शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 07:19 IST

१९६९ मध्ये प्रत्यक्ष कारखाना सुरू झाला. याकामी दत्ता देशमुख,  भास्करराव दुर्वे,  भाऊसाहेब थोरात,  दत्ताजीराव मोरे,  पंढरीनाथ आंबरे आदी मंडळींची त्यांना मोलाची साथ लाभली.

संगमनेर (अहमदनगर) : राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे सोमवारी (१६ सप्टेंबर) पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील रंगारगल्ली येथील त्यांच्या राहात्या घरी निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. खताळ पाटील यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी चार वाजता शहरातील प्रवरा नदीतिरावरील अमरधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

राज्याच्या राजकारण, सहकार, शेती, शिक्षण, साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या खताळ पाटील यांचा जन्म १६ मार्च १९१९ ला संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे झाला. त्यांचे शिक्षण धांदरफळ, संगमनेर, बडोदा, पुणे इथे झाले. सन १९४३ ते १९६२ याकाळात नामांकित वकील म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. १९५२ ला कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमधून पहिली निवडणूक त्यांनी लढवली होती. या निवडणुकीत दत्ता देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. १९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्र व्हावा असे त्यांना मनापासून वाटत होते. मात्र, कॉंग्रेसची भूमिका यासाठी अनुकूल नसल्याने त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. १९६२ च्या निवडणुकीत मध्ये पहिल्यांदा ते कॉंग्रेसच्या वतीने विजयी झाले. १९५८ च्या सुमारास संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना उभारणीची संकल्पना घेऊन कारखान्याचे मुख्य प्रवर्तक (चीफ प्रमोटर) म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती.

१९६९ मध्ये प्रत्यक्ष कारखाना सुरू झाला. याकामी दत्ता देशमुख,  भास्करराव दुर्वे,  भाऊसाहेब थोरात,  दत्ताजीराव मोरे,  पंढरीनाथ आंबरे आदी मंडळींची त्यांना मोलाची साथ लाभली. १९६२ ला महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातील हयात असलेले एकमेव मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा. वयाच्या ६५ व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून स्वयंप्रेरणेने निवृत्ती घेतल्यावर योगा,  प्राणायाम, विपश्यना, चिंतन, मनन यात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले होते. १९६२ ते १९८५ या काळात आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीचा अपवाद वगळला तर सातत्याने कॉंग्रेस पक्षाच्यावतीने विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. दिवगंत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण,  दादासाहेब कन्नमवार, वसंतराव नाईक, ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, कृषी, नियोजन, सहकार, अन्न व नागरी पुरवठा,  विधी व न्याय,  प्रसिद्धी, माहिती, परिवहन आदी खात्यांचे मंत्रिपद भूषविले. आणि या प्रत्येक खात्यावर आपल्या कर्तृत्वाची छाप टाकली. राज्यात त्यांच्या काळात सर्वाधिक धरणांची निर्मिती झाली. कोल्हापूरचे दुधगंगा- वेदगंगा, सांगलीचे चांदोली-नांदोली, साताºयाचे धोम,  पुण्याचे चासकमान, वध्यार्चे अप्पर वर्धा, नांदेडचे विष्णुपुरी याचबरोबर राहुरीच्या मुळा धरणाला गती देण्याचे कामही त्यांच्याच काळात झाले. कठोर शिस्त, कमालीची तत्वनिष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे राज्यात वेगळी ओळख होती. त्यांनी वयाच्या ९३ वर्षी लिहायला सुरुवात करत पुढील आठ नऊ वर्षात सात पुस्तके लिहिली. वाळ्याची शाळा हे पुस्तक वयाच्या १०१ व्या वर्षी लिहून देशातील सर्वात वयोवृद्ध लेखक म्हणून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

टॅग्स :congressकाँग्रेस