शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

बहिरोबाडीत ऊस न घेण्याचा निर्णय

By admin | Updated: October 4, 2016 00:42 IST

कर्जत : सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी पावसाने कर्जत तालुक्यात सरासरी ओलांडली. समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला. जलयुक्त शिवारच्या कामांचा कर्जतकरांना फायदा झाला.

कर्जत : सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी पावसाने कर्जत तालुक्यात सरासरी ओलांडली. समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला. जलयुक्त शिवारच्या कामांचा कर्जतकरांना फायदा झाला. सतत दुष्काळाने पिचलेला हा तालुका यावर्षी दुष्काळमुक्त झाला. कर्जतच्या स्मशानभूमीला पाण्याने वेढले आहे. दिघी येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत पडली. राक्षसवाडी खुर्द येथील कर्जत श्रीगोंदा रस्त्यावरील लोहकरा नदीवरील पूल वाहून गेला. यामुळे या भागाचा श्रीगोंद्याशी संपर्क तुटला. बहिरोवाडीच्या शेतकऱ्यांनी गेल्या सात वर्षांचा दुष्काळ हटल्यानंतर आता पाणी जपून वापरत ऊस पीक न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.सरासरीच्या १२२ टक्के पाऊस झाला. सात वर्षानंतर प्रथमच तालुक्यातील नद्या, ओढे वाहत आहेत. सुरू असलेल्या पावसामुळे नद्या वाहू लागल्या आहेत. तालुक्यातील थेरवडी, दुरगाव, बहिरोबावाडी, गायकरवाडी,आळसुदा येथील तलाव भरुन वाहात आहेत. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे कर्जत परिसरातील दोन्ही नद्यांना पाणी आले आहे. या नद्यांवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. नदी व बंधाऱ्यांमधील पाणी पाहण्यासाठी सोमवारी सकाळी कर्जतकरांनी मोठी गर्दी केली होती. अचुक हवामान वर्तविणारे प्रकाश यादव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच बळीराम यादव,प्रभाकर लाळगे, रामेश्वर तोरडमल, नितीन तोरडमल,संदीपान तोरडमल,ज्ञानेश्वर यादव आदी हजर होते. बहिरोबावाडी तलाव सात वर्षानंतर प्रथमच भरला. या पाण्याचे जलपूजन ग्रामस्थांनी केले. यावेळी येथील ग्रामस्थांनी गेली सात वर्षे सततचा दुष्काळ केल्यानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला़