शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

नगर तालुक्यावर आता पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:20 IST

केडगाव : एकीकडे कोरोनाने नगर तालुक्याला नको नकोसे केलेले असताना आता तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. तालुक्यात सध्या ...

केडगाव : एकीकडे कोरोनाने नगर तालुक्याला नको नकोसे केलेले असताना आता तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. तालुक्यात सध्या चार गावांत टँकर सुरू झाले असून, आणखी सहा गावांनी टँकरसाठी मागणी केली आहे. घोसपुरी पाणी योजनेपुढे तांत्रिक अडचणी वाढत असून, बुऱ्हाणनगर पाणी योजना आर्थिक संकटात सापडली आहे.

तालुक्यात कोरोनाचे मोठे संकट उभे राहिले असताना आता उन्हाच्या तीव्रतेने पाणीटंचाईचेही संकट वाढत चालले आहे. तालुक्यात मागील वर्षी सरासरीच्या १८५ टक्के विक्रमी पाऊस पडला तरी काही गावे सध्या पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. तालुक्यात सध्या सांडवे, मदडगाव, बाळेवाडी आणि दश्मीगव्हाण या चार गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवू लागल्याने या गावात तत्काळ पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. आता भातोडी, ससेवाडी, इमामपूर, कोल्हेवाडी, बहिरवाडी, कौडगाव या सहा गावांत पाणीटंचाई सुरू झाली आहे. या गावांनी टँकर सुरू करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवले आहेत.

घोसपुरी पाणी योजना व बुऱ्हाणनगर पाणी योजना सध्या सुरळीत सुरू असल्या तरी योजनांपुढील अडचणी कमी झालेल्या नाहीत. घोसपुरी पाणी योजनेपुढे तांत्रिक अडचणी व मनुष्यबळाची अडचण वाढली आहे. योजनेचे काही कर्मचारी कोरोनाने बाधित आहेत. तसेच घोसपुरी योजनेचा पाणी उपसा करणारा पंप कालबाह्य झाला आहे. त्यामुळे सध्या ३० टक्के पाण्याची आवक कमी झाली आहे. १ लाख ६५ हजार लिटर पाण्याची गरज असताना पंप नादुरुस्तीमुळे केवळ १ लाख लिटर पाणी मिळत आहे. याचा परिणाम पाणी वितरणावर होत आहे. योजना समितीचे अध्यक्ष संदेश कार्ले यांनी पंप दुरुस्त करण्याबाबत पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे. बुऱ्हाणनगर पाणी योजनेकडे महावितरण व पाणीपट्टीची कोट्यवधी रुपयांची बाकी आहे. वसुलीत अडचण येत असल्याने ही योजना आर्थिक संकटात सापडली आहे.

--

ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, त्या गावांना पहिल्या टप्प्यात टँकर मंजूर केले आहेत. आणखी प्रस्ताव येत आहेत. आम्ही टंचाई आराखडा तयार केला आहे. वाढती पाणीटंचाई लक्षात घेऊन पुरवणी आराखडा तयार केला आहे.

-सुरेखा गुंड,

सभापती, पंचायत समिती, नगर

---

इमामपूर गावामध्ये डोंगर उताराचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पावसाळ्यात सुरुवातीलाच गावच्या भूजल पातळीत वाढ होते. उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. सध्या जि. प. सदस्य गोविंद मोकाटे स्वखर्चाने विहिरीत पाणी टाकून गावाची तहान भागवत आहेत. गावासाठी टँकर मंजूर होणे गरजेचे आहे.

-भीमराज मोकाटे,

सरपंच, इमामपूर

---

टँकर तत्काळ मंजूर होणे गरजेचे आहे.

इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी या तिन्ही गावांची आज पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याचे टँकर मंजूर होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर टँकर मंजुरीला विलंब झाला आहे. पिंपळगाव माळवी तलावातून पाणी आणण्यासाठी बहिरवाडी व ससेवाडी गाव संयुक्तपणे प्रयत्न करत आहे.

-राजेंद्र दारकुंडे,

तालुका उपाध्यक्ष, भाजप, नगर

---

१२ बहिरवाडी तलाव

बहिरवाडी येथील कोरडाठाक पडलेला वाकी तलाव.