शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी भरतीवरून चुकीचे आरोप करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार; राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा 

By चंद्रकांत शेळके | Updated: January 8, 2024 18:56 IST

राज्यात तलाठी भरती पारदर्शकपणे झालेली असून, काही प्रश्नांचे सामान्यीकरण केल्याने गुणांत वाढ दिसत आहे.

अहमदनगर : राज्यात तलाठी भरती पारदर्शकपणे झालेली असून, काही प्रश्नांचे सामान्यीकरण केल्याने गुणांत वाढ दिसत आहे. याबाबत सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे. मात्र, ही संधी साधून विरोधक बेछूट आरोप करत आहेत. अशांविरोधात बदनामी केल्याबद्दल गुन्हे दाखल करू, अशा इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला.

तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून व स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून होत आहे. निकालातील गुणांत मोठी तफावत आहे. अनेक विद्यार्थ्यांना २०० पैकी २०० हून अधिकचे गुण मिळाले आहेत. त्यामुळे ही तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने घ्यावी, अशी मागणी होत आहे. याबाबत मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यात ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी तलाठी परीक्षा दिली. टीसीएस कंपनीमार्फत ही परीक्षा झाली. यात काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे किंवा कठीण असल्याचे पुढे आल्यानंतर सामान्यीकरण पद्धतीतून ती दुरुस्ती करण्यात आली. या प्रश्नांना सरसकट गुण दिल्याने काहींचे गुण २०० पेक्षा जास्त दिसत आहेत. यापूर्वीच्या जेवढ्या काही परीक्षा झाल्या, त्यातही सामान्यीकरणाची पद्धत वापरलेली आहे. ते काही नवीन नाही. ४८ विद्यार्थ्यांना २०० पैकी जास्त गुण मिळाले, हे आम्ही जाहीर केलेले आहे. लपवून ठेवले नाही. गुण जास्त दिसत असले तरी त्याच मेरीटप्रमाणे नियुक्ती दिली जाईल.

मात्र, दुसरीकडे सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांचे बेछूट आरोप सुरू आहेत. भरतीसाठी सरकारने पैसे घेतल्याचे आरोप काहीजणांनी केेले. त्यांनी ते आरोप सिद्ध करावेत. सर्व खुलासे आम्ही देऊ. सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे. मात्र, आरोप चुकीचे आढळले, तर संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करू, असा इशारा त्यांनी दिला. राऊत यांच्या डोक्यावर परिणामशिवसेनेचे खासदार सुनील राऊत यांच्या आरोपांबाबत मंत्री विखे पाटील म्हणाले की, राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे त्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करण्याची गरज आहे. खासगी आरोप करून त्यांनी अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचीही यादी आम्हाला काढावी लागेल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील