शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

साईसच्चरित्रकार दाभोळकरांच्या नातीने दिली संस्थानला साईसच्चरित्राच्या पहिल्या आवृत्तीची प्रत भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 11:36 IST

साईबाबांच्या पूर्व अनुमतीने अण्णासाहेब उर्फ गोविंदराव दाभोळकरांनी बाबांच्या निर्वाणानंतर साईसच्चरित्राचे लेखन केले. मात्र साईसच्चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनापूर्वीच दाभोळकरांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांना आपण लिहिलेले साईसच्चरित्र स्वहस्ते बाबांना किंवा संस्थानला भेट देता आले नाही. दाभोळकरांच्या मृत्यूनंतर नव्वद वर्षांनी त्यांच्या नातीने १०१ व्या साई पुण्यतिथीचे औचित्य साधून १९३० साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या साईसच्चरित्राच्या आवृत्तीची मुद्रित प्रत संस्थानला भेट दिली.

शिर्डी : साईबाबांच्या पूर्व अनुमतीने अण्णासाहेब उर्फ गोविंदराव दाभोळकरांनी बाबांच्या निर्वाणानंतर साईसच्चरित्राचे लेखन केले. मात्र साईसच्चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनापूर्वीच दाभोळकरांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांना आपण लिहिलेले साईसच्चरित्र स्वहस्ते बाबांना किंवा संस्थानला भेट देता आले नाही. दाभोळकरांच्या मृत्यूनंतर नव्वद वर्षांनी त्यांच्या नातीने १०१ व्या साई पुण्यतिथीचे औचित्य साधून १९३० साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या साईसच्चरित्राच्या आवृत्तीची मुद्रित प्रत संस्थानला भेट दिली.दाभोळकरांची वयोवृद्ध नात अंजली प्रधान-दाभोळकर यांनी ही अमूल्य भेट संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, डॉ़आकाश किसवे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.१९१० साली अण्णासाहेब सर्वप्रथम शिर्डीला आले. पहिल्या भेटीतच बाबांनी त्यांना हेमाडपंत ही पदवी बहाल करत साईसच्चरित्र लेखनास अनुमती दिली. अण्णासाहेबांनी लेखनाची सुरूवात मात्र बाबांच्या निर्वाणानंतर चार वर्षांनी १९ मार्च १९२२ रोजी गुढीपाडव्याला केली. त्यांनी जसे जसे अध्याय लिहिले तसे हे अध्याय १९२३ पासून संस्थानच्या साईलिला मासिकात क्रमश: प्रसिद्ध करण्यात आले. शेवटचा एकावन्नावा अध्याय साईलिलेत छापायला पाठवल्यानंतर दोनच दिवसांनी १५ जुलै १९२९ रोजी दुपारी अण्णासाहेबांचे हृदयविकाराने निधन झाले.अण्णासाहेब ५२ वा अध्याय अवतरणीका म्हणून लिहिणार होते. मात्र अण्णासाहेबांच्या मृत्यूनंतर बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब देव यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी बावन्नव्या अध्यायाची अण्णासाहेबांनी काढलेली टिपणे बघितली. मात्र त्यांना अवतरणीका सापडली नाही. त्यामुळे त्यांनी टिपणावरून ५२वा अध्याय पूर्ण केला. स्वत: अवतरणीका लिहून तो त्रेपन्नावा अध्याय म्हणून ग्रंथाला जोडला़ १९२९ पर्यंत साईलिलेतून क्रमश: प्रसिद्ध झालेले साईसच्चरित्र २६ नोव्हेंबर १९३० रोजी सर्वप्रथम ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले. आजवर १६ भाषेबरोबरच संस्थानने साईसच्चरित्राच्या मराठीत तब्बल ३३ आवृत्या प्रसिद्ध केल्या असल्या तरी संस्थान दप्तरी पहिल्या आवृत्तीची प्रत नव्हती़ मुगळीकरांच्या विनंतीवरून अंजली प्रधान यांनी ती संस्थानला भेट दिली. ही प्रत सुरक्षित ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिरAhmednagarअहमदनगर