शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये मतदानासाठी आल्या ११,६९५ शाईच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 15:43 IST

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मुंबई येथील प्रिंटींग प्रेसमधून ११ हजार ६९५ शाईच्या बाटल्या जिल्ह्यासाठी पाठविल्या आहेत. मतदान केल्याची निशाणी म्हणून जिल्ह्यातील ३४ लाख ७३ हजार ७४३ मतदारांच्या बोटावर ही शाई लावण्यात येणार आहे. 

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मुंबई येथील प्रिंटींग प्रेसमधून ११ हजार ६९५ शाईच्या बाटल्या जिल्ह्यासाठी पाठविल्या आहेत. मतदान केल्याची निशाणी म्हणून जिल्ह्यातील ३४ लाख ७३ हजार ७४३ मतदारांच्या बोटावर ही शाई लावण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे सहा दिवस उरले आहेत. २१ आॅक्टोबर रोजी मतदान असून त्यादृष्टीने प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. यानिमित्त निवडणूक आयोगाकडून सर्व साहित्य जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. आवश्यक स्टेशनरी, फिलिंग पेपर, फक्की, ईव्हीएम मशीनसाठी लागणारे कव्हर, तसेच मतदारांच्या हाताला लावण्यात येणारी शाई आदी साहित्याचा त्यात समावेश आहे. आलेले हे सर्व साहित्य १२ मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिका-यांकडे पाठविण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर मतदारांच्या तर्जनीवर (अंगठ्याशेजारचे बोट) निळी शाई लावण्यात येते. जिल्ह्यात ३ हजार ७२२ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक बूथवर तीन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहेत. एका बाटलीत १० मिली निळी शाई असते. एका बाटलीत किमान ३५० मतदारांना पुरेल एवढी शाई असते. यासाठी मुंबईहून ११ हजार ६९५ (११ लिटर) शाईच्या बाटल्या प्राप्त झाल्या आहेत. बोटावर लावलेली शाई कमीत कमी महिनाभर पुसली जात नाही. या शाईमुळे बोगस मतदानाला आळा बसला आहे. १९६२ च्या निवडणुकीत पहिल्यांदा शाईचा वापरदेशात सर्वप्रथम १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणाºया मतदारांच्या बोटावर शाई लावण्यात आली होती. तेव्हापासून सर्व निवडणुकीत शाईचाच वापर करण्यात येत आहे. खास मतदानावेळी वापरण्यात येणारी शाई म्हैसूर येथील एका कंपनीमध्ये तयार करण्यात येते. भारतात उत्पादित या शाईचा वापर २५ देश त्यांच्या निवडणुकीत करतात. बोटावर शाईने आखली जाते उभी रेषा२००४ मधील निवडणुकीच्या वेळी मतदान करणा-या मतदारांच्या बोटावर निळ्या शाईचा केवळ एक ठिपका लावण्यात येत होता. मात्र २००६ मध्ये निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी उभी रेषा आखण्याचे निर्देश दिले. अर्ध्या नखावर व अर्ध्या बोटाच्या कातडीवर अशी रेषा मारली जात आहे. त्यामुळे आता पूर्वीच्या प्रमाणात शाई जास्त लागते.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019