शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

बहिरोबाडीत ऊस न घेण्याचा निर्णय

By admin | Updated: October 4, 2016 00:42 IST

कर्जत : सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी पावसाने कर्जत तालुक्यात सरासरी ओलांडली. समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला. जलयुक्त शिवारच्या कामांचा कर्जतकरांना फायदा झाला.

कर्जत : सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी पावसाने कर्जत तालुक्यात सरासरी ओलांडली. समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला. जलयुक्त शिवारच्या कामांचा कर्जतकरांना फायदा झाला. सतत दुष्काळाने पिचलेला हा तालुका यावर्षी दुष्काळमुक्त झाला. कर्जतच्या स्मशानभूमीला पाण्याने वेढले आहे. दिघी येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत पडली. राक्षसवाडी खुर्द येथील कर्जत श्रीगोंदा रस्त्यावरील लोहकरा नदीवरील पूल वाहून गेला. यामुळे या भागाचा श्रीगोंद्याशी संपर्क तुटला. बहिरोवाडीच्या शेतकऱ्यांनी गेल्या सात वर्षांचा दुष्काळ हटल्यानंतर आता पाणी जपून वापरत ऊस पीक न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.सरासरीच्या १२२ टक्के पाऊस झाला. सात वर्षानंतर प्रथमच तालुक्यातील नद्या, ओढे वाहत आहेत. सुरू असलेल्या पावसामुळे नद्या वाहू लागल्या आहेत. तालुक्यातील थेरवडी, दुरगाव, बहिरोबावाडी, गायकरवाडी,आळसुदा येथील तलाव भरुन वाहात आहेत. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे कर्जत परिसरातील दोन्ही नद्यांना पाणी आले आहे. या नद्यांवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. नदी व बंधाऱ्यांमधील पाणी पाहण्यासाठी सोमवारी सकाळी कर्जतकरांनी मोठी गर्दी केली होती. अचुक हवामान वर्तविणारे प्रकाश यादव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच बळीराम यादव,प्रभाकर लाळगे, रामेश्वर तोरडमल, नितीन तोरडमल,संदीपान तोरडमल,ज्ञानेश्वर यादव आदी हजर होते. बहिरोबावाडी तलाव सात वर्षानंतर प्रथमच भरला. या पाण्याचे जलपूजन ग्रामस्थांनी केले. यावेळी येथील ग्रामस्थांनी गेली सात वर्षे सततचा दुष्काळ केल्यानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला़