शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

इंग्रजांचा प्रोटोकॉल बंद करा; अण्णांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 05:23 IST

इंग्रजांच्या राजवटीतील प्रोटोकॉल बंद करा. लोकशाहीत जनता मालक व अधिकारी सेवक आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले पाहिजे.

राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : इंग्रजांच्या राजवटीतील प्रोटोकॉल बंद करा. लोकशाहीत जनता मालक व अधिकारी सेवक आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले पाहिजे. लोकशाहीत लोकाभिमुख शासन व प्रशासन असायला हवे, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी दिलेल्या एका पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.हजारे यांनी या पत्रकात म्हटले आहे की, इंग्रज या देशातून जाऊन ७२ वर्षे उलटली आहेत. मात्र इंग्रजांनी केलेला प्रोटोकॉल आजही आहे. प्रोटोकॉल म्हणजे लोकशाहीवरचा आघात आहे. पण सरकारला तसे का वाटत नाही? सेवक खुर्चीमध्ये बसून मालकाची निवेदने घेत नसतील तर हा लोकशाहीचा व लोकतंत्राचा अवमान आहे. हजारे यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून राळेगणसिद्धी ग्रामस्थांच्या वतीने ४ फेब्रुवारीला अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे प्रोटोकॉलचे कारण देत मोर्चेकºयांचे निवेदन स्वीकारायला आले नव्हते. याबद्दल हजारे यांनी उपोषण सोडताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत प्रोटोकॉल रद्द करण्याची मागणी केली होती.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे