शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!
4
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
5
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
6
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
7
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
8
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
9
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

साईसच्चरित्रकार दाभोळकरांच्या नातीने दिली संस्थानला साईसच्चरित्राच्या पहिल्या आवृत्तीची प्रत भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 11:36 IST

साईबाबांच्या पूर्व अनुमतीने अण्णासाहेब उर्फ गोविंदराव दाभोळकरांनी बाबांच्या निर्वाणानंतर साईसच्चरित्राचे लेखन केले. मात्र साईसच्चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनापूर्वीच दाभोळकरांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांना आपण लिहिलेले साईसच्चरित्र स्वहस्ते बाबांना किंवा संस्थानला भेट देता आले नाही. दाभोळकरांच्या मृत्यूनंतर नव्वद वर्षांनी त्यांच्या नातीने १०१ व्या साई पुण्यतिथीचे औचित्य साधून १९३० साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या साईसच्चरित्राच्या आवृत्तीची मुद्रित प्रत संस्थानला भेट दिली.

शिर्डी : साईबाबांच्या पूर्व अनुमतीने अण्णासाहेब उर्फ गोविंदराव दाभोळकरांनी बाबांच्या निर्वाणानंतर साईसच्चरित्राचे लेखन केले. मात्र साईसच्चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनापूर्वीच दाभोळकरांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांना आपण लिहिलेले साईसच्चरित्र स्वहस्ते बाबांना किंवा संस्थानला भेट देता आले नाही. दाभोळकरांच्या मृत्यूनंतर नव्वद वर्षांनी त्यांच्या नातीने १०१ व्या साई पुण्यतिथीचे औचित्य साधून १९३० साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या साईसच्चरित्राच्या आवृत्तीची मुद्रित प्रत संस्थानला भेट दिली.दाभोळकरांची वयोवृद्ध नात अंजली प्रधान-दाभोळकर यांनी ही अमूल्य भेट संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, डॉ़आकाश किसवे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.१९१० साली अण्णासाहेब सर्वप्रथम शिर्डीला आले. पहिल्या भेटीतच बाबांनी त्यांना हेमाडपंत ही पदवी बहाल करत साईसच्चरित्र लेखनास अनुमती दिली. अण्णासाहेबांनी लेखनाची सुरूवात मात्र बाबांच्या निर्वाणानंतर चार वर्षांनी १९ मार्च १९२२ रोजी गुढीपाडव्याला केली. त्यांनी जसे जसे अध्याय लिहिले तसे हे अध्याय १९२३ पासून संस्थानच्या साईलिला मासिकात क्रमश: प्रसिद्ध करण्यात आले. शेवटचा एकावन्नावा अध्याय साईलिलेत छापायला पाठवल्यानंतर दोनच दिवसांनी १५ जुलै १९२९ रोजी दुपारी अण्णासाहेबांचे हृदयविकाराने निधन झाले.अण्णासाहेब ५२ वा अध्याय अवतरणीका म्हणून लिहिणार होते. मात्र अण्णासाहेबांच्या मृत्यूनंतर बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब देव यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी बावन्नव्या अध्यायाची अण्णासाहेबांनी काढलेली टिपणे बघितली. मात्र त्यांना अवतरणीका सापडली नाही. त्यामुळे त्यांनी टिपणावरून ५२वा अध्याय पूर्ण केला. स्वत: अवतरणीका लिहून तो त्रेपन्नावा अध्याय म्हणून ग्रंथाला जोडला़ १९२९ पर्यंत साईलिलेतून क्रमश: प्रसिद्ध झालेले साईसच्चरित्र २६ नोव्हेंबर १९३० रोजी सर्वप्रथम ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले. आजवर १६ भाषेबरोबरच संस्थानने साईसच्चरित्राच्या मराठीत तब्बल ३३ आवृत्या प्रसिद्ध केल्या असल्या तरी संस्थान दप्तरी पहिल्या आवृत्तीची प्रत नव्हती़ मुगळीकरांच्या विनंतीवरून अंजली प्रधान यांनी ती संस्थानला भेट दिली. ही प्रत सुरक्षित ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिरAhmednagarअहमदनगर