शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

साईसच्चरित्रकार दाभोळकरांच्या नातीने दिली संस्थानला साईसच्चरित्राच्या पहिल्या आवृत्तीची प्रत भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 11:36 IST

साईबाबांच्या पूर्व अनुमतीने अण्णासाहेब उर्फ गोविंदराव दाभोळकरांनी बाबांच्या निर्वाणानंतर साईसच्चरित्राचे लेखन केले. मात्र साईसच्चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनापूर्वीच दाभोळकरांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांना आपण लिहिलेले साईसच्चरित्र स्वहस्ते बाबांना किंवा संस्थानला भेट देता आले नाही. दाभोळकरांच्या मृत्यूनंतर नव्वद वर्षांनी त्यांच्या नातीने १०१ व्या साई पुण्यतिथीचे औचित्य साधून १९३० साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या साईसच्चरित्राच्या आवृत्तीची मुद्रित प्रत संस्थानला भेट दिली.

शिर्डी : साईबाबांच्या पूर्व अनुमतीने अण्णासाहेब उर्फ गोविंदराव दाभोळकरांनी बाबांच्या निर्वाणानंतर साईसच्चरित्राचे लेखन केले. मात्र साईसच्चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनापूर्वीच दाभोळकरांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांना आपण लिहिलेले साईसच्चरित्र स्वहस्ते बाबांना किंवा संस्थानला भेट देता आले नाही. दाभोळकरांच्या मृत्यूनंतर नव्वद वर्षांनी त्यांच्या नातीने १०१ व्या साई पुण्यतिथीचे औचित्य साधून १९३० साली प्रसिद्ध झालेल्या पहिल्या साईसच्चरित्राच्या आवृत्तीची मुद्रित प्रत संस्थानला भेट दिली.दाभोळकरांची वयोवृद्ध नात अंजली प्रधान-दाभोळकर यांनी ही अमूल्य भेट संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, डॉ़आकाश किसवे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.१९१० साली अण्णासाहेब सर्वप्रथम शिर्डीला आले. पहिल्या भेटीतच बाबांनी त्यांना हेमाडपंत ही पदवी बहाल करत साईसच्चरित्र लेखनास अनुमती दिली. अण्णासाहेबांनी लेखनाची सुरूवात मात्र बाबांच्या निर्वाणानंतर चार वर्षांनी १९ मार्च १९२२ रोजी गुढीपाडव्याला केली. त्यांनी जसे जसे अध्याय लिहिले तसे हे अध्याय १९२३ पासून संस्थानच्या साईलिला मासिकात क्रमश: प्रसिद्ध करण्यात आले. शेवटचा एकावन्नावा अध्याय साईलिलेत छापायला पाठवल्यानंतर दोनच दिवसांनी १५ जुलै १९२९ रोजी दुपारी अण्णासाहेबांचे हृदयविकाराने निधन झाले.अण्णासाहेब ५२ वा अध्याय अवतरणीका म्हणून लिहिणार होते. मात्र अण्णासाहेबांच्या मृत्यूनंतर बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब देव यांच्यावर ती जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी बावन्नव्या अध्यायाची अण्णासाहेबांनी काढलेली टिपणे बघितली. मात्र त्यांना अवतरणीका सापडली नाही. त्यामुळे त्यांनी टिपणावरून ५२वा अध्याय पूर्ण केला. स्वत: अवतरणीका लिहून तो त्रेपन्नावा अध्याय म्हणून ग्रंथाला जोडला़ १९२९ पर्यंत साईलिलेतून क्रमश: प्रसिद्ध झालेले साईसच्चरित्र २६ नोव्हेंबर १९३० रोजी सर्वप्रथम ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले. आजवर १६ भाषेबरोबरच संस्थानने साईसच्चरित्राच्या मराठीत तब्बल ३३ आवृत्या प्रसिद्ध केल्या असल्या तरी संस्थान दप्तरी पहिल्या आवृत्तीची प्रत नव्हती़ मुगळीकरांच्या विनंतीवरून अंजली प्रधान यांनी ती संस्थानला भेट दिली. ही प्रत सुरक्षित ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिरAhmednagarअहमदनगर