शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

"नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे"

By शेखर पानसरे | Updated: April 24, 2023 18:47 IST

संगमनेरात पत्रकार परिषद ; महाराष्ट्र शासनाकडून गुन्हा घडला टीका

संगमनेर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा कार्यक्रम खारघर येथे झाला. शिंदे आणि फडणवीस सरकारने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. धर्माधिकारी यांच्यावर श्रद्धा असलेले लाखो भाविक त्यानिमित्ताने आले होते. उन्हाचा प्रचंड तडाखा होता, ४६ डिग्री पेक्षा जास्त तापमान होते. एवढ्या उन्हात लाखो भाविक बसल्याने उष्माघातामुळे खूप भाविक आजारी पडले. मृतांचा जो आकडा येतो आहे, त्यापेक्षा अधिक मृतांची संख्या त्यात आहे. महाराष्ट्र शासनाकडून गुन्हा घडला त्यांनी लोकांच्या भावनेचा विचार करून नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. असे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.  

खारघर येथील दुर्घटनेच्या संदर्भात सोमवारी (दि. २४) आमदार थोरात यांनी संगमनेरात पत्रकार परिषद घेतली. आमदार थोरात म्हणाले, या सर्व कार्यक्रमावर आमचा आक्षेप आहे. कोट्यावधी रुपयांची खर्चाची तयारी होती. भाविकांना तुम्ही  बोलवले होते. तर या सर्वांना तुम्ही  उन्हात कसे बसविले. सावली करण्याचे नियोजन का केले नाही. मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यात असे निर्देशनास आले की, अनेकांच्या पोटात कितीतरी तास अन्न, पाणी गेलेले नव्हते. तुम्ही सरकार म्हणून नियोजन करत असताना बेफिकिरी आणि निष्काळजीपणा दाखवला.

एवढेच नाही तर क्रूरता सुद्धा त्यामध्ये दिसते आहे. याला जबाबदार पूर्णपणे महाराष्ट्र शासन आहे. शिंदे आणि फडणवीस सरकार आहे. व्हीआयपींचे करिता सगळ्या सुखसोयीसाठी करता आणि आम जनता उन्हात बसवून त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होता. याची पूर्णपणे जबाबदारी शिंदे आणि फडणवीस सरकारने घेतली पाहिजे. महाराष्ट्र शासनाकडून गुन्हा घडला त्यांनी लोकांच्या भावनेचा विचार करून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात