शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अहमदनगर महापालिका त्रिशंकू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 12:02 IST

नगर विकासात मागे राहिले, हे सर्वच पक्षांनी कबूल केले आहे.

- सुधीर लंके

अहमदनगर -  नगर शहर आजवर विकासात मागे राहिले, हे सर्वच पक्षांनी जाहीरपणे कबूल केले आहे. हेच पक्ष पुन्हा सत्ता आली तर आता विकास करुन दाखवू, असेही दावे करत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मतदारच संभ्रमात सापडल्याची चिन्हे आहेत. विकासाबाबत अपेक्षाभंग झाल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसत नाही. पक्ष स्वबळाचे दावे करत असले तरी ठोस व विश्वासार्ह पर्याय समोर दिसत नसल्याने महापालिका त्रिशंकू राहण्याची शक्यताच विविध सर्वे व राजकीय जाणकार वर्तवत आहेत. 

महापालिकेत प्रथमच सेना व भाजपा स्वतंत्रपणे लढत आहेत, तर दोन्ही कॉंग्रेसची आघाडी आहे. प्रचारात भाजपा आघाडीवर दिसतो. ‘नगर बदलणार’ असे फलक त्यांनी शहरभर लावले असून राम शिंदे, सुभाष देशमुख, पंकजा मुंडे, दिलीप कांबळे या मंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही प्रचार सभा घेतली आहे. अखेरच्या टप्प्यात स्वत: मुख्यमंत्री प्रचारात उतरणार असल्याचे सांगितले जाते. भाजपाने सर्व ६८ जागांवर उमेदवार दिले. आम्ही स्वबळावर सत्तेत येऊ असा या पक्षाचा दावा आहे. 

मात्र, भाजपाच्या दृष्टीने काही मुद्दे अडचणीचे ठरले आहेत. केडगावमध्ये भाजपाने कोतकर समर्थकांना पक्षात पावन करुन घेतले. कोतकर व मोदी यांची छायाचित्रे सोबत झळकली. कोतकर जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे मोदी व त्यांचे एकत्रित छायाचित्र शोभते का? असा प्रश्न सेनेने प्रचारात उपस्थित केला. भाजपाने या मुद्याची दखल घेत अशी छायाचित्रे न वापरण्याचा आदेश दिला आहे. ‘आमच्याकडे महापौर पद द्या, शहराला ३०० कोटी रुपये देऊ’ अशी घोषणा भाजपने केली. पण, हा मुद्दा भाजपाला सोयीचा ठरण्यापेक्षा अडचणीचा अधिक ठरला. राज्यात व केंद्रात सत्ता असताना आजवर हा निधी का दिला नाही? असा प्रश्न सेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या सर्वांनीच उपस्थित केला. त्याचे समर्थनीय उत्तर भाजपाने दिलेले नाही. 

भाजपाचे पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले व अभय आगरकर हे  नेते निवडणुकीत एकत्र आहेत. पण, इतरवेळी हेच नेते एकमेकांना पाण्यात पाहतात. त्यामुळे या एकीच्या देखाव्यावर मतदार किती विश्वास दाखवितात? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मोदी लाट आहे म्हणून पक्ष कार्यकर्ता नसलेल्यांनीही भाजपाची उमेदवारी घेतली. परिणामी भाजपातच अंतर्गत धुसफूस आहे.  शिवसेनेबाबतही अनेक प्रश्न आहेत. सेनेने आजवर नगर शहरात काहीच विकास केला नाही, असे भाजपाच प्रचार सभांमधून सांगत आहे. सेनेने पुन्हा एकदा ‘भयमुक्ती’चा जुनाच नारा दिला. सेनेच्या प्रचारासाठी आजवर केवळ नितीन बानगुडे यांनी हजेरी लावली. इतर नेते अजून आलेले नाहीत. उद्धव ठाकरे दोन महिन्यांपूर्वी येऊन गेले. केडगाव हत्याकांडाचा मुद्दा सेना मांडत आहे. हिंदुत्व, भावनिक राजकारण आणि केडगाव या पारंपरिक मुद्यांवर आपणाला सहानुभूती मिळेल, अशी सेनेची अपेक्षा आहे. आघाडीत राष्ट्रवादी ४१ तर कॉंग्रेस २१ जागांवर लढत आहे. आघाडी स्वबळाचा नारा देत असली, तरी त्यांनाही स्वबळ गाठणे सोपे दिसत नाही. केडगावमध्ये दोन्ही कॉंग्रेसचे ८ इच्छुक भाजपामध्ये गेल्याने आघाडीला दणका बसला. भाजपाचे आमदार व कोतकर यांचे सोयरे शिवाजी कर्डिले हे स्वत: केडगावमध्ये भाजपाच्या प्रचारात उतरले आहेत. केडगावने भाजपाला कौल दिल्यास आघाडीचे ते मोठे नुकसान ठरेल. त्यामुळे अंदाज वर्तवणे अवघड आहे. 

मुख्यमंत्री जळगाव, सांगलीची पुनरावृत्ती नगरला करू पाहत आहेत. मात्र, नगरला तशी पुनरावृत्ती होईल का? याबाबत साशंकता आहे. मुख्यमंत्री अखेरच्या टप्प्यात काय जादुची कांडी फिरवितात ? हे महत्त्वाचे राहील. 

त्रिशंकू परिस्थिती?

नगरकरांची सध्याची मानसिकता पाहता कुणा एका पक्षाकडे एकहाती सत्ता जाईल, अशी शक्यता दिसत नाही. तशी विश्वासार्ह प्रतिमा या टप्प्यापर्यंत कुठलाही पक्ष निर्माण करु शकलेला नाही. गत विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना यांच्या मतविभागणीचा राष्ट्रवादीला फायदा झाला होता. यावेळीही तशीच परिस्थिती आहे.

टॅग्स :BJPभाजपा