शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सीनाचे पाणी सुटले, कुकडीचे कधी सुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:20 IST

कर्जत : सीना धरणाचे आवर्तन सुटले असून, कुकडीचे पाणी कधी सुटणार, याकडे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. ...

कर्जत : सीना धरणाचे आवर्तन सुटले असून, कुकडीचे पाणी कधी सुटणार, याकडे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. कुकडी लाभक्षेत्रातील फळबागा, पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. गेल्या दोन आवर्तनांप्रमाणे पाण्याची वाट पाहण्याची वेळ तर येणार नाही ना अशी शंका शेतकऱ्यांना सतावत आहे.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सीना धरणातून पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. एकूण पंचवीस दिवसांचा आवर्तन कालावधी असून, ‘टेल टू हेड’ पाणी मिळणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा कालवा सल्लागार समितीचे सचिव बाजीराव थोरात यांनी दिली. ऐन उन्हाळ्यात उभी पिके व फळबागांना यामुळे जीवदान मिळण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांबरोबरच प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चला कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. ऑनलाइन बैठकीत एक एप्रिल रोजी सीना धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्यातून पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्याचे निश्चित झाले. त्यानुसार आवर्तन सोडण्यात आले आहे. सीना धरणाची २ हजार ४०० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असून, सध्या १ हजार ३११ दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे. एका आवर्तनासाठी ९८४ दशलक्ष घनफूट पाणी लागत असून, दोन उन्हाळी आवर्तने पिकासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येणार आहेत. या आवर्तनात एकूण सोळाशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

सध्या उन्हाची काहिली वाढल्यामुळे विहिरी आणि कूपनलिका यांनी तळ गाठला होता, तसेच पाण्याची टंचाई निर्माण होण्याची चिन्हे होती. यामुळे शेतकरी धास्तावले होते. सीनाच्या पाण्यामुळे मिरजगाव, माहिजळगाव परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

कुकडीचे चित्र काहीसे वेगळे राहिले. पहिले आवर्तन आले नाही. दुसरे आवर्तन सोडण्यात आले ते सर्व शेतकऱ्यांना मिळाले नाही. गेल्या हंगामात ज्वारीला कुकडीचे पाणी मिळाले नाही. मग आता तरी पिकांना कुकडीचे पाणी मिळणार की नाही, हा मोठा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. पाण्याअभावी पिके, फळबागा जळू लागल्या आहेत. कुकडीच्या पाण्याचा कर्जत तालुक्यातील तीस हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होतो. २०१४ पासून गेल्या वर्षापर्यंत कुकडीचे आवर्तन वेळेत मिळत होते. मात्र, आता आवर्तनाचा बट्ट्याबोळ होत आहे. गेले आवर्तन रबी पिकांची काढणी झाल्यावर आले. यामुळे त्याचा उपयोग झाला नाही. शेतकऱ्यांनी कुकडीचे पाणी मिळणार हे गृहीत धरून कांदा, गहू, चारा पिके, फळबागा यांना पाणी देण्याचे नियोजन केले आहे. कुकडीच्या उन्हाळी आवर्तनाबाबत ९ एप्रिलला बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कुकडीच्या आवर्तनाचा निर्णय होणार आहे. कुकडीचे पाणी कधी सुटणार या निर्णयाकडे कुळधरण, येसवडी, दूरगाव, वडगाव, राशीन, चिलवडी, थेरवडी, बेनवडी, अळसुंदे, आंबिजळगाव, खातगाव, शेगुड, कोरेगाव, चापडगाव या भागांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

--

०३ सीना, ०३ कुकडी

सीनाचे आवर्तन सुटल्याने वाहत असलेला कालवा. दुसऱ्या छायाचित्रात पाण्याची प्रतीक्षा असलेला कुकडीचा कोरडाठाक कालवा.