शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

...जेव्हा कॅबिनेट मंत्र्याचा भाचाच म्हणतो, “ठाकरे सरकारला जाग येणार का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 13:47 IST

सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडी सरकाराला घराचा आहेर दिला आहे.

अहमदनगर : शिवसेनेचे कोपरगाव उपतालुकाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना रविवारी समोर आली आहे. तर याच घटनेवरून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ह्या हत्यानंतर तरी सरकाराला जाग येणार का ? असा सवाला त्यांनी उपस्थित केला आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक इशू सिंधू हे लंडनला दोन वर्षांच्या शिक्षणासाठी गेल्याने नगरचे पोलिस अधीक्षकपद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त झाले आहे. सध्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे या पदाचा कारभार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णवेळ पोलीस अधीक्षक देण्याची मागणी होत आहे. मात्र याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळाले.

तर याच मुद्यावरून सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडी सरकाराला घराचा आहेर दिला आहे. तांबे यांनी ट्वीट करत म्हंटलं आहे की, अहमदनगर सारख्या संवेदनशील व राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्याला गेले ३ महिने पूर्णवेळ पोलिस अधिक्षक नाहीत. त्यामुळे आता शिवसेना नेत्याची हत्या झाल्यावर तरी सरकारला जाग येणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरण ?

भोजडे गावात रविवारी शिवसेनेचे कोपरगाव उपतालुकाप्रमुख सुरेश शामराव गिरे यांच्यावर चारचाकी वाहनातून येऊन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात गिरे हे जागीच ठार झाले. तर गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर तत्काळ त्याच गाडीतून पसार झाले. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.