शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

जलयुक्त योजनेत भ्रष्टाचार

By admin | Updated: October 5, 2016 00:23 IST

अहमदनगर : राज्य सरकारची जलयुक्त शिवार योजना ‘झोलयुक्त’ शिवार योजना आहे. अधिकारी पातळीवर राबविलेल्या या योजनेत भ्रष्टाचार आहे.

अहमदनगर : राज्य सरकारची जलयुक्त शिवार योजना ‘झोलयुक्त’ शिवार योजना आहे. अधिकारी पातळीवर राबविलेल्या या योजनेत भ्रष्टाचार आहे. राज्यातील मुसळधार पावसात ‘जलयुक्त’चे काय-काय वाहून गेले?,हे लवकर दिसणार आहे. नगर जिल्ह्यातही जलयुक्तच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले, राज्यभर मुख्यमंत्री जलयुक्त शिवार योजना नाचवित होते. मात्र या योजनेबाबत खुलासा करण्याची वेळ सरकारवर येणार आहे. या योजनेत जनतेचा पैसा वाया गेला असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. मात्र, शेतकऱ्यांची पाणी अडविण्याची साधने वाहून गेली, हे दुर्दैवी आहे. नगर जिल्ह्यातील योजनेच्या कामात भष्ट्रचार झाल्याच्या तक्रारी असून त्याची चौकशी होणार आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टी होऊन सर्वत्र पुराचे थैमान असून अतिवृष्टीची दाहकता मोठी आहे. पुढील आठवड्यात पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहे. पूरग्रस्तांसाठी तातडीने अन्नछत्र सुरू करावेत. स्थलांतरित कुटूंबांना निवारा देऊन त्यांना आरोग्य सुविधा द्यावी. पूरग्रस्त भागात प्रशासन चांगले काम करीत आहे. मात्र, त्यात आणखीा सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना कराव्यात. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिकांला पुराचा फटका बसला असून सरकारने तत्काळ विनाविलंब कर्ज माफीची घोषणा करावी. रखडलेल्या रब्बी दुष्काळी अनुदानासाठी धरणाच्या लाभक्षेत्राची अट सांगण्यात येत आहे. दोन वर्षांपासून धरणे कोरडी असल्याने ही अट शिथील करुन अनुदान द्यावे. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सरकारला तातडीने पत्र पाठविणार असल्याचे विखे म्हणाले. (प्रतिनिधी)