शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

अहमदनगर महापालिका त्रिशंकू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 12:02 IST

नगर विकासात मागे राहिले, हे सर्वच पक्षांनी कबूल केले आहे.

- सुधीर लंके

अहमदनगर -  नगर शहर आजवर विकासात मागे राहिले, हे सर्वच पक्षांनी जाहीरपणे कबूल केले आहे. हेच पक्ष पुन्हा सत्ता आली तर आता विकास करुन दाखवू, असेही दावे करत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मतदारच संभ्रमात सापडल्याची चिन्हे आहेत. विकासाबाबत अपेक्षाभंग झाल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसत नाही. पक्ष स्वबळाचे दावे करत असले तरी ठोस व विश्वासार्ह पर्याय समोर दिसत नसल्याने महापालिका त्रिशंकू राहण्याची शक्यताच विविध सर्वे व राजकीय जाणकार वर्तवत आहेत. 

महापालिकेत प्रथमच सेना व भाजपा स्वतंत्रपणे लढत आहेत, तर दोन्ही कॉंग्रेसची आघाडी आहे. प्रचारात भाजपा आघाडीवर दिसतो. ‘नगर बदलणार’ असे फलक त्यांनी शहरभर लावले असून राम शिंदे, सुभाष देशमुख, पंकजा मुंडे, दिलीप कांबळे या मंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही प्रचार सभा घेतली आहे. अखेरच्या टप्प्यात स्वत: मुख्यमंत्री प्रचारात उतरणार असल्याचे सांगितले जाते. भाजपाने सर्व ६८ जागांवर उमेदवार दिले. आम्ही स्वबळावर सत्तेत येऊ असा या पक्षाचा दावा आहे. 

मात्र, भाजपाच्या दृष्टीने काही मुद्दे अडचणीचे ठरले आहेत. केडगावमध्ये भाजपाने कोतकर समर्थकांना पक्षात पावन करुन घेतले. कोतकर व मोदी यांची छायाचित्रे सोबत झळकली. कोतकर जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे मोदी व त्यांचे एकत्रित छायाचित्र शोभते का? असा प्रश्न सेनेने प्रचारात उपस्थित केला. भाजपाने या मुद्याची दखल घेत अशी छायाचित्रे न वापरण्याचा आदेश दिला आहे. ‘आमच्याकडे महापौर पद द्या, शहराला ३०० कोटी रुपये देऊ’ अशी घोषणा भाजपने केली. पण, हा मुद्दा भाजपाला सोयीचा ठरण्यापेक्षा अडचणीचा अधिक ठरला. राज्यात व केंद्रात सत्ता असताना आजवर हा निधी का दिला नाही? असा प्रश्न सेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या सर्वांनीच उपस्थित केला. त्याचे समर्थनीय उत्तर भाजपाने दिलेले नाही. 

भाजपाचे पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले व अभय आगरकर हे  नेते निवडणुकीत एकत्र आहेत. पण, इतरवेळी हेच नेते एकमेकांना पाण्यात पाहतात. त्यामुळे या एकीच्या देखाव्यावर मतदार किती विश्वास दाखवितात? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मोदी लाट आहे म्हणून पक्ष कार्यकर्ता नसलेल्यांनीही भाजपाची उमेदवारी घेतली. परिणामी भाजपातच अंतर्गत धुसफूस आहे.  शिवसेनेबाबतही अनेक प्रश्न आहेत. सेनेने आजवर नगर शहरात काहीच विकास केला नाही, असे भाजपाच प्रचार सभांमधून सांगत आहे. सेनेने पुन्हा एकदा ‘भयमुक्ती’चा जुनाच नारा दिला. सेनेच्या प्रचारासाठी आजवर केवळ नितीन बानगुडे यांनी हजेरी लावली. इतर नेते अजून आलेले नाहीत. उद्धव ठाकरे दोन महिन्यांपूर्वी येऊन गेले. केडगाव हत्याकांडाचा मुद्दा सेना मांडत आहे. हिंदुत्व, भावनिक राजकारण आणि केडगाव या पारंपरिक मुद्यांवर आपणाला सहानुभूती मिळेल, अशी सेनेची अपेक्षा आहे. आघाडीत राष्ट्रवादी ४१ तर कॉंग्रेस २१ जागांवर लढत आहे. आघाडी स्वबळाचा नारा देत असली, तरी त्यांनाही स्वबळ गाठणे सोपे दिसत नाही. केडगावमध्ये दोन्ही कॉंग्रेसचे ८ इच्छुक भाजपामध्ये गेल्याने आघाडीला दणका बसला. भाजपाचे आमदार व कोतकर यांचे सोयरे शिवाजी कर्डिले हे स्वत: केडगावमध्ये भाजपाच्या प्रचारात उतरले आहेत. केडगावने भाजपाला कौल दिल्यास आघाडीचे ते मोठे नुकसान ठरेल. त्यामुळे अंदाज वर्तवणे अवघड आहे. 

मुख्यमंत्री जळगाव, सांगलीची पुनरावृत्ती नगरला करू पाहत आहेत. मात्र, नगरला तशी पुनरावृत्ती होईल का? याबाबत साशंकता आहे. मुख्यमंत्री अखेरच्या टप्प्यात काय जादुची कांडी फिरवितात ? हे महत्त्वाचे राहील. 

त्रिशंकू परिस्थिती?

नगरकरांची सध्याची मानसिकता पाहता कुणा एका पक्षाकडे एकहाती सत्ता जाईल, अशी शक्यता दिसत नाही. तशी विश्वासार्ह प्रतिमा या टप्प्यापर्यंत कुठलाही पक्ष निर्माण करु शकलेला नाही. गत विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना यांच्या मतविभागणीचा राष्ट्रवादीला फायदा झाला होता. यावेळीही तशीच परिस्थिती आहे.

टॅग्स :BJPभाजपा