शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

कुकडीच्या पाण्यावर पुणेकरांची दादागिरी वाढली; पाचपुते यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 16:53 IST

कुकडीच्या पाणी प्रश्नी पुणेकरांची दादागिरी वाढली आहे. त्यामुळे नगरला हक्काचे पाणी मिळत नाही. परिणामी आपले साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यांचे दोन साखर कारखाने जोरात चालले आहेत, असा आरोप माजीमंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप वळसे यांचे नाव न घेता केला.

श्रीगोंदा : कुकडीच्या पाणी प्रश्नी पुणेकरांची दादागिरी वाढली आहे. त्यामुळे नगरला हक्काचे पाणी मिळत नाही. परिणामी आपले साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यांचे दोन साखर कारखाने जोरात चालले आहेत, असा आरोप माजीमंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप वळसे यांचे नाव न घेता केला.

आमदार पाचपुते यांनी सोमवारी (दि.१ जून) श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण कुकडीच्या पाणी प्रश्नी एक दिवसीय उपोषण केले. यावेळी पाचपुते बोलत होते. दरम्यान, तहसीलदार महेंद्र माळी यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर पाचपुते यांनी उपोषण सोडले

कुकडीचे शेतीसाठी तीन आवर्तने मिळतील अशी परिस्थिती होती. मात्र पुणेकरांनी सहा टीएमसी पाण्यावर डल्ला मारला. त्यामुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे. कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक संपल्यावर कुकडीच्या आवर्तनाचे नियोजन करण्यासंदर्भात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्र दिले. डिंबेचे येडगावमध्ये ७५०  तर तर माणिकडोहमधून ५०० एमसीएफटी पाणी घ्यावे. त्यानंतर दि २५ मे पासून आवर्तन सुरू करा. नंतर पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टॉकमधील अडीच टीएमसी घ्या. शेतीचे आवर्तन पूर्ण होईल, असे सांगितले. पण जलसंपदामंत्र्यांनी त्याकडे कानाडोळा केला. मात्र पुणेकरांचे बंधारे भरण्यासाठी मदत केली, असा आरोपही पाचपुते यांनी केला. 

टॅग्स :ahmedabadअहमदाबादShrigondaश्रीगोंदाBabanrao Pachaputeबबनराव पाचपुतेWaterपाणीPoliticsराजकारण