शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

विसापूर जलशयावर पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 14:34 IST

कुकडी प्रकल्पातील विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील जलाशय दहा वर्षानंतर यंदा भरला आहे. या जलाशयातून सांडव्यावरुन पडणाºया पाण्याच्या धबधबा तयार झाल्याने तो नगर, पुणे जिल्ह्यातील पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. दररोज हजारो पर्यटक येथील धबधब्यावर मजा लुटण्यासाठी येत आहेत.

नानासाहेब जठारलोकमत न्यूज नेटवर्कविसापूर : कुकडी प्रकल्पातील विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील जलाशय दहा वर्षानंतर यंदा भरला आहे. या जलाशयातून सांडव्यावरुन पडणाºया पाण्याच्या धबधबा तयार झाल्याने तो नगर, पुणे जिल्ह्यातील पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. दररोज हजारो पर्यटक येथील धबधब्यावर मजा लुटण्यासाठी येत आहेत.विसापूर परिसरातीलच नाही तर  नगर, श्रीगोंदा, शिरुर, पारनेर भागातीलही काही हौशी पर्यटक जलाशयाला भेट देत आहेत. वॉटर फॉलचा आनंद लुटण्यासाठी खर्च करुन दूरवर जाण्याऐवजी पर्यटक विसापूर जलाशयाचे सांडव्याचे वॉटर फॉलला महत्व देत आहेत. सांडव्याचे तीनशे-साडेतीनशे मीटर लांबीचे सांडव्यावरुन पाणी वहात आसल्याने सांडव्याखाली धबधबे तयार झाले असून सेल्फी काढण्यासाठी तरुणाईने गर्दी केले आहे.तरुणांप्रमाणेच महिला व लहान मुलांनी वाहत्या पाण्यात बागडण्यासाठी गर्दी केली आहे.९२७ दशलक्ष घनफूट साठवण क्षमता आसलेल्या धरणाजवळ सायंकाळच्या पहारी विलोभनीय दृष्य तयार होत आहे.ब्रिटिशकालीन प्रकल्पविसापूर जलाशयाची मातीची भिंत ७४४० फूट म्हणजे सुमारे सव्वादोन किलोमीटर लांब व ८४ फूट उंच आहे. हे धरण बांधताना इंग्रजांनी केवळ दगड व मातीचाच वापर केला. तरीही या धरणातून थेंबभरही पाण्याची गळती होत नाही.  या जलाशयाला शंभर वर्षे पूर्ण झाले असून इंग्रज सरकारने १८९६ ते १९२७ या ३१ वर्षाच्या कालावधीत हंगा नदीवर विसापूर येथे मातीचा बांध टाकून धरण बांधले. १८९६ ते १९०० सालापर्यंत दुष्काळी कामावरील मजुरांकडून काम करुन घेण्यात आले. त्यानंतर १९१७ पर्यंत इतर भागातील मजुरांचा वापर करण्यात आला. १९१७ ते १९२३ या सहा वर्षाच्या कालावधीत विसापूर कारागृहातील बंदिवानांकडून काम करुन घेण्यात आले. त्यावेळी हे धरण बांधण्याठी २१ लाख व कालवा व उपचाºयांच्या कामासाठी १९ लाख असा या प्रकल्पावर केवळ ४० लाख खर्च झाला आहे. या धरणावर २८००० एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न इंग्रज सरकारकडून करण्यात आला. अशाप्रकारे जुन्या तंत्राचा वापर करुन २७ किलोमीटर कालव्यांसह काम पूर्ण करुन धरण सर्वप्रथम १९२७ साली ओव्हरफ्लो  झाले. मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर फ्रेड्रीक हग सायकस यांचे हस्ते २९ नोव्हेंबर १९३४ विसापूर धरणाचे औपचारिक उद्घाटन झाले. ओव्हरफ्लोचे पाणी जाण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचा सांडवा बांधलेला आहे.