शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

हिरण हत्याकांडामुळे पोलिसांवर टीकेची झोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्यांकाडाच्या तपासात काही अंशी प्रगती झाली असली तरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मात्र ...

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्यांकाडाच्या तपासात काही अंशी प्रगती झाली असली तरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मात्र टीकेची झोड उठली आहे. विशेषत: बेलापूर ग्रामस्थांनी पोलिसांच्या तपासाच्या पद्धतीवर जाहीरपणे गंभीर आरोप केले. अधिवेशनातही विरोधी पक्षांनी त्यावरून रान उठविले. त्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला या घटनेमुळे धक्का बसला आहे.

या गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. स्वत: जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील येथे हिरण यांचा मृतदेह आढळल्यापासून ठाण मांडून आहेत. पोलीस महानिरीक्षकांनीही येथे भेट देऊन पाहणी केली. मात्र, तरीही पोलिसांवरील व्यापारी समाजाचा रोष कमी झालेला नाही.

सोमवारी हिरण यांचे बेलापुरातून सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान अपहरण झाले होते. मात्र, मंगळवारी दुपारी उशिरा याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यासाठी ग्रामस्थांना निवेदन द्यावे लागले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना ग्रामस्थांनी माहिती दिली. त्यानंतरच तपासाला काही प्रमाणात गती मिळाली.

सोमवारी रात्री हिरण बेपत्ता होताच पोलिसांनी तालुक्याच्या सीमेवर नाकाबंदी करणे अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही. अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये तत्काळ शहरातील काही अट्टल गुन्हेगारांवर तपासात लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते. त्यातून पोलिसांना धागेदोरे मिळू शकले असते. मात्र त्या पातळीवर कारवाया झाल्या नाहीत.

विधानसभेच्या अधिवेशनामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी गृहखात्याचे हे अपयश असल्याची टीका केली. मात्र, जिल्हा पोलीस प्रमुखांना आरोप मान्य नाहीत. तपासात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आले तर कार्यवाही केली जाईल, असे पाटील यांचे म्हणणे आहे.

----------