शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

दीनमित्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 11:48 IST

दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचा १३३ वा जयंतीदिन गुरुवारी (दि़ २०) पार पडला़

अहमदनगर : दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचा १३३ वा जयंतीदिन गुरुवारी (दि़ २०) पार पडला़ पत्रकार, साहित्यिकांच्या गौरवार्थ आज, रविवारी नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात विशेष सोहळा होत आहे़ त्यानिमित्ताने दीनमित्रकारांच्या लोकोत्तर कार्याचे स्मरण करणारा हा विशेष लेख......नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तरवडी हे छोटस खेडेगाव़ सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांची कर्मभूमी म्हणून स्वातंत्र्य पूर्वकाळापासून हे गाव देशभर परिचित होतं़ ‘दीनमित्र’मधून मुकुंदरावांनी १०० वर्षापूर्वी मांडलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात़ त्यांचे विचार शेतकरी वर्गास नवी उमेद देतात तर राज्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. दीनमित्रकार मुकुंदराव हे उत्तम साहित्यिकही होते. वैचारीक व वृत्तपत्रीय लिखाणासोबतच त्यांनी कादंबरी, खंडकाव्ये, विडंबन व विनोदी वाङमय, लघुकथा, चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या़ तसेच ४०० हून अधिक प्रसंगकथाही लिहिल्या.तरवडीसारख्या खेड्यात १९१० मध्ये सुरू केलेले दीनमित्र हे साप्ताहिक पुढे ५७ वर्षे सातत्त्याने त्यांनी चालवले. दीनमित्रात सुमारे २७५० अग्रलेख व ७ हजार स्फुटे त्यांनी लिहिली. त्यामुळेच मराठी साहित्यासह वृत्तपत्रीय क्षेत्राच्या इतिहासात दिनमित्रकारांचे नाव अग्रभागी आहे. दीनमित्राची दखल डॉ़ बाबासाहेब आंबेडकर व राजश्री छत्रपती शाहू महाराजांनीही घेतली़ याचे ऐतिहासिक पुरावेही उपलब्ध आहेत. कृष्णराव भालेकर यांच्या निधनानंतर मुकुंदरावांनी दीनमित्र हे साप्ताहिक तरवडीत सुरू केलं आणि चालवलंदेखील.महात्मा फुलेंनंतर सत्यशोधकी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी दीनमित्र व मुकुंदरावांनी मौलिक काम केलं. जातीयता, अंधश्रद्धा, शेतकऱ्यांचे प्रश्न, निरक्षरता यावर मुकुंदरावांनी त्यांच्या लेखणीतून सतत कोरडे ओढल्याचे दिसते. ‘आसुडाचे फटके’ या सदरातून त्यांनी ढोंगी उच्चवर्णीयांवरही प्रहार केले.महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाला दिलेले तत्वज्ञान समाजातील सर्वस्तरात पोहचविण्याचे काम मुकुंदरावांनी ‘दिनमित्र’च्या माध्यमातून केलं. सामाजिक व धार्मिक गुलामगिरीत जखडलेल्या बहुजन समाजाची विचारशक्ती जागवून त्यांच्यात लढाऊ वृत्ती निर्माण करण्याच श्रेयही ‘दीनमित्र’कडेच जातं. धर्म व जातीच्या बंधनातून मुक्त असलेला संपादक कसे विचार पेरू शकतो, हेच ‘दीनमित्रा’तून दिसतं. ग्रामीण भागात असूनही प्रबोधनाची मशाल मुकुंदरावांनी तेवत ठेवली.‘दीनमित्र’ छापण्यासाठी मुकुंदरावांनी त्यांच्या शेतात टाकलेला छापखाना नगरच्या ऐतिहासिक वस्तु संग्रहालयात शीळाप्रेसच्या स्वरूपात जतन करून ठेवण्यात आलेला आहे. मुकुंदरावांच्या निधनानंतर त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी तरवडीत दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीची स्थापना करण्यात आलेली असून मुकुंदरावांचे साहित्य, ‘दीनिमत्र’चे अंक, १८८८ पासूनचे पत्रव्यवहारही जतन करण्यात आलेला आहे.इंग्रजांनी केला दंडदीनमित्रचा छापखाना बिगरशेती जागेत नसल्याने इंग्रज सरकारने या छापखान्यावर जप्ती आणत ७५० रुपये दंड केला होता़ मात्र छत्रपती शाहू महाराजांनी तो दंड भरला़ तसेच मुकुंदरावांना प्रत्यक्ष भेटीचेही निमंत्रण दिले. मुकुंदरावांच्या लग्नात छत्रपती शाहू महाराजांनी पाठवलेल्या फेट्यात अडीच तोळे सोने तर पैठणीत शंभर ग्रॅम चांदी निघाली. मुकुंदरावांच्या एका काव्यग्रंथावरून गदारोळ झाला होता. त्यातून त्यांच्यावर पुण्याच्या न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला. हे डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांना समजताच त्यांनी त्वरित मुकुंदरावांना तार पाठवून हा खटला लढण्यासाठी वकिल म्हणून मी येऊ शकतो, असे तारेत म्हटले होते़ मात्र पुढे हा खटला तक्रारदारनेच मागे घेतला़ तारेची ती प्रतही जतन करण्यात आलेली आहे.देश-विदेशातील संशोधकांनी लिहिले प्रबंधदीनमित्र व मुकुंदरावांवर आतापर्यंत देश-विदेशातील ३४ संशोधकांनी प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवली आहे़ त्यात कॅलिफॉर्नियाच्या गेल आॅम्वेट व जर्मनीच्या रूझी लँड यांचाही समावेश आहे. ‘दीनमित्र’ने कुलकर्णी यांच्या वतनाबद्दल सातत्याने लिखाण केलं. त्यामुळे त्याकाळी विधिमंडळात मोठा खल झाला़ त्यानंतर कुलकर्णी वतन बंद करण्याचा व तलाठी नेमण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. राज्यातील ही महत्वाची ऐतिहासिक घटना मानली जाते. हा बदल तरवडीतून प्रकाशित झालेल्या दीनमित्राने घडवला.

अनिल गर्जे

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर