शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

ज्ञानेश्वरीच्या सतत वाचनाने जगण्याची दृष्टी लाभते/ विष्णू महाराज पारनेरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 21:50 IST

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी कसे बाेलतात हे माऊलींनी सांगितले आहे. कसे बाेलावे, कुठे बाेलावे आणि काेणापुढे बाेलावे याचे नियम आहेत. अर्जुन म्हणताे, माझा माेह गेला आहे. अर्जुनाने अनेक प्रश्न आदराने, अनादरानेही विचारले आहेत.  कारण भगवान श्रीकृष्ण त्याचे जसे गुरू आहेत. तसेच सखा आणि मित्रही आहेत.

ज्याप्रमाणे शेतीत नांगरणे आणि पेरणे हे अव्याहत करावे लागते. तसेच शिष्याला सतत सांगावे लागते तरच त्याला अमृततत्त्वाला प्राप्ती होते. ज्ञानेश्वरीच्या सतत वाचनाने चर्मचक्षु, ज्ञानचक्षु अाणि अंतिम दिव्यचक्षु प्राप्त हाेते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी कसे बाेलतात हे माऊलींनी सांगितले आहे. कसे बाेलावे, कुठे बाेलावे आणि काेणापुढे बाेलावे याचे नियम आहेत. 

अर्जुन म्हणताे, माझा माेह गेला आहे. अर्जुनाने अनेक प्रश्न आदराने, अनादरानेही विचारले आहेत.  कारण भगवान श्रीकृष्ण त्याचे जसे गुरू आहेत. तसेच सखा आणि मित्रही आहेत. त्यामुळे भगवान म्हणतात, मी मागेही तुला सांगितले आहे आणि आताही सांगतो. मी तुझे अवधान पाहत आहे. शिष्य आपल्याकडे आकर्षित झाला पाहिजे, अशा पद्धतीने गुरूने राहावे लागते. निवृत्तीनाथांशी कसे बाेलावे, श्राेत्यांशी कशी सलगी करावी, शिष्य ही सलगी करत असताे, त्याला किती आणि कशी सलगी करू द्यावयाची हे गुरूने ठरवावे लागते. 

ज्ञानेश्वर माऊलीही श्रीकृष्णसंदर्भात एकापाठाेपाठएक दृष्टांत देतात. डाॅ. रामचंद्र पारनेरकर महाराजही आपल्या प्रवचनातून अनेक प्रमाण आणि दृष्टांत देत हाेते. त्यावेळी उपस्थितांना वाटायचे की, हे प्रमाण आहे की प्रमेय आहे. माठ नवीन घेतल्यानंतर त्यात थाेडे पाणी घालून ताे गळका आहे की नाही हे आपण पाहताे. तसेच शिष्याचे मडके कसे आहे हे गुरू तपासत असताे. शब्दांना ताे जाणताे त्यामुळे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना आता तु किरीटी आहेस. म्हणजेच तुझ्या मस्तकावर आता  मुकूट चढणार आहे. आता तू कायमचा आमचा निजधाम झाला आहेस. तू एकदम तत्पर आहेस. एखादा माेठा पर्वत पाहिल्यानंतर लगेच त्याकडे जावे वाटते तसेच मला तुझ्यावर वर्षाव करावा वाटताे. कृपाळूंचा राजा म्हणजे ज्ञानदेव. म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत. अर्जुन हा अजानबाहू हाेता. प्रत्येकवेळेला तेच ते सांगितले तरीही अमृततत्त्व प्राप्त हाेते, असा प्रतिबाेध गुरू देत असतात.

दरवर्षी  शेत नांगरताे आणि पेरताे ते करावेच लागते. शिष्यांना सतत मार्गदर्शन करावे लागते. साेन्याला जितकेवेळा तापवाल तेवढे ते शुद्ध हाेते. शिष्यांना मी जेव्हा शिकवताे त्यात माझाही स्वार्थ आहे. अंगात रग आल्याशिवाय पैलवान कुस्ती खेळत नसताे. चपळता आणि ताकद हे दाेन्हीही गुण कुस्तीगीराला आवश्यक आहेत. तसेच गुरूला जेव्हा शिष्य तयार करायचे असतात, त्यांना काही अधिकार द्यावयाचे असतात. तेव्हा शिष्याची रग वाढविली जाते. माझ्या स्वरुपाच्या विभूतीची माहिती मी देणार आहे, असे भगवंत म्हणतात.

मला तू पुर्णत्त्वाने ओळखावे हा माझा स्वार्थ आहे, असे गुरू म्हणताे. त्यातूनच गुरू चर्मचक्षू आणि ज्ञानचक्षूचे काम शिष्याकडून करवून घेत असताे आणि त्यानंतर शिष्याला दिव्यचक्षू मिळत असताे. ज्ञानेश्वरीच्या सतत वाचनाने चिंतन, मननाने चर्मचक्षू, ज्ञानचक्षू आणि अंतिम दिव्यचक्षूची प्राप्ती हाेते. आई आपल्या मुलाला तयार करत असते, त्याला न्हावू घालते, अलंकार घालते तसेच माऊलींच्या दृष्टीने मी तुमच्याकडे पाहत आहे. तुमच्यावर भक्ती आणि साहित्याचे अलंकार चढवित आहे.

 

शिष्याचे हित झाले की, गुरूला सुख मिळत असते. हत्तीच्या मस्तकातून गंडस्थळातून जसा मद येताे आणि ताे फाेडण्यासाठी वज्रमूठ तयार करावी लागते तसे अर्जुना तुला परमार्थात आणावयाचे आहे. त्यामुळे परमेश्वराची कृपा तुला व्हावी म्हणून मी तुला तयार करत आहे. मला तुझी आवड लागली. देवाची आवड लागली म्हणजे काय हाेते, याचे सुंदर उदाहरण संत तुकाराम आहेत. ज्यांना पांडुरंगाने सदेह वैकुंठाला नेले. देवाला आवडी लागली की ताे थांबत नाही. तुला काही फायदा हाेईल की नाही. पण तू अवधान दे असे भगवंत म्हणतात. मी सांगताे हे परमवाक्य आहे. पूर्णपुरुष तुला भेटण्यास आला आहे. असे समज आणि हे सर्वव्यापक आहे. हे नुसते अक्षर नाही तर परमब्रह्म आहे. ह्रदयातून बाहेर आलेले बाेल मी थांबवू शकत नाही. तुला स्पष्टपणे बाेध झाला नसला तरीही मी सारथ्य म्हणून आलो असून आणि तुला सतत मी सांगत राहील. परमार्थात चिंतन लागते ही आपल्याला सवय हाेते. अनेकदा कितीही सांगितले तरीही शिष्य तयार हाेत नाहीत. ईश्वरकृपा प्राप्त हाेण्यासाठी पात्रता वाढवावी लागते. आी वडिलांनी काय केले हे जर मुलांना कळत नसेल तर त्याला काय म्हणावे. अशी प्रस्तावना करून भगवंत म्हणतात, यत्न विद्या मी दिलेली आहे, तरी आता तु मला ओळख.

वेदसुद्धा माझे पूर्ण वर्णन करू शकले नाहीत. विष्णु, विश्व आणि शिव हे तिन्ही माझे पूर्णपुरुषाचे रूप आहे. पूर्णपुरुषाचे मन क्षणार्धात काेठेही पाेहाेचते. भगवंत म्हणतात, तुमच्या ठिकाणी असलेले मनसुद्धा मीच अाहे. अष्टदा प्रकृती म्हणजे मी आहे. त्याची सुरूवातही मीच केली आहे. त्यातच वीस प्रकारचे भाव आहेत आणि त्यातूनच श्रीकृष्ण हे रुप प्रगटत असते. उदरात असणारा गर्भ आपल्या आईचे वय सांगू शकत नाही. जरी ताे तिच्या पाेटात असताे. देव माझ्या उदरात आहे, मला ते तेहतीस काेटी देव ओळखू शकत नाही. जलात राहणाऱ्या माशालाही समुद्राची खाेली माहिती नसते, तर अवकाशात हिंडणाऱ्या माशीला आकाशाची उंची माहिती नसते. तसेच अनेक महर्षी आहेत, पण त्यांना मी अजून कळालाे नाही, मी काेण आहे हे त्यांना अजून कळाले नाही.

 

एका डाेळा पाहे देवाजीचे रुप।

दुजाने पाहती मानव हा।।

 

अर्जुनाच्या अंत:करणात भगवंत त्यांची मांडणी करत आहेत. अर्जुना तू  भीष्माला मारलेस, तू कर्णाला मारलेस, तू युद्ध जिंकलास तरीही तू मल ओळखले नाहीस. झाड वाढलं तरीही त्याला पाणी कुठून मिळते हे माहिती नसते. देवा तुम्ही निर्गुण रुपात आहात, सगुण रुपात या असे संत ज्ञानेश्वर म्हणतात.

 

-विष्णु महाराज पारनेरकर (पारनेर, जि. अहमदनगर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक