शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर महापालिका त्रिशंकू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 12:02 IST

नगर विकासात मागे राहिले, हे सर्वच पक्षांनी कबूल केले आहे.

- सुधीर लंके

अहमदनगर -  नगर शहर आजवर विकासात मागे राहिले, हे सर्वच पक्षांनी जाहीरपणे कबूल केले आहे. हेच पक्ष पुन्हा सत्ता आली तर आता विकास करुन दाखवू, असेही दावे करत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मतदारच संभ्रमात सापडल्याची चिन्हे आहेत. विकासाबाबत अपेक्षाभंग झाल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसत नाही. पक्ष स्वबळाचे दावे करत असले तरी ठोस व विश्वासार्ह पर्याय समोर दिसत नसल्याने महापालिका त्रिशंकू राहण्याची शक्यताच विविध सर्वे व राजकीय जाणकार वर्तवत आहेत. 

महापालिकेत प्रथमच सेना व भाजपा स्वतंत्रपणे लढत आहेत, तर दोन्ही कॉंग्रेसची आघाडी आहे. प्रचारात भाजपा आघाडीवर दिसतो. ‘नगर बदलणार’ असे फलक त्यांनी शहरभर लावले असून राम शिंदे, सुभाष देशमुख, पंकजा मुंडे, दिलीप कांबळे या मंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही प्रचार सभा घेतली आहे. अखेरच्या टप्प्यात स्वत: मुख्यमंत्री प्रचारात उतरणार असल्याचे सांगितले जाते. भाजपाने सर्व ६८ जागांवर उमेदवार दिले. आम्ही स्वबळावर सत्तेत येऊ असा या पक्षाचा दावा आहे. 

मात्र, भाजपाच्या दृष्टीने काही मुद्दे अडचणीचे ठरले आहेत. केडगावमध्ये भाजपाने कोतकर समर्थकांना पक्षात पावन करुन घेतले. कोतकर व मोदी यांची छायाचित्रे सोबत झळकली. कोतकर जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे मोदी व त्यांचे एकत्रित छायाचित्र शोभते का? असा प्रश्न सेनेने प्रचारात उपस्थित केला. भाजपाने या मुद्याची दखल घेत अशी छायाचित्रे न वापरण्याचा आदेश दिला आहे. ‘आमच्याकडे महापौर पद द्या, शहराला ३०० कोटी रुपये देऊ’ अशी घोषणा भाजपने केली. पण, हा मुद्दा भाजपाला सोयीचा ठरण्यापेक्षा अडचणीचा अधिक ठरला. राज्यात व केंद्रात सत्ता असताना आजवर हा निधी का दिला नाही? असा प्रश्न सेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या सर्वांनीच उपस्थित केला. त्याचे समर्थनीय उत्तर भाजपाने दिलेले नाही. 

भाजपाचे पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले व अभय आगरकर हे  नेते निवडणुकीत एकत्र आहेत. पण, इतरवेळी हेच नेते एकमेकांना पाण्यात पाहतात. त्यामुळे या एकीच्या देखाव्यावर मतदार किती विश्वास दाखवितात? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मोदी लाट आहे म्हणून पक्ष कार्यकर्ता नसलेल्यांनीही भाजपाची उमेदवारी घेतली. परिणामी भाजपातच अंतर्गत धुसफूस आहे.  शिवसेनेबाबतही अनेक प्रश्न आहेत. सेनेने आजवर नगर शहरात काहीच विकास केला नाही, असे भाजपाच प्रचार सभांमधून सांगत आहे. सेनेने पुन्हा एकदा ‘भयमुक्ती’चा जुनाच नारा दिला. सेनेच्या प्रचारासाठी आजवर केवळ नितीन बानगुडे यांनी हजेरी लावली. इतर नेते अजून आलेले नाहीत. उद्धव ठाकरे दोन महिन्यांपूर्वी येऊन गेले. केडगाव हत्याकांडाचा मुद्दा सेना मांडत आहे. हिंदुत्व, भावनिक राजकारण आणि केडगाव या पारंपरिक मुद्यांवर आपणाला सहानुभूती मिळेल, अशी सेनेची अपेक्षा आहे. आघाडीत राष्ट्रवादी ४१ तर कॉंग्रेस २१ जागांवर लढत आहे. आघाडी स्वबळाचा नारा देत असली, तरी त्यांनाही स्वबळ गाठणे सोपे दिसत नाही. केडगावमध्ये दोन्ही कॉंग्रेसचे ८ इच्छुक भाजपामध्ये गेल्याने आघाडीला दणका बसला. भाजपाचे आमदार व कोतकर यांचे सोयरे शिवाजी कर्डिले हे स्वत: केडगावमध्ये भाजपाच्या प्रचारात उतरले आहेत. केडगावने भाजपाला कौल दिल्यास आघाडीचे ते मोठे नुकसान ठरेल. त्यामुळे अंदाज वर्तवणे अवघड आहे. 

मुख्यमंत्री जळगाव, सांगलीची पुनरावृत्ती नगरला करू पाहत आहेत. मात्र, नगरला तशी पुनरावृत्ती होईल का? याबाबत साशंकता आहे. मुख्यमंत्री अखेरच्या टप्प्यात काय जादुची कांडी फिरवितात ? हे महत्त्वाचे राहील. 

त्रिशंकू परिस्थिती?

नगरकरांची सध्याची मानसिकता पाहता कुणा एका पक्षाकडे एकहाती सत्ता जाईल, अशी शक्यता दिसत नाही. तशी विश्वासार्ह प्रतिमा या टप्प्यापर्यंत कुठलाही पक्ष निर्माण करु शकलेला नाही. गत विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना यांच्या मतविभागणीचा राष्ट्रवादीला फायदा झाला होता. यावेळीही तशीच परिस्थिती आहे.

टॅग्स :BJPभाजपा