शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

ढग येती अन् जाती; आशेची होतीय माती, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा

By साहेबराव नरसाळे | Updated: July 23, 2023 19:23 IST

जिल्ह्यात या वर्षी खरिप हंगामाच्या सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी लांबली.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : मागील ५ दिवसांपासून रोज ढग येतात. त्यापाठोपाठ हवामान खात्याचा पावसाचा इशाराही येतो. मात्र, पाऊस न पडता ढग तसेच निघून जातात. आभाळाकडे नजरा लावून बसलेला शेतकरी पुन्हा माना टाकलेल्या पिकांकडे पाहत ओशाळून जातो, असे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. मागील पाच दिवसात जिल्ह्यात अवघा १९ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे जमिनीत असलेली ओलदेखील झपाट्याने कमी होत आहे. परिणामी पिके सुकू लागली आहेत.

    जिल्ह्यात या वर्षी खरिप हंगामाच्या सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी लांबली. हंगाप पूर्णपेण वाया जाऊ नये म्हणून थोड्याशा ओलीवर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणीनंतर तरी चांगला पाऊस होईल व पिके जोमाने येतील, या आशेवर शेतकरी होता. मात्र, पेरणीनंतरही पावसाने पाठ फिरवली. उगवून आलेली पिके आता माना टाकू लागली आहेत. आता दुबार पेरणीची वेळही निघून गेली आहे. त्यामुळे उगवून आलेले पिक वाचावे, यासाठी शेतकऱ्यांची तगमग सुरु आहे. पावसाची रोज वाट पाहत आहेत. रोज ढग येतात अन् निघून जातात. पाऊस काही पडत नाही.मागील पाच दिवसातील पाऊसदिनांक          झालेला पाऊस१९ जुलै          १४.२ मिली२० जुलै          ०.६ मिली२१ जुलै            १.१ मिली२२ जुलै            २.७ मिली२३ जुलै              ०.५ मिलीएकूण                  १९.२ मिलीसंगमनेर तालुक्यात अवघी २० टक्के पेरणीसंगमनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात अत्यंत कमी म्हणजेच अवघी २० टक्के पेरणी झाली आहे. संगमनेर तालुक्यात खरिपाचे ५० हजार ८५० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी १० हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल कर्जत तालुक्यात ३९ टक्के पेरणी झालेली आहे. कर्जत तालुक्यात खरिपाचे ५२ हजार ३९६ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी २० हजार ७८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.धरणांमधून पाणी सोडलेधरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. भंडारदरा धरणातून प्रवरा नदी ८३५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात १२५० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. कुकडी प्रकल्पाच्या पाणलोटातून भिमा नदीत १७५४४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

टॅग्स :Rainपाऊस