शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या १२ पैकी सात जागा काँग्रेसकडे घ्या; जिल्हाध्यक्षांची पक्षश्रेष्ठींकडे केली मागणी

By अरुण वाघमोडे | Updated: July 3, 2024 18:31 IST

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी मंगळवारी भेट घेऊन दिले मागणीचे पत्र

अरुण वाघमोडे, अहमदनगर: जिल्ह्यात विधानसभेचे बारापैकी संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी हे तीन मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत मात्र, नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव आणि अकोले या मतदारसंघातही पक्षाची चांगली ताकद आहे. त्यामुळे अगामी विधानसभा निवडणुकीत हे चारही मदारसंघ पक्षाकडे घ्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

याबाबत वाघ यांनी या दोन्ही नेत्यांची मंगळवारी भेट घेऊन त्यांना पत्र दिले आहे. वाघ यांनी म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. या विजयात काँग्रेसच सिंहाचा वाटा आहे.

जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. यात शिर्डी शिवसेना तर अहमदनगर राष्ट्रवादीकडे आहे. विधानसभेच्या एकुण १२ जागा आहेत. यापैकी आपल्या काँग्रेसकडे संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी अशा केवळ तीनच जागा आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला आणखी ४ जागा मिळणे गरजेचे आहे. त्यात श्रीगोंदा, नगर शहर, कोपरगांव व अकोला या जागा प्रधान्यक्रमाने घेणे गरजेचे असून जिल्ह्यातील या सातही मतदारसंघात आपल्या पक्षाची खूप चांगली ताकद असून या मतदारसंघातून आपल्या नेतृत्वातून व पक्ष संघटनामुळे पक्षाचे उमेदवार नक्कीच विजयी होतील. त्यामुळे १२ पैकी ७ विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडे घ्यावेत, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस