शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 07:19 IST

१९६९ मध्ये प्रत्यक्ष कारखाना सुरू झाला. याकामी दत्ता देशमुख,  भास्करराव दुर्वे,  भाऊसाहेब थोरात,  दत्ताजीराव मोरे,  पंढरीनाथ आंबरे आदी मंडळींची त्यांना मोलाची साथ लाभली.

संगमनेर (अहमदनगर) : राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे सोमवारी (१६ सप्टेंबर) पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील रंगारगल्ली येथील त्यांच्या राहात्या घरी निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. खताळ पाटील यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी चार वाजता शहरातील प्रवरा नदीतिरावरील अमरधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

राज्याच्या राजकारण, सहकार, शेती, शिक्षण, साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या खताळ पाटील यांचा जन्म १६ मार्च १९१९ ला संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे झाला. त्यांचे शिक्षण धांदरफळ, संगमनेर, बडोदा, पुणे इथे झाले. सन १९४३ ते १९६२ याकाळात नामांकित वकील म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. १९५२ ला कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमधून पहिली निवडणूक त्यांनी लढवली होती. या निवडणुकीत दत्ता देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. १९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्र व्हावा असे त्यांना मनापासून वाटत होते. मात्र, कॉंग्रेसची भूमिका यासाठी अनुकूल नसल्याने त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. १९६२ च्या निवडणुकीत मध्ये पहिल्यांदा ते कॉंग्रेसच्या वतीने विजयी झाले. १९५८ च्या सुमारास संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना उभारणीची संकल्पना घेऊन कारखान्याचे मुख्य प्रवर्तक (चीफ प्रमोटर) म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती.

१९६९ मध्ये प्रत्यक्ष कारखाना सुरू झाला. याकामी दत्ता देशमुख,  भास्करराव दुर्वे,  भाऊसाहेब थोरात,  दत्ताजीराव मोरे,  पंढरीनाथ आंबरे आदी मंडळींची त्यांना मोलाची साथ लाभली. १९६२ ला महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातील हयात असलेले एकमेव मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा. वयाच्या ६५ व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून स्वयंप्रेरणेने निवृत्ती घेतल्यावर योगा,  प्राणायाम, विपश्यना, चिंतन, मनन यात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले होते. १९६२ ते १९८५ या काळात आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीचा अपवाद वगळला तर सातत्याने कॉंग्रेस पक्षाच्यावतीने विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. दिवगंत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण,  दादासाहेब कन्नमवार, वसंतराव नाईक, ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, कृषी, नियोजन, सहकार, अन्न व नागरी पुरवठा,  विधी व न्याय,  प्रसिद्धी, माहिती, परिवहन आदी खात्यांचे मंत्रिपद भूषविले. आणि या प्रत्येक खात्यावर आपल्या कर्तृत्वाची छाप टाकली. राज्यात त्यांच्या काळात सर्वाधिक धरणांची निर्मिती झाली. कोल्हापूरचे दुधगंगा- वेदगंगा, सांगलीचे चांदोली-नांदोली, साताºयाचे धोम,  पुण्याचे चासकमान, वध्यार्चे अप्पर वर्धा, नांदेडचे विष्णुपुरी याचबरोबर राहुरीच्या मुळा धरणाला गती देण्याचे कामही त्यांच्याच काळात झाले. कठोर शिस्त, कमालीची तत्वनिष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे राज्यात वेगळी ओळख होती. त्यांनी वयाच्या ९३ वर्षी लिहायला सुरुवात करत पुढील आठ नऊ वर्षात सात पुस्तके लिहिली. वाळ्याची शाळा हे पुस्तक वयाच्या १०१ व्या वर्षी लिहून देशातील सर्वात वयोवृद्ध लेखक म्हणून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

टॅग्स :congressकाँग्रेस