शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

...जेव्हा कॅबिनेट मंत्र्याचा भाचाच म्हणतो, “ठाकरे सरकारला जाग येणार का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 13:47 IST

सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडी सरकाराला घराचा आहेर दिला आहे.

अहमदनगर : शिवसेनेचे कोपरगाव उपतालुकाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना रविवारी समोर आली आहे. तर याच घटनेवरून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ह्या हत्यानंतर तरी सरकाराला जाग येणार का ? असा सवाला त्यांनी उपस्थित केला आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक इशू सिंधू हे लंडनला दोन वर्षांच्या शिक्षणासाठी गेल्याने नगरचे पोलिस अधीक्षकपद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त झाले आहे. सध्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे या पदाचा कारभार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णवेळ पोलीस अधीक्षक देण्याची मागणी होत आहे. मात्र याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळाले.

तर याच मुद्यावरून सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडी सरकाराला घराचा आहेर दिला आहे. तांबे यांनी ट्वीट करत म्हंटलं आहे की, अहमदनगर सारख्या संवेदनशील व राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्याला गेले ३ महिने पूर्णवेळ पोलिस अधिक्षक नाहीत. त्यामुळे आता शिवसेना नेत्याची हत्या झाल्यावर तरी सरकारला जाग येणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरण ?

भोजडे गावात रविवारी शिवसेनेचे कोपरगाव उपतालुकाप्रमुख सुरेश शामराव गिरे यांच्यावर चारचाकी वाहनातून येऊन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात गिरे हे जागीच ठार झाले. तर गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर तत्काळ त्याच गाडीतून पसार झाले. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.