शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

सर्व समाजघटकांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:23 IST

शिर्डी : अर्थसंकल्‍पातून सरकारने समाजातील सर्वच घटकांच्‍या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकरी आणि बारा बलुतेदारांसह अडचणीत सापडलेल्‍या सर्वच समाजघटकांचा ...

शिर्डी : अर्थसंकल्‍पातून सरकारने समाजातील सर्वच घटकांच्‍या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकरी आणि बारा बलुतेदारांसह अडचणीत सापडलेल्‍या सर्वच समाजघटकांचा अपेक्षाभंग करणारा हा अर्थसंकल्‍प आहे. ‘तिजोरीत नाही आणा आणि महाविकास आघाडी सरकारच्‍या नुसत्‍याच घोषणा' अशीच परिस्थिती आहे. त्‍यातच तीन मंत्री असूनही नगर जिल्‍ह्याच्‍या पदरात या अर्थसंकल्‍पातून काहीही पडले नसल्‍याची खंत भाजपाचे नेते आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. अर्थसंकल्‍प जाहीर झाल्‍यानंतर आ. विखे पाटील यांनी सरकारने केलेल्‍या विविध घोषणांवर नाराजी व्‍यक्‍त केली. या सरकारने राज्‍यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्‍या कर्जमाफी योजनेची कोणतीही पूर्तता केलेली नाही. दोन लाख रुपये कर्ज असलेल्‍या शेतकऱ्यांना प्रोत्‍साहनपर अनुदान सरकार देणार होते. परंतु, त्‍याचा शब्‍दही अर्थसंकल्‍पात कुठे नाही. ३ लाख रुपयांवरील कर्जाच्‍या व्‍याजाच्‍या रकमेबाबतही सरकार काही बोलत नाही. त्‍यामुळे ठाकरे सरकारची कर्जमाफी योजना ही फसवी ठरल्‍याचे आता स्‍पष्‍ट होते. वीज बिलाच्‍या संदर्भातही सरकार उदासीनच असून, अनुदानाच्‍या रकमाही शेतकऱ्यांना मिळाल्‍या नाहीत. त्‍यामुळे शेतकऱ्यांना कोणताही दिलासा हे सरकार देवू शकलेले नाही, हे अर्थसंकल्‍पातून स्पष्ट झाले असल्‍याचे आ. विखे म्‍हणाले.

महापालिकांच्‍या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने केवळ घोषणा केल्‍या आहेत. या योजनांसाठी निधी कुठून आणि कसा आणणार? हे सरकार स्‍पष्‍टपणे सांगू शकत नाही. सरकारकडे फक्‍त कल्‍पनाशक्‍ती आहे. मात्र, इच्‍छाशक्‍तीचा अभाव आहे, हे यातून दिसून येते. हे सरकार फक्‍त पर्यटनात गुंतले आहे. गृहखात्‍यापेक्षा पर्यटन विभागाला जादा निधी दिला जातो, हे महाराष्‍ट्राचे दुर्दैव आहे, असेही ते म्हणाले.

....

नगरचे अनेक प्रकल्प रखडले

नगर जिल्‍ह्यात असंख्‍य प्रश्‍न केवळ निधीअभावी रखडले आहेत. या प्रश्‍नांना अर्थसंकल्‍पातून काही दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, महत्त्वपूर्ण विभागांचे मंत्रिपदं जिल्‍ह्यात असूनही या अर्थसंकल्‍पात जिल्‍ह्याच्‍या हिताची कोणतीही बाब समाविष्ट नाही, याबद्दलही आ. विखे यांनी खंत व्यक्त केली.