शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

काँग्रेसचे हल्लबोल आंदोलन: कांदा निर्यातबंदी मागे घ्या, दुधाला भाव द्या!

By अरुण वाघमोडे | Updated: December 12, 2023 19:44 IST

हे व्यापाऱ्यांचे सरकार असल्याचे कृतीतून सिद्ध होते, असाही आरोप

अरुण वाघमाेडे, अहमदनगर: कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी, दुधाला चांगला दर द्यावा, इथेनॉल बंदी उठवावी, यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पक्षाच्या ओबीसी सेलच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, राजेंद्र वाघमारे, संतोष लोंढे, राहुल उगले, शहाजीराजे भोसले, किरण पाटील, संभाजी रोहकले, शोभा पाथारे, अनिल म्हस्के, बाळासाहेब आढाव, नासीरभाई शेख आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.

याप्रसंगी बोलताना नागवडे म्हणाले, केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. हे व्यापाऱ्यांचे सरकार असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. इथेनॉल बंदी, कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी, दुधाला चांगला भाव द्याव, पीक विम्याचा अग्रीम हप्ता तातडीने शेतकऱ्यांना द्यावा.

भुजबळ म्हणाल्या, तोडा फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची रणनीती केंद्र व राज्य सरकार वापरत असून हुकूमशाहीपणा करत आहे. त्यामुळे यांच्यापेक्षा इंग्रज बरे असे म्हणायची वेळ आली आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे असं आपण अभिमानानं म्हणतो मग या देशात मोदी सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय कसे करु शकतात कारण शेतकरी वाचला तर देश वाचणार आहे. सरकार मात्र, शेतकऱ्यांची दिशाभूल का करत आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित अनुदान मिळावे. अग्रीम विमा सर्व शेतकऱ्यांना मिळावा, नगर दक्षिण मधील तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत तसेच शेतकऱ्यांना मागील थकीत अनुदान देण्यात यावे. जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :congressकाँग्रेस