शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 07:19 IST

१९६९ मध्ये प्रत्यक्ष कारखाना सुरू झाला. याकामी दत्ता देशमुख,  भास्करराव दुर्वे,  भाऊसाहेब थोरात,  दत्ताजीराव मोरे,  पंढरीनाथ आंबरे आदी मंडळींची त्यांना मोलाची साथ लाभली.

संगमनेर (अहमदनगर) : राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे सोमवारी (१६ सप्टेंबर) पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील रंगारगल्ली येथील त्यांच्या राहात्या घरी निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. खताळ पाटील यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी चार वाजता शहरातील प्रवरा नदीतिरावरील अमरधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

राज्याच्या राजकारण, सहकार, शेती, शिक्षण, साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या खताळ पाटील यांचा जन्म १६ मार्च १९१९ ला संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे झाला. त्यांचे शिक्षण धांदरफळ, संगमनेर, बडोदा, पुणे इथे झाले. सन १९४३ ते १९६२ याकाळात नामांकित वकील म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. १९५२ ला कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमधून पहिली निवडणूक त्यांनी लढवली होती. या निवडणुकीत दत्ता देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. १९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्र व्हावा असे त्यांना मनापासून वाटत होते. मात्र, कॉंग्रेसची भूमिका यासाठी अनुकूल नसल्याने त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. १९६२ च्या निवडणुकीत मध्ये पहिल्यांदा ते कॉंग्रेसच्या वतीने विजयी झाले. १९५८ च्या सुमारास संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना उभारणीची संकल्पना घेऊन कारखान्याचे मुख्य प्रवर्तक (चीफ प्रमोटर) म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती.

१९६९ मध्ये प्रत्यक्ष कारखाना सुरू झाला. याकामी दत्ता देशमुख,  भास्करराव दुर्वे,  भाऊसाहेब थोरात,  दत्ताजीराव मोरे,  पंढरीनाथ आंबरे आदी मंडळींची त्यांना मोलाची साथ लाभली. १९६२ ला महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातील हयात असलेले एकमेव मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा. वयाच्या ६५ व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून स्वयंप्रेरणेने निवृत्ती घेतल्यावर योगा,  प्राणायाम, विपश्यना, चिंतन, मनन यात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले होते. १९६२ ते १९८५ या काळात आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीचा अपवाद वगळला तर सातत्याने कॉंग्रेस पक्षाच्यावतीने विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. दिवगंत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण,  दादासाहेब कन्नमवार, वसंतराव नाईक, ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, कृषी, नियोजन, सहकार, अन्न व नागरी पुरवठा,  विधी व न्याय,  प्रसिद्धी, माहिती, परिवहन आदी खात्यांचे मंत्रिपद भूषविले. आणि या प्रत्येक खात्यावर आपल्या कर्तृत्वाची छाप टाकली. राज्यात त्यांच्या काळात सर्वाधिक धरणांची निर्मिती झाली. कोल्हापूरचे दुधगंगा- वेदगंगा, सांगलीचे चांदोली-नांदोली, साताºयाचे धोम,  पुण्याचे चासकमान, वध्यार्चे अप्पर वर्धा, नांदेडचे विष्णुपुरी याचबरोबर राहुरीच्या मुळा धरणाला गती देण्याचे कामही त्यांच्याच काळात झाले. कठोर शिस्त, कमालीची तत्वनिष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे राज्यात वेगळी ओळख होती. त्यांनी वयाच्या ९३ वर्षी लिहायला सुरुवात करत पुढील आठ नऊ वर्षात सात पुस्तके लिहिली. वाळ्याची शाळा हे पुस्तक वयाच्या १०१ व्या वर्षी लिहून देशातील सर्वात वयोवृद्ध लेखक म्हणून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

टॅग्स :congressकाँग्रेस