शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

प्रचाराच्या धुराळ््यात हरवली सीटी बस

By admin | Updated: October 3, 2014 23:54 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धुराळ््यात शहर बस सेवा हरवली आहे.

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धुराळ््यात शहर बस सेवा हरवली आहे. शहर बस सुरू करण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती. आता दोन्हीही पक्षांना शहर बसचा विसर पडला असल्याने नागरिकांचे सध्या हाल सुरू असून पॅगो रिक्षाचालकांच्या आडदांडपणाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेची शहर बस सेवा बंद पडली होती. मनसेच्या ताब्यातील स्थायी समितीने शहर बस सेवेच्या ठेकेदाराचा प्रस्ताव फेटाळल्याने बस बंद झाली. त्यामुळे शिवसेनेला आयतेच कोलीत मिळाले. सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे शहर बस सेवा बंद झाल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले. शेवटी महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी कशीबशी जुन्याच ठेकेदाराच्या बस घेऊन नव्या ठेकेदाराच्या नावे बस सुरू केल्या. शहरासाठी किमान ३० बस हव्या असताना चार-पाच बसेसवरच ही सेवा सुरू झाली. ही सेवाही आता बंद पडली आहे. शहर बसवरून दोन्ही पक्षांमध्ये महिनाभरापूर्वी आरोप-प्रत्यारोप सुरू होते. आता मात्र प्रचारामध्ये दोन्ही पक्षांना शहर बस सेवेचा विसर पडलेला दिसतो आहे.शहर बस बंद असल्याने पॅगो रिक्षाचालकांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली की पुन्हा राजकीय नेते कारवाईमध्ये अडथळे उभे करीत आहेत. प्रवाशांची आर्थिक लूट करणे, अव्वाच्या सव्वा भाडे लावणे, एकाच रिक्षामध्ये अनेक प्रवासी भरणे यामुळे शहरातील प्रवास धोकेदायक बनला आहे. दिल्लीगेट, जुने बसस्थानक, पुणे बसस्थानक येथे पॅगो रस्त्यावरच आडव्या लावल्या जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे.विनापरवाना रिक्षाचालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात आहे. कोणीही हस्तक्षेप केला तरी कारवाई थांबविली जाणार नाही, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे शहर बससेवेचा उपप्रादेशिक परिवहन विभागाचा परवाना नसल्याने नव्या ठेकेदाराला बस चालविणे अशक्य झाले आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा सुरू असल्याने राजकीय नेत्यांना बस सेवेचा विसर पडला आहे. तिसरीकडे विनापरवाना रिक्षांवर पोलिसांकडूनही सबुरीने कारवाई सुरू आहे. त्यामध्ये सध्या कोणताही आक्रमकपणा नाही. निवडणुकीच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक कारवाई टाळल्याचे दिसते आहे. काहीही झाले तरी शहरातील प्रवाशांचे हाल मात्र सुरूच आहेत. (प्रतिनिधी)