शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

"नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे"

By शेखर पानसरे | Updated: April 24, 2023 18:47 IST

संगमनेरात पत्रकार परिषद ; महाराष्ट्र शासनाकडून गुन्हा घडला टीका

संगमनेर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा कार्यक्रम खारघर येथे झाला. शिंदे आणि फडणवीस सरकारने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. धर्माधिकारी यांच्यावर श्रद्धा असलेले लाखो भाविक त्यानिमित्ताने आले होते. उन्हाचा प्रचंड तडाखा होता, ४६ डिग्री पेक्षा जास्त तापमान होते. एवढ्या उन्हात लाखो भाविक बसल्याने उष्माघातामुळे खूप भाविक आजारी पडले. मृतांचा जो आकडा येतो आहे, त्यापेक्षा अधिक मृतांची संख्या त्यात आहे. महाराष्ट्र शासनाकडून गुन्हा घडला त्यांनी लोकांच्या भावनेचा विचार करून नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. असे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.  

खारघर येथील दुर्घटनेच्या संदर्भात सोमवारी (दि. २४) आमदार थोरात यांनी संगमनेरात पत्रकार परिषद घेतली. आमदार थोरात म्हणाले, या सर्व कार्यक्रमावर आमचा आक्षेप आहे. कोट्यावधी रुपयांची खर्चाची तयारी होती. भाविकांना तुम्ही  बोलवले होते. तर या सर्वांना तुम्ही  उन्हात कसे बसविले. सावली करण्याचे नियोजन का केले नाही. मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यात असे निर्देशनास आले की, अनेकांच्या पोटात कितीतरी तास अन्न, पाणी गेलेले नव्हते. तुम्ही सरकार म्हणून नियोजन करत असताना बेफिकिरी आणि निष्काळजीपणा दाखवला.

एवढेच नाही तर क्रूरता सुद्धा त्यामध्ये दिसते आहे. याला जबाबदार पूर्णपणे महाराष्ट्र शासन आहे. शिंदे आणि फडणवीस सरकार आहे. व्हीआयपींचे करिता सगळ्या सुखसोयीसाठी करता आणि आम जनता उन्हात बसवून त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होता. याची पूर्णपणे जबाबदारी शिंदे आणि फडणवीस सरकारने घेतली पाहिजे. महाराष्ट्र शासनाकडून गुन्हा घडला त्यांनी लोकांच्या भावनेचा विचार करून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात