शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 16:12 IST

पूरग्रस्तांसाठी साखर कारखान्यांच्या नफ्यातून प्रतिटन ५ रुपये देण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.

CM Devendra Fadnavis: राज्यातील पूरग्रस्तांसाठी साखर कारखान्यांच्या नफ्यातून प्रतिटन ५ रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीत १० रुपये घेतले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याने विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांवर मोठे संकट आलेले असताना राज्य सरकारने  पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांवरचाच बोजा वाढवल्याचा आरोप विरोधकांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही शेतकऱ्यांना एफआरपीद्वारे मदत मागितली होती, परंतु काही साखर कारखाने मालकांनी आम्हाला विरोध केला. काही लोक या आपत्तीचे राजकारण करत आहेत पण आम्ही लवकरच शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास ६० लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे. दुसरीकडे, यंदा म्हणजेच २०२५-२६ चा गाळप हंगाम सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक पार पडली ज्यात १ नोव्हेंबर पासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय झाला. या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन १५ रुपये कपात करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यातील ५ रुपये थेट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि १० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयावर अहिल्यानगर येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. "मागच्या काळात ज्यावेळेस उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की, तीस तीस हजार कोटी रुपयांचे व्यवहार होत आहे. दहा हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे तर तुमच्या नफ्यातून पाच रुपये हे शेतकऱ्यांकरिता बाजूला काढून ठेवा. ते पैसे एफआरपीमधून मागितले नव्हते. एफआरपीचे पैसे हे शेतकऱ्याचे आहेत. नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत. आपण जर विचार केला तर या ठिकाणी २०० कारखाने आहेत. फार फार तर २५ लाख रुपये एका शेतकऱ्यासाठी बाजूला काढून द्यायला सांगितलं. तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी असा गजब उभा केला. म्हणाले की शेतकऱ्यांकडून तुम्ही पैसे वसूल करत आहात. आम्ही शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत नाही आहोत तर आम्ही तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातून २५ लाख रुपये हे जो शेतकरी तुमच्याकडे शेतमाल टाकतो, तुमच्यासाठी राबराब राबतो, हाडाची काडं करतो, रक्ताचे पाणी करतो त्या शेतकऱ्यासाठी देत आहोत. अशा प्रकारची आपत्ती आल्यावर आम्ही तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितले तेव्हा तुम्ही मागे पुढे पाहता. आता मी असे काही कारखाने शोधून काढले आहेत. ज्यांच्याकडे शेतकऱ्याच्या मालाला काटा मारला जातो त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून तिथे पैसे जमा करताय आणि शेतकऱ्यांकरिता २५ लाख रुपये द्या म्हटलं की तुम्हाला देण्याची दानत नाहीये," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"तुम्ही मालक नाही आहात. त्या कारखान्याचा मालक आमचा शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहण्याचे काम सरकार निश्चितपणे करणार आहे   आज आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आलेली आहे. अहिल्यानगर मध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस आला. ही लोकं आपत्तीचही राजकारण करू इच्छितात. पण त्यांना मी सांगतो की काळजी करू नका आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही शेतकऱ्याला जास्तीत जास्त काय मदत करता येईल या संदर्भात आराखडा तयार करायला सुरुवात केली आहे. तुम्ही आरशात पहा, तुम्ही असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं हे आधी दाखवून द्या आणि मग आमच्यावर टीका करा. आमच्यावर कोणीही टीका केली तरी आम्ही परवा करणारी लोक नाही आहोत," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAhilyanagarअहिल्यानगरSugar factoryसाखर कारखाने