शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कोरोनामुळे कर्नाटकात अडकलेल्या महाराष्ट्रातील ३५ विद्यार्थ्यांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 15:05 IST

कर्नाटकात शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ३५ विद्यार्थ्यांना कोरोनामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्या ट्विटची माहिती मिळताच नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तत्काळ सूत्रे हलवून सबंधित विद्यार्थ्यांना कर्नाटकात मदत पोहोचवून महाराष्ट्रात सुखरूप आणण्यास प्रयत्न केले.

सचिन नन्नवरे/ मिरी : कर्नाटकात शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ३५ विद्यार्थ्यांना कोरोनामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या विद्यार्थ्यांनी मदतीच्या अपेक्षेने ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारचे आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्या ट्विटची माहिती मिळताच नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तत्काळ सूत्रे हलवून सबंधित विद्यार्थ्यांना कर्नाटकात मदत पोहोचवून महाराष्ट्रात सुखरूप आणण्यास प्रयत्न केले.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे कर्नाटकातील कलबुर्गी येथे देशातील पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन कलबुर्गी येथील मध्यवर्ती विद्यापीठात शिक्षण घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाने सुट्टी जाहीर करून वसतिगृह तत्काळ खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी शिकणाºया महाराष्ट्रातील सुमारे ३५विद्यार्थ्यांना तत्काळ घरी परतणे आवश्यक होते. परंतु तपासणी न करता प्रवास केल्यास संसर्ग होण्याची भीती असल्याने या विद्यार्थ्यांना प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे हे विद्यार्थी दुहेरी संकटात सापडले होते. परंतु त्याच ठिकाणी शिक्षण घेणाºया केरळ राज्यातील विद्यार्थ्यांसाठी केरळ सरकारने पथक पाठवून तपासणी करून घेऊन जाण्यासाठी वाहने पाठवली. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देखील राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. त्यामुळे नागपूर येथील आशीर्वाद सत्यम या विद्यार्थ्याने ट्विटरवर पोस्ट करून महाराष्ट्र सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. सदर पोस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांना टॅग करून माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांची केली तपासणीअखेर नगर येथील युवराज चव्हाण या युवकाने मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना माहिती दिली. तनपुरे यांनी गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ सूत्रे हलवून सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक पाठवले. कर्नाटकात अडकलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी करून विशेष वाहनांनी त्यांना सुखरूपपणे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आणले. त्यानंतर राज्यातील नगर, वर्धा, नागपूर, पुणे, मुंबई, चंद्रपूर, सातारा, नांदेड व गडचिरोली जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोच केले. त्यामुळे संकटकाळी मदत केल्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांर्नी व त्यांच्या पालकांनी मंत्री तनपुरे यांचे आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीcorona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकStudentविद्यार्थी