शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

भाजपाच्या वाटेवर नेत्यांची गर्दी!

By admin | Updated: May 22, 2014 00:01 IST

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे विरोधी पक्षांतील नेतेमंडळी धास्तावली आहेत. त्यांनी मोदी लाट अडविण्याऐवजी त्या लाटेवरच स्वार होण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे विरोधी पक्षांतील नेतेमंडळी धास्तावली आहेत. त्यांनी मोदी लाट अडविण्याऐवजी त्या लाटेवरच स्वार होण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यात दक्षिणेतील राष्ट्रवादी आणि उत्तरेतील एका काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या झंझावातात आपली वाताहत होण्याची भीती या नेत्यांना आहे. पराभवाचे विश्लेषण करण्याऐवजी बहुतांशी नेते आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी कामाला लागले आहेत. भाजपामधील मित्रांचा त्यासाठी उपयोग केला जात आहे. दक्षिणेतील एका नेत्याची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी भाजपाशी निवडणुकीपूर्वीच सलगी केली आहे. मात्र, त्यांच्यावर कडी करण्यासाठी त्या नेत्यानेच भाजपचा थिंक टँक म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांची भेट घेतली. याची गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. एक नेता पत्नीला भाजपाची उमेदवारी मिळवून देण्यासाठी कामाला लागला. मात्र, या ‘राज’कारणाला किती यश मिळते. हा काळच ठरविल. उत्तरेतील एका नेत्यालाही कमळाचा सुगंध आवडू लागला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हातात कमळ घेऊन लढण्याची शक्यता आहे. या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यास जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलून जातील. भाजपामधून रूसून गेलेले नेतेही परतीच्या वाटेवर आहेत. निवडणुकीचा अंदाजच न आल्याने त्यांची अशी गोची झाली आहे. तेही खासगीत हे मान्य करीत आहेत. निष्ठावान भाजपा व संघ कार्यकर्त्यांना या परक्यांबद्दल मनात अढी आहे. परक्यांमुळे निष्ठावानांवर गंडांतरांची शक्यता आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) लोढांना आमंत्रण पूर्वाश्रमीचे भाजपावासी असलेल्या वसंत लोढा यांना स्वगृही परतण्याचे निमंत्रण आले आहे. लोढा सध्या मनसैनिक झाले आहेत. त्यांना भाजपात घेऊन जिल्हाध्यक्षपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातही भाजपामधील एक गट सक्रिय झाला आहे. मनसेमध्येही सध्या दोन गट पडले आहेत. या पार्श्वभूमीवर ते भाजपात जातील, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, स्वत: लोढांनी निमंत्रण आले आहे. पण, मी मनसैनिक म्हणूनच काम करणार असल्याचा खुलासा केला. मोदींच्या प्रभावामुळेच गैरकाँग्रेसी सरकार बहुमतात आले आहे. राज्यात २४५ मतदारसंघात महायुतीला आघाडी आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रभावित झाले आहेत. त्यामुळे साहजिकच १९९५ प्रमाणे भाजपामध्ये येण्यासाठी रांगा लागतील. यावर प्रदेश भाजपच्या बैठकीत अप्रत्यक्षरित्या चर्चाही झाली आहे. मात्र, शिवशाही सरकारमधील अनुभव चांगला नाही. ‘दूध पोळल्याने ताकही फुंकून पिण्याचा’ निर्णय भाजपाने घेतला आहे. प्रवेशाबाबत राजकीय विश्लेषण केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. -आ. राम शिंदे, महामंत्री, भाजपा.