शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

ढग येती अन् जाती; आशेची होतीय माती, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा

By साहेबराव नरसाळे | Updated: July 23, 2023 19:23 IST

जिल्ह्यात या वर्षी खरिप हंगामाच्या सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी लांबली.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : मागील ५ दिवसांपासून रोज ढग येतात. त्यापाठोपाठ हवामान खात्याचा पावसाचा इशाराही येतो. मात्र, पाऊस न पडता ढग तसेच निघून जातात. आभाळाकडे नजरा लावून बसलेला शेतकरी पुन्हा माना टाकलेल्या पिकांकडे पाहत ओशाळून जातो, असे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. मागील पाच दिवसात जिल्ह्यात अवघा १९ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे जमिनीत असलेली ओलदेखील झपाट्याने कमी होत आहे. परिणामी पिके सुकू लागली आहेत.

    जिल्ह्यात या वर्षी खरिप हंगामाच्या सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी लांबली. हंगाप पूर्णपेण वाया जाऊ नये म्हणून थोड्याशा ओलीवर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणीनंतर तरी चांगला पाऊस होईल व पिके जोमाने येतील, या आशेवर शेतकरी होता. मात्र, पेरणीनंतरही पावसाने पाठ फिरवली. उगवून आलेली पिके आता माना टाकू लागली आहेत. आता दुबार पेरणीची वेळही निघून गेली आहे. त्यामुळे उगवून आलेले पिक वाचावे, यासाठी शेतकऱ्यांची तगमग सुरु आहे. पावसाची रोज वाट पाहत आहेत. रोज ढग येतात अन् निघून जातात. पाऊस काही पडत नाही.मागील पाच दिवसातील पाऊसदिनांक          झालेला पाऊस१९ जुलै          १४.२ मिली२० जुलै          ०.६ मिली२१ जुलै            १.१ मिली२२ जुलै            २.७ मिली२३ जुलै              ०.५ मिलीएकूण                  १९.२ मिलीसंगमनेर तालुक्यात अवघी २० टक्के पेरणीसंगमनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात अत्यंत कमी म्हणजेच अवघी २० टक्के पेरणी झाली आहे. संगमनेर तालुक्यात खरिपाचे ५० हजार ८५० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी १० हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल कर्जत तालुक्यात ३९ टक्के पेरणी झालेली आहे. कर्जत तालुक्यात खरिपाचे ५२ हजार ३९६ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी २० हजार ७८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.धरणांमधून पाणी सोडलेधरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. भंडारदरा धरणातून प्रवरा नदी ८३५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात १२५० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. कुकडी प्रकल्पाच्या पाणलोटातून भिमा नदीत १७५४४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

टॅग्स :Rainपाऊस