र दुष्परिणाम करणा-या गोष्टींचा प्रयत्नपूर्वक त्याग करण्याचा मनाचा निग्रह व चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा आग्रह म्हणजे संस्कार. करिअरच्या स्पर्धेच्या काळात सहज संस्कार कसे घडवता येतील, या बाबत जागृत राहण्याची जबाबदारी  पालक व शिक्षक यांच्यावर येते. कुटुंबात मुलांशी संवाद, आदर्श व्यक्तिंचे चरित्र गोष्टी त्यांना सांगणे, एकत्रित भोजन, नियमित संस्कारक्षम पाठांतर हसत खेळत करुन घेणे यामुळे सहज संस्कार होतात. त्यातून मनप्रसन्नतेची अनुभूती घेता येते.  चांगल्या सवयी जर का मनाला लावल्या तर ते त्यापासून दूर जात नाहीत. मग त्या मनाची प्रसन्नता घालविण्यासाठी कुठल्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तरी फरक पडत नाही. समर्थ रामदासांनी मनोबोध किंवा मनाचे श्लोकाव्दारे मनावर संस्कार कसे व्हावेत, याचा वस्तूपाठच सांगितला आहे.मना वासना दृष्टकामा नये रे मना सर्वथा पापबुध्दी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडूनी द्यावा मना सत्यसंकल्प जीवी धरावा, धावत्या युगात आई, वडिल, शिक्षक, सर्वांनाच स्वत:चे मन व्यवस्थापन सांभाळीत पिढी घडवण्याचे आव्हान आहे. त्यासाठी आपल्या व मुलांच्या करिअरमधील थोडा दैनंदिन वेळ संस्कारासाठी काढावा लागेल. संत चरित्र, राष्ट्रपुरुषांचे चरित्र, आदर्श कथा मुलांना सांगव्या लागतील त्या सांगण्यासाठी आपल्याला वाचाव्या लागतील. एक उपक्रम देखील राबवता येऊ शकतो. सेवानिवृत्त, अनुभवी, वेळ उपलब्ध असलेल्या बंधू भगीनिंनी  आपल्या परिसरातील लहानग्यांना एकत्रित करुन रोज किंवा साप्ताहिक एक तासाचा विनामूल्य संस्कार वर्ग सुरू केल्यास नातवंडांवर संस्कार करीत आपले आयुष्य हसरे करता येईल. आयुष्यात प्रत्येकाला यशस्वी व्हायचय हे खरं. प्रत्येकाच्या यशाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. परंतु सर्वांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एक मध्यम मार्ग समर्थांनी सांगितला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिकcultureसांस्कृतिक