शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Coronavirus : यात्रा रद्द झाल्याने तमाशा कलावंतांवर संक्रांत! २५० पार्ट्या पडल्या बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 05:50 IST

गावोगावचे यात्रा-उत्सव रद्द झाल्याने तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ अली आली.

- मच्छिंद्र देशमुखकोतूळ (जि. अहमदनगर) : सध्याचा यात्रा-उत्सवांचा हंगाम असल्याने तमाशा फडमालकांनी राज्यभरातील प्रमुख ठिकाणी सुपारी मिळविण्यासाठी थाटलेल्या राहुट्यांवर कोरोनामुळे संक्रात आली आहे. गावोगावचे यात्रा-उत्सव रद्द झाल्याने तमाशा कलावंतांवरउपासमारीची वेळ अली आली. सुपारी घेताना घेतलेली उचल कुठून परत द्यायची? लाखो रुपयांचे कर्ज घेऊन उभारलेला फड जगवायचा कसा? अशा प्रश्नांनी फडमालक चिंताग्रस्त आहे.कोरोनामुळे राज्यातील २५० नोंदणीकृत तमाशे प्रशासनाने बंद केले आहेत. महिनाभर आधी आरक्षित झालेल्या तारखा रद्द झाल्या आहेत. पुढील तारखाही आता मिळणे बंद झाले आहे. तमाशा मालक व कलावंत आणि त्यांचे कुटुंब अशा राज्यभरात दीड लाख लोकांची उपासमारी सुरु आहे. फडमालक कर्जबाजारी तर कलावंत उपाशी अशी अवस्था झाल्याने ‘कशी कोरोनाने थट्टा आज मांडली...’ असे म्हणण्याची वेळ तमाशा कलावंतावर आली आहे.राज्यात २५० नोंदणीकृत तमाशांपैकी ३० तमाशे तंबूतील म्हणजे मोठ्या यात्रेला तिकिटावर खेळ करणारे आहेत. या फडामध्ये महिला, पुरूष असे ५० कलावंत व ६० ते ७० तांत्रिक, रोजंदार असतात. होळी पौर्णिमा ते बुद्ध पौर्णिमा हा तमाशाचा ६० दिवसांचा हंगाम असतो. परंतु आता यात्राच बंद झाल्याने या सर्वांच्या पोटावर पाय आला आहे.फडानुसार २५ हजार ते ३ लाखापर्यंत बिदागी एका खेळासाठी दिली जाते. फडमालक एका कलाकारास ८० ते ९० हजार तर जोडप्यांना दीड लाख रुपये जुलै महिन्यातच उचल देतात. यासाठी फडमालक तमाशाची मालमत्ता गहाण ठेवून कर्ज काढतात. १०० लोक असलेल्या तमाशासाठी दरवर्षी ५० ते ६० लाखांचे कर्ज घेतले जाते. तमाशा फडाचा दररोजचा खर्च ४० ते ६० हजार रुपये आहे. परंतु आता हंगामाच हातचा जाणार असल्याने हा डोलारा सावरायचा तरी कसा, याचीच चिंता फडमालकांना लागून राहिली आहे.आम्ही कर्ज काढून कलावंतांना उचली दिल्या आहेत. या महिन्यात२५ दिवस तमाशा बंद असल्याने हा हंगमाच तमाशाविना राहणार आहे. सव्वाशे माणसांना दररोज ६० ते ६५ हजार खर्च येतो. कर्ज आणि खर्च दुप्पट होणार आहे. शासनाने या आपत्तीकाळात मदत करावी.- मोहितकुमार नारायणगावकर, तमाशा मालक,विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळ

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस