शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

दीनमित्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 11:48 IST

दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचा १३३ वा जयंतीदिन गुरुवारी (दि़ २०) पार पडला़

अहमदनगर : दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचा १३३ वा जयंतीदिन गुरुवारी (दि़ २०) पार पडला़ पत्रकार, साहित्यिकांच्या गौरवार्थ आज, रविवारी नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात विशेष सोहळा होत आहे़ त्यानिमित्ताने दीनमित्रकारांच्या लोकोत्तर कार्याचे स्मरण करणारा हा विशेष लेख......नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तरवडी हे छोटस खेडेगाव़ सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांची कर्मभूमी म्हणून स्वातंत्र्य पूर्वकाळापासून हे गाव देशभर परिचित होतं़ ‘दीनमित्र’मधून मुकुंदरावांनी १०० वर्षापूर्वी मांडलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात़ त्यांचे विचार शेतकरी वर्गास नवी उमेद देतात तर राज्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. दीनमित्रकार मुकुंदराव हे उत्तम साहित्यिकही होते. वैचारीक व वृत्तपत्रीय लिखाणासोबतच त्यांनी कादंबरी, खंडकाव्ये, विडंबन व विनोदी वाङमय, लघुकथा, चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या़ तसेच ४०० हून अधिक प्रसंगकथाही लिहिल्या.तरवडीसारख्या खेड्यात १९१० मध्ये सुरू केलेले दीनमित्र हे साप्ताहिक पुढे ५७ वर्षे सातत्त्याने त्यांनी चालवले. दीनमित्रात सुमारे २७५० अग्रलेख व ७ हजार स्फुटे त्यांनी लिहिली. त्यामुळेच मराठी साहित्यासह वृत्तपत्रीय क्षेत्राच्या इतिहासात दिनमित्रकारांचे नाव अग्रभागी आहे. दीनमित्राची दखल डॉ़ बाबासाहेब आंबेडकर व राजश्री छत्रपती शाहू महाराजांनीही घेतली़ याचे ऐतिहासिक पुरावेही उपलब्ध आहेत. कृष्णराव भालेकर यांच्या निधनानंतर मुकुंदरावांनी दीनमित्र हे साप्ताहिक तरवडीत सुरू केलं आणि चालवलंदेखील.महात्मा फुलेंनंतर सत्यशोधकी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी दीनमित्र व मुकुंदरावांनी मौलिक काम केलं. जातीयता, अंधश्रद्धा, शेतकऱ्यांचे प्रश्न, निरक्षरता यावर मुकुंदरावांनी त्यांच्या लेखणीतून सतत कोरडे ओढल्याचे दिसते. ‘आसुडाचे फटके’ या सदरातून त्यांनी ढोंगी उच्चवर्णीयांवरही प्रहार केले.महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाला दिलेले तत्वज्ञान समाजातील सर्वस्तरात पोहचविण्याचे काम मुकुंदरावांनी ‘दिनमित्र’च्या माध्यमातून केलं. सामाजिक व धार्मिक गुलामगिरीत जखडलेल्या बहुजन समाजाची विचारशक्ती जागवून त्यांच्यात लढाऊ वृत्ती निर्माण करण्याच श्रेयही ‘दीनमित्र’कडेच जातं. धर्म व जातीच्या बंधनातून मुक्त असलेला संपादक कसे विचार पेरू शकतो, हेच ‘दीनमित्रा’तून दिसतं. ग्रामीण भागात असूनही प्रबोधनाची मशाल मुकुंदरावांनी तेवत ठेवली.‘दीनमित्र’ छापण्यासाठी मुकुंदरावांनी त्यांच्या शेतात टाकलेला छापखाना नगरच्या ऐतिहासिक वस्तु संग्रहालयात शीळाप्रेसच्या स्वरूपात जतन करून ठेवण्यात आलेला आहे. मुकुंदरावांच्या निधनानंतर त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी तरवडीत दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीची स्थापना करण्यात आलेली असून मुकुंदरावांचे साहित्य, ‘दीनिमत्र’चे अंक, १८८८ पासूनचे पत्रव्यवहारही जतन करण्यात आलेला आहे.इंग्रजांनी केला दंडदीनमित्रचा छापखाना बिगरशेती जागेत नसल्याने इंग्रज सरकारने या छापखान्यावर जप्ती आणत ७५० रुपये दंड केला होता़ मात्र छत्रपती शाहू महाराजांनी तो दंड भरला़ तसेच मुकुंदरावांना प्रत्यक्ष भेटीचेही निमंत्रण दिले. मुकुंदरावांच्या लग्नात छत्रपती शाहू महाराजांनी पाठवलेल्या फेट्यात अडीच तोळे सोने तर पैठणीत शंभर ग्रॅम चांदी निघाली. मुकुंदरावांच्या एका काव्यग्रंथावरून गदारोळ झाला होता. त्यातून त्यांच्यावर पुण्याच्या न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला. हे डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांना समजताच त्यांनी त्वरित मुकुंदरावांना तार पाठवून हा खटला लढण्यासाठी वकिल म्हणून मी येऊ शकतो, असे तारेत म्हटले होते़ मात्र पुढे हा खटला तक्रारदारनेच मागे घेतला़ तारेची ती प्रतही जतन करण्यात आलेली आहे.देश-विदेशातील संशोधकांनी लिहिले प्रबंधदीनमित्र व मुकुंदरावांवर आतापर्यंत देश-विदेशातील ३४ संशोधकांनी प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवली आहे़ त्यात कॅलिफॉर्नियाच्या गेल आॅम्वेट व जर्मनीच्या रूझी लँड यांचाही समावेश आहे. ‘दीनमित्र’ने कुलकर्णी यांच्या वतनाबद्दल सातत्याने लिखाण केलं. त्यामुळे त्याकाळी विधिमंडळात मोठा खल झाला़ त्यानंतर कुलकर्णी वतन बंद करण्याचा व तलाठी नेमण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. राज्यातील ही महत्वाची ऐतिहासिक घटना मानली जाते. हा बदल तरवडीतून प्रकाशित झालेल्या दीनमित्राने घडवला.

अनिल गर्जे

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर