शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

लोकनियुक्त नव्हे षडयंत्रांचे सरकार; तीन माजी मंत्र्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 14:34 IST

राज्यातील सरकार लोकनियुक्त नसून षडयंत्राचे सरकार आहे. त्यांनी अतिवृष्टीत जे दौरे केले आणि पक्ष प्रवेशावर जो वारेमाप खर्च सुरु आहे, तो जरी टाळला असता तरी शेतकर्यांना हेक्टरी १० ऐवजी १२ हजारांची मदत मिळाली असती. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राज्यातील मंत्र्यांनी नेमके पहिले काय ?असा खोचक सवाल खासदार डॉ. विखे यांनी उपस्थित केला.

अहमदनगर : राज्यातील सरकार लोकनियुक्त नसून षडयंत्राचे सरकार आहे. त्यांनी अतिवृष्टीत जे दौरे केले आणि पक्ष प्रवेशावर जो वारेमाप खर्च सुरु आहे, तो जरी टाळला असता तरी शेतकर्यांना हेक्टरी १० ऐवजी १२ हजारांची मदत मिळाली असती. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राज्यातील मंत्र्यांनी नेमके पहिले काय ?असा खोचक सवाल खासदार डॉ. विखे यांनी उपस्थित केला.

नगर-जामखेड राष्ट्रीय मार्गाच्या कामाच्या भूमिपूजनाच्या शनिवारी कार्यक्रमात खासदार डॉ.सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राज्यसरकावर चांगलीच आगपाखड केली. 

नगर तालुक्यातील दशमी गव्हाण येथे सुमारे २२ कोटी रुपये खर्चाच्या नगर -जामखेड राष्ट्रीय मार्गाच्या नूतनीकरण आणि डांबरीकरण कामाचे भूमिपूजन डॉ.विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.पाचपुते, माजी आमदार कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग  उपस्थित होते.

राज्यात अतिवृष्टी झाली आणि मोठे मोठे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यावेळी कोणी कांदा तर कोणी सोयाबीन हातात घेऊन फोटोसेशन केले. त्यांचे दौरे ही हायफाय होते.हेलिकॉप्टरमधून दौरे करून मोठा खर्च केला. पक्ष प्रवेशही हेलिकॉप्टरमधून सुरु आहेत. यांनी हा सगळा खर्च वाचवला असता तर शेतकर्यांना जी १० हजाराची हेक्टरी मदत दिली ती १२ हजारांनी मिळाली असती. यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नेमके काय पहिले? असा सवाल  विखे यांनी केला.

पावसाने सर्व रस्त्यांची वाट लावली. पण राज्य सरकार प्रत्येक वेळी केंद्राकडे पाहते. मग हे सरकार काय फक्त बदल्या करण्यात आणि आपल्या मतदार संघातील कामात व्यस्त आहे का? असा सवाल आ. पाचपुते यांनी केला.

सरकारने कोरोनाचा मृत्युदर लपवला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राला मदत मागितली जाते. हे विरोधात होते तेव्हा हेक्टरी ५० हजारांची मदत मागत होते. मग आता हा हात आखडता घेतला? असा सवाल माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेShivaji Kardileyआ. शिवाजी कर्डिलेBabanrao Pachaputeबबनराव पाचपुतेPoliticsराजकारण