शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

नगर तालुक्यातील दोन हजार शेतक-यांना अतिवृष्टीची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 16:36 IST

नगर तालुक्यातील दोन हजार शेतक-यांना अतिवृष्टीची भरपाई मिळाली आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्यातील शेतक-यांच्या शेतमालाचे नुकसान झाले होते.

केडगाव : नगर तालुक्यातील दोन हजार शेतक-यांना अतिवृष्टीची भरपाई मिळाली आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्यातील शेतक-यांच्या शेतमालाचे नुकसान झाले होते.

नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये शेतक-यांना नुकसान भरपाई मिळाली होती. मात्र नगर तालुक्यातील शेतकरी यापासून वंचित होते.  तालुक्यातील २७ गावातील १ हजार ८४० शेतक-यांच्या बॅँक खात्यामध्ये अनुदान वर्ग झालेले नव्हते. याकडे काही दिवसांपूर्वी शेतक-यांनी खासदार सुजय विखे यांचे शेतक-यांनी लक्ष वेधले होते. त्यावेळी विखे यांनी तातडीने प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून तातडीने नुकसान भरपाई शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर शेतक-यांचे अनुदान जमा झाले. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर अनुदान मिळाल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या सर्व योजना समाजातील लोकसभा मतदारसंघांमध्ये राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शेतक-यांच्या हितासाठी केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतलेले आहेत. पीक विमा योजनेचे पैसे प्रत्यक्षात शेतक-यांच्या खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे शेतक-यांनी कृषी विभागामार्फत अधिकाधिक योजनांची माहिती करून घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विखे यांनी केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीGovernmentसरकार