शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नगरमध्ये दूषित पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

By अरुण वाघमोडे | Updated: July 14, 2023 15:48 IST

पाणी पुरवठा करणारी उंच पाण्याची टाकी व संपवेलमध्ये गाळ साचल्यामुळे या भागात दुषित पाणी येत आहे.

अहमदनगर: नगर शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील स्टेशन रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या नळावाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने तातडीने पाण्याच्या टाक्या साफ करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी प्रभागातील नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्यासह सुवर्णा जाधव व विद्या खैरे यांच्यावतने आयुक्तांकडे करण्यात आली आहे. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे स्टेशन परिसरातील आगरकर मळा, अर्बन बँक कॉलनी, गवळी वाडा, संभाजी कॉलनी, जयभिम हौसिंग सोसायटी, गजानन कॉलनी, आनंदनगर, संजीवनी कॉलनी, आदर्श गौतमनगर, स्वामी समर्थ मार्ग, सागर कॉम्प्लेक्स, विशाल कॉलनी, एकता कॉलनी, बोहरी चाळ, नवीन व जुना टिळक रोड, पटेलवाडी, संजयनगर, गाझीनगर, काटवन खंडोबा रोड, आगरकर मळा व स्टेशन रोड संपूर्ण परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दुषित पिण्याचे पाणी येत आहे. 

या परिसराला पाणी पुरवठा करणारी उंच पाण्याची टाकी व संपवेलमध्ये गाळ साचल्यामुळे या भागात दुषित पाणी येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आजारी पडले आहे. याबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत, याकरिता आगरकर मळा येथील पिण्याच्या पाण्याची उंच टाकी व संपवेल या दोन्ही टाक्या स्वच्छ धुवून घेण्यात याव्यात व सदरील भागातील पिण्याचा पाणी पुरवठा स्वच्छ व पुरेशा दाबाने करण्यात यावा. अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणी