शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संख्याबळ निश्चितीवरून मनपा महासभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 23:49 IST

अहमदनगर : स्थायी समितीवर सदस्यांची नियुक्ती करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीव्रपणे आक्षेप घेतला.

अहमदनगर : राजकीय पक्षांचे संख्याबळ चुकीच्या पद्धतीने निश्चित करून व बेकायदेशीर प्रक्रिया राबवून स्थायी समितीवर सदस्यांची नियुक्ती करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीव्रपणे आक्षेप घेतला. स्थायी समितीचे सदस्य नियुक्तीबाबत महापालिका अधिनियमातील कलम ३१(अ)ची माहिती अधिकाऱ्यांनी न दिल्याने महासभेत तब्बल तासभर गोंधळ झाला. मात्र याच गोंधळात स्थायीच्या सदस्यांची नियुक्ती झाल्याची घोषणा करून महापौरांनी सभा आटोपती घेतली. सदस्य नियुक्तीबाबत जिल्हाधिकारी यांचा लेखी अभिप्राय सभेत सादर न केल्याने सभेनंतरही महापालिकेत दिवसभर गोंधळ सुरू होता.कोपर्डी येथील मुलीवरील अत्याचार व खूनप्रकरणी विरोधी नगरसेवकांनी तीव्र शब्दात निषेध केला. त्यानंतर कोपर्डीच्या निर्भयाला महासभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सभेचे नियोजित कामकाज सुरू झाले. सुरवातीलाच माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी संख्याबळ निश्चितीला अत्यंत आक्रमक पद्धतीने आक्षेप घेतला. याबाबतचे कलम ३१ (अ) काय आहे, हे सभागृहाला वाचून दाखवावे, जिल्हाधिकारी यांनी नगरसचिवांना नेमका अभिप्राय काय दिला आहे, याची सभागृहाला माहिती द्यावी, याबाबत कळमकर यांनी वारंवार मागणी केली. मात्र याबाबत प्रभारी आयुक्त, महापौर, नगरसचिव यांनी तासभर मौन धारण केले. यावरूनच सेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. स्वप्नील शिंदे, कुमारसिंह वाकळे, संपत बारस्कर यांनीही बेकायदेशीर प्रक्रियेला आक्रमकपणे विरोध केला. पाऊण तासांच्या गोंधळानंतर महापौरांच्या सूचनेवरून नगरसचिवांनी कलम ३१(अ) वाचून दाखविले, मात्र जिल्हाधिकारी यांनी दिलेला अभिप्राय वाचून न दाखविल्याने गोंधळात भर पडली. आमचे नगरसेवक शांत आहेत, या महापौरांच्या वाक्याला स्वप्नील शिंदे यांनी आक्षेप घेतला. महापौरांनी आमचे-तुमचे असा भेद केल्यावरून सभागृहात गदारोळ सुरू झाला. याचवेळी दोन-तीन वेळा विरोधी नगरसेवकांनी महापौर-नगरसचिवांना व्यासपीठावर चढून घेराव घातला. गॅलरीमधील उपस्थितांचा गोंधळ सुरू झाल्याने त्यांना बाहेर काढण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक करीत होते. (प्रतिनिधी)\नगरसचिवांची पळवापळवीनगरसचिव मिलिंद वैद्य यांना जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षाच्या काही नगरसेवकांनी पळवून नेले. त्यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून गटनेतेपदाचे पत्र लिहून घेतल्याचा आरोप सेनेचे नगरसेवक अनिल शिंदे, दिलीप सातपुते, सचिन जाधव यांनी केला आहे. तर सभेच्या आदल्यादिवशी सेनेच्या नगरसेवकांनी वैद्य यांना पळवून नेले होते, असा आरोप कळमकर यांनी केला. ‘नगरसचिवांना एक दिवस तुम्ही पळविले आणि एक दिवस आम्ही पळविले, असे अनिल शिंदे यांनी कळमकर यांना ठासून सांगितले. त्यावरही सभेनंतर बराच गोंधळ झाला. शिंदे यांनी वैद्य यांना पळविल्याची एकप्रकारे कबुलीच दिली आहे, असे कळमकर यांनी पत्रकारांना सांगितले.