शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नगर गारठले

By admin | Updated: November 28, 2014 01:16 IST

अहमदनगर : जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तापमानाचा पारा १०.३ अंशापर्यंत खाली आला आहे. राज्यातील सर्वात किमान तापमानाची नोंद नगरला झाली आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तापमानाचा पारा १०.३ अंशापर्यंत खाली आला आहे. राज्यातील सर्वात किमान तापमानाची नोंद नगरला झाली आहे. घरे गारठली आहेत, तर नदी-नाल्याकाठच्या परिसरात थंडीचा कडाका तीव्रतेने जाणवत आहे. थंडी मुळे डेंग्यू साथजन्य ताप असे आजार बळावण्याची शक्यता आहे. तर पिकांना ही थंडी लाभदायक ठरणार आहे. ऐन थंडीच्या दिवसात म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाल्यानं थंडी लांबली होती. पावसानंतर वातावरणात उष्णता होती. त्यामुळे थंडी पळाली की काय?अशीच स्थिती वातावरणात राहिली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा हळूहळू खाली सरकला आहे. बुधवारी नोंद झालेले नगरचे तापमान १०.३ अंश सेल्सिअस इतके होते. हे तापमान राज्यातील सर्वात कमी (किमान) असल्याचे पुणे वेधशाळेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. या भागात नगरचा समावेश आहे. सरासरी तापमान १३ अंशापर्यंत राहण्याची शक्यता व्यक्त झाली असली तरी येत्या दोन दिवसांमध्ये हे तापमान आणखी खाली घसरणार आहे. साधारणपणे ९ अंशापर्यंत हे तापमान खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री व पहाटेच्या वेळी ९ अंशावर, तर सकाळी व सायंकाळी १२ अंशापर्यंत तापमान आहे.(प्रतिनिधी) उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या तीव्रतेवर महाराष्ट्रातील थंडीची परिस्थिती अवलंबून आहे.उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आली आहे. तेथून येणारी शीतलहर महाराष्ट्रात येऊन धडकली आहे. त्या भागात शीत वारे जोराने वाहत आहेत. त्याचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. उत्तर भारतासोबत इशान्य दिशेकडून येणाऱ्या शुष्क व थंड वाऱ्यामुळे तापमानात कमाल व किमान घट झाली आहे. नगरचे कमाल तापमानही ३१ अंशावर आले आहे.गूळ खा, थंडीला पळवा४आयुर्वेदामध्ये गुळाला आरोग्यदृष्ट्या महत्त्व आहे.गूळ थंडीमध्ये जास्त ऊर्जा देणारा आहे. गूळ खाल्ल्याने रक्त वाढते, भूक वाढते. शक्तीवर्धक असलेला गूळ खाल्ल्याने सर्दी कमी होते.आल्यासोबत गूळ खाल्ला तर कफ नष्ट होतो. सुंठीसोबत गूळ खाल्ला तर वातविकार नष्ट होतो. तसेच थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे घालावेत, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. मुले जन्माला आली की त्यांना पाच दिवस कपडे घालू नयेत, ही जुनाट परंपरा आता बंद केली पाहिजे. जन्मत:च मुलांना स्वच्छ, सुती आणि उबदार कपडे घालावेत, अन्यथा मुलांची साखर कमी होणे, संसर्ग होण्याची भीती असते. थंडीमुळे सर्दी-खोकला असे आजार होत असल्याने कानटोपी घालून मुलांनी थंडीपासून रक्षण करावे. थंडीतही आईस्क्रीम खाण्याची पद्धत आजारांना निमंत्रण देणारीच आहे. सध्या डेंग्यू, फ्ल्यूसारखे आजार बळावले आहेत. त्यासाठी अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी मुलांची काळजी घ्यावी. बाहेरचे खाणे टाळावे.- डॉ. सुचित तांबोळी, बालरोगतज्ज्ञअहमदनगर : औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाथर्डी तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील सहा रस्त्यांच्या कामांची २७ व २८ नोव्हेंबर रोजी चौकशी होणार आहे. पाथर्डी तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता झाली आहे अशी याचिका अ‍ॅड. हरिहर गर्जे, अरविंद सोनटक्के, भागवत नरोटे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली आहे. या याचिकेनंतर या प्रकरणाची सहा महिन्यांत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचा आदेश खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. यातील पाच महिन्यांचा कालखंड संपला आहे. आगास खांड ते दुलेचांदगाव व इतर सहा रस्त्यांच्या कामांची चौकशी २७ व २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या चौकशीसाठी सर्व अधिकाऱ्यांना तसेच रोजगार सेवकांनाही कामाच्या ठिकाणी कागदपत्रांसह बोलविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)