शहरं
Join us  
Trending Stories
1
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
4
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
5
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
6
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
7
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
8
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
9
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
10
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
11
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
12
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
13
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
14
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
16
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
17
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
18
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
19
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
20
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव

ज्ञानेश्वरीच्या सतत वाचनाने जगण्याची दृष्टी लाभते/ विष्णू महाराज पारनेरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 21:50 IST

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी कसे बाेलतात हे माऊलींनी सांगितले आहे. कसे बाेलावे, कुठे बाेलावे आणि काेणापुढे बाेलावे याचे नियम आहेत. अर्जुन म्हणताे, माझा माेह गेला आहे. अर्जुनाने अनेक प्रश्न आदराने, अनादरानेही विचारले आहेत.  कारण भगवान श्रीकृष्ण त्याचे जसे गुरू आहेत. तसेच सखा आणि मित्रही आहेत.

ज्याप्रमाणे शेतीत नांगरणे आणि पेरणे हे अव्याहत करावे लागते. तसेच शिष्याला सतत सांगावे लागते तरच त्याला अमृततत्त्वाला प्राप्ती होते. ज्ञानेश्वरीच्या सतत वाचनाने चर्मचक्षु, ज्ञानचक्षु अाणि अंतिम दिव्यचक्षु प्राप्त हाेते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी कसे बाेलतात हे माऊलींनी सांगितले आहे. कसे बाेलावे, कुठे बाेलावे आणि काेणापुढे बाेलावे याचे नियम आहेत. 

अर्जुन म्हणताे, माझा माेह गेला आहे. अर्जुनाने अनेक प्रश्न आदराने, अनादरानेही विचारले आहेत.  कारण भगवान श्रीकृष्ण त्याचे जसे गुरू आहेत. तसेच सखा आणि मित्रही आहेत. त्यामुळे भगवान म्हणतात, मी मागेही तुला सांगितले आहे आणि आताही सांगतो. मी तुझे अवधान पाहत आहे. शिष्य आपल्याकडे आकर्षित झाला पाहिजे, अशा पद्धतीने गुरूने राहावे लागते. निवृत्तीनाथांशी कसे बाेलावे, श्राेत्यांशी कशी सलगी करावी, शिष्य ही सलगी करत असताे, त्याला किती आणि कशी सलगी करू द्यावयाची हे गुरूने ठरवावे लागते. 

ज्ञानेश्वर माऊलीही श्रीकृष्णसंदर्भात एकापाठाेपाठएक दृष्टांत देतात. डाॅ. रामचंद्र पारनेरकर महाराजही आपल्या प्रवचनातून अनेक प्रमाण आणि दृष्टांत देत हाेते. त्यावेळी उपस्थितांना वाटायचे की, हे प्रमाण आहे की प्रमेय आहे. माठ नवीन घेतल्यानंतर त्यात थाेडे पाणी घालून ताे गळका आहे की नाही हे आपण पाहताे. तसेच शिष्याचे मडके कसे आहे हे गुरू तपासत असताे. शब्दांना ताे जाणताे त्यामुळे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना आता तु किरीटी आहेस. म्हणजेच तुझ्या मस्तकावर आता  मुकूट चढणार आहे. आता तू कायमचा आमचा निजधाम झाला आहेस. तू एकदम तत्पर आहेस. एखादा माेठा पर्वत पाहिल्यानंतर लगेच त्याकडे जावे वाटते तसेच मला तुझ्यावर वर्षाव करावा वाटताे. कृपाळूंचा राजा म्हणजे ज्ञानदेव. म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत. अर्जुन हा अजानबाहू हाेता. प्रत्येकवेळेला तेच ते सांगितले तरीही अमृततत्त्व प्राप्त हाेते, असा प्रतिबाेध गुरू देत असतात.

दरवर्षी  शेत नांगरताे आणि पेरताे ते करावेच लागते. शिष्यांना सतत मार्गदर्शन करावे लागते. साेन्याला जितकेवेळा तापवाल तेवढे ते शुद्ध हाेते. शिष्यांना मी जेव्हा शिकवताे त्यात माझाही स्वार्थ आहे. अंगात रग आल्याशिवाय पैलवान कुस्ती खेळत नसताे. चपळता आणि ताकद हे दाेन्हीही गुण कुस्तीगीराला आवश्यक आहेत. तसेच गुरूला जेव्हा शिष्य तयार करायचे असतात, त्यांना काही अधिकार द्यावयाचे असतात. तेव्हा शिष्याची रग वाढविली जाते. माझ्या स्वरुपाच्या विभूतीची माहिती मी देणार आहे, असे भगवंत म्हणतात.

मला तू पुर्णत्त्वाने ओळखावे हा माझा स्वार्थ आहे, असे गुरू म्हणताे. त्यातूनच गुरू चर्मचक्षू आणि ज्ञानचक्षूचे काम शिष्याकडून करवून घेत असताे आणि त्यानंतर शिष्याला दिव्यचक्षू मिळत असताे. ज्ञानेश्वरीच्या सतत वाचनाने चिंतन, मननाने चर्मचक्षू, ज्ञानचक्षू आणि अंतिम दिव्यचक्षूची प्राप्ती हाेते. आई आपल्या मुलाला तयार करत असते, त्याला न्हावू घालते, अलंकार घालते तसेच माऊलींच्या दृष्टीने मी तुमच्याकडे पाहत आहे. तुमच्यावर भक्ती आणि साहित्याचे अलंकार चढवित आहे.

 

शिष्याचे हित झाले की, गुरूला सुख मिळत असते. हत्तीच्या मस्तकातून गंडस्थळातून जसा मद येताे आणि ताे फाेडण्यासाठी वज्रमूठ तयार करावी लागते तसे अर्जुना तुला परमार्थात आणावयाचे आहे. त्यामुळे परमेश्वराची कृपा तुला व्हावी म्हणून मी तुला तयार करत आहे. मला तुझी आवड लागली. देवाची आवड लागली म्हणजे काय हाेते, याचे सुंदर उदाहरण संत तुकाराम आहेत. ज्यांना पांडुरंगाने सदेह वैकुंठाला नेले. देवाला आवडी लागली की ताे थांबत नाही. तुला काही फायदा हाेईल की नाही. पण तू अवधान दे असे भगवंत म्हणतात. मी सांगताे हे परमवाक्य आहे. पूर्णपुरुष तुला भेटण्यास आला आहे. असे समज आणि हे सर्वव्यापक आहे. हे नुसते अक्षर नाही तर परमब्रह्म आहे. ह्रदयातून बाहेर आलेले बाेल मी थांबवू शकत नाही. तुला स्पष्टपणे बाेध झाला नसला तरीही मी सारथ्य म्हणून आलो असून आणि तुला सतत मी सांगत राहील. परमार्थात चिंतन लागते ही आपल्याला सवय हाेते. अनेकदा कितीही सांगितले तरीही शिष्य तयार हाेत नाहीत. ईश्वरकृपा प्राप्त हाेण्यासाठी पात्रता वाढवावी लागते. आी वडिलांनी काय केले हे जर मुलांना कळत नसेल तर त्याला काय म्हणावे. अशी प्रस्तावना करून भगवंत म्हणतात, यत्न विद्या मी दिलेली आहे, तरी आता तु मला ओळख.

वेदसुद्धा माझे पूर्ण वर्णन करू शकले नाहीत. विष्णु, विश्व आणि शिव हे तिन्ही माझे पूर्णपुरुषाचे रूप आहे. पूर्णपुरुषाचे मन क्षणार्धात काेठेही पाेहाेचते. भगवंत म्हणतात, तुमच्या ठिकाणी असलेले मनसुद्धा मीच अाहे. अष्टदा प्रकृती म्हणजे मी आहे. त्याची सुरूवातही मीच केली आहे. त्यातच वीस प्रकारचे भाव आहेत आणि त्यातूनच श्रीकृष्ण हे रुप प्रगटत असते. उदरात असणारा गर्भ आपल्या आईचे वय सांगू शकत नाही. जरी ताे तिच्या पाेटात असताे. देव माझ्या उदरात आहे, मला ते तेहतीस काेटी देव ओळखू शकत नाही. जलात राहणाऱ्या माशालाही समुद्राची खाेली माहिती नसते, तर अवकाशात हिंडणाऱ्या माशीला आकाशाची उंची माहिती नसते. तसेच अनेक महर्षी आहेत, पण त्यांना मी अजून कळालाे नाही, मी काेण आहे हे त्यांना अजून कळाले नाही.

 

एका डाेळा पाहे देवाजीचे रुप।

दुजाने पाहती मानव हा।।

 

अर्जुनाच्या अंत:करणात भगवंत त्यांची मांडणी करत आहेत. अर्जुना तू  भीष्माला मारलेस, तू कर्णाला मारलेस, तू युद्ध जिंकलास तरीही तू मल ओळखले नाहीस. झाड वाढलं तरीही त्याला पाणी कुठून मिळते हे माहिती नसते. देवा तुम्ही निर्गुण रुपात आहात, सगुण रुपात या असे संत ज्ञानेश्वर म्हणतात.

 

-विष्णु महाराज पारनेरकर (पारनेर, जि. अहमदनगर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक