शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे"

By शेखर पानसरे | Updated: April 24, 2023 18:47 IST

संगमनेरात पत्रकार परिषद ; महाराष्ट्र शासनाकडून गुन्हा घडला टीका

संगमनेर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा कार्यक्रम खारघर येथे झाला. शिंदे आणि फडणवीस सरकारने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. धर्माधिकारी यांच्यावर श्रद्धा असलेले लाखो भाविक त्यानिमित्ताने आले होते. उन्हाचा प्रचंड तडाखा होता, ४६ डिग्री पेक्षा जास्त तापमान होते. एवढ्या उन्हात लाखो भाविक बसल्याने उष्माघातामुळे खूप भाविक आजारी पडले. मृतांचा जो आकडा येतो आहे, त्यापेक्षा अधिक मृतांची संख्या त्यात आहे. महाराष्ट्र शासनाकडून गुन्हा घडला त्यांनी लोकांच्या भावनेचा विचार करून नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. असे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.  

खारघर येथील दुर्घटनेच्या संदर्भात सोमवारी (दि. २४) आमदार थोरात यांनी संगमनेरात पत्रकार परिषद घेतली. आमदार थोरात म्हणाले, या सर्व कार्यक्रमावर आमचा आक्षेप आहे. कोट्यावधी रुपयांची खर्चाची तयारी होती. भाविकांना तुम्ही  बोलवले होते. तर या सर्वांना तुम्ही  उन्हात कसे बसविले. सावली करण्याचे नियोजन का केले नाही. मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यात असे निर्देशनास आले की, अनेकांच्या पोटात कितीतरी तास अन्न, पाणी गेलेले नव्हते. तुम्ही सरकार म्हणून नियोजन करत असताना बेफिकिरी आणि निष्काळजीपणा दाखवला.

एवढेच नाही तर क्रूरता सुद्धा त्यामध्ये दिसते आहे. याला जबाबदार पूर्णपणे महाराष्ट्र शासन आहे. शिंदे आणि फडणवीस सरकार आहे. व्हीआयपींचे करिता सगळ्या सुखसोयीसाठी करता आणि आम जनता उन्हात बसवून त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होता. याची पूर्णपणे जबाबदारी शिंदे आणि फडणवीस सरकारने घेतली पाहिजे. महाराष्ट्र शासनाकडून गुन्हा घडला त्यांनी लोकांच्या भावनेचा विचार करून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात