राहुरी : अभ्यासक्रमातील मुलभूत बदलांचा स्वीकार शिक्षण क्षेत्राला करावाच लागेल. आव्हाने असले तरी, होणारी सामाजिक स्थित्यंतरे विचारात घ्यावे लागतील. खडू आणि फळ्याचा काळ संपला असून, ग्राफिक्सच्या माध्यमातून आलेल्या नव्या शिक्षण पद्धतीतून ज्ञानदानाचे कार्य करण्यासाठी प्राध्यापकांना मोठी जिज्ञासा ठेवावी लागेल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले़श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या राहुरी कॉलेज, आयुर्वेद महाविद्यालय, छत्रपती इंजिनिअरींग कॉलेज, आय़ टी़ आय यांना विखे यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली़ राहुरी महाविद्यालयात प्राचार्य डॉ़ संभाजी पठारे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले़विखे म्हणाले की, अभ्यासक्रमातील मुलभूत बदलांचा स्वीकार करणे हे आपल्यासमोर आव्हान आहे़ पूर्वी दहा वर्षांनी अभ्यासक्रम बदलत असे़ आता दरवर्षी अभ्यासक्रमात बदल करून शिक्षण देण्याची मानसिकता ठेवावी लागत असल्याचे विखे यांनी सांगितले़ राहुरी महाविद्यालयाने आत्मविश्वासाने काम केल्यामुळे ‘अ’ मूल्यांकन मिळाले़ पुस्तकावर अवलंबून राहण्याचे दिवसही संपले आहेत.आता अंगणवाड्याही डिजीटल होत असून ते चांगले चिन्हे असल्याचे विखे यांनी सांगितले़ यावेळी तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष शामराव निमसे, संचालक विजय डौले आदी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)
अभ्यासक्रमातील बदल स्वीकारावेच लागतील
By admin | Updated: July 4, 2016 23:45 IST