शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

विधानसभेच्या १२ पैकी सात जागा काँग्रेसकडे घ्या; जिल्हाध्यक्षांची पक्षश्रेष्ठींकडे केली मागणी

By अरुण वाघमोडे | Updated: July 3, 2024 18:31 IST

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी मंगळवारी भेट घेऊन दिले मागणीचे पत्र

अरुण वाघमोडे, अहमदनगर: जिल्ह्यात विधानसभेचे बारापैकी संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत मात्र, नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव आणि अकोले या मतदारसंघातही पक्षाची चांगली ताकद आहे. त्यामुळे अगामी विधानसभा निवडणुकीत हे चारही मदारसंघ पक्षाकडे घ्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

याबाबत वाघ यांनी या दोन्ही नेत्यांची मंगळवारी भेट घेऊन त्यांना पत्र दिले आहे. वाघ यांनी म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. या विजयात काँग्रेसच सिंहाचा वाटा आहे.

जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. यात शिर्डी शिवसेना तर अहमदनगर राष्ट्रवादीकडे आहे. विधानसभेच्या एकुण १२ जागा आहेत. यापैकी आपल्या काँग्रेसकडे संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी अशा केवळ तीनच जागा आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला आणखी ४ जागा मिळणे गरजेचे आहे. त्यात श्रीगोंदा, नगर शहर, कोपरगांव व अकोला या जागा प्रधान्यक्रमाने घेणे गरजेचे असून जिल्ह्यातील या सातही मतदारसंघात आपल्या पक्षाची खूप चांगली ताकद असून या मतदारसंघातून आपल्या नेतृत्वातून व पक्ष संघटनामुळे पक्षाचे उमेदवार नक्कीच विजयी होतील. त्यामुळे १२ पैकी ७ विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडे घ्यावेत, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस