शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

भाजपाच्या वाटेवर नेत्यांची गर्दी!

By admin | Updated: May 22, 2014 00:01 IST

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे विरोधी पक्षांतील नेतेमंडळी धास्तावली आहेत. त्यांनी मोदी लाट अडविण्याऐवजी त्या लाटेवरच स्वार होण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे विरोधी पक्षांतील नेतेमंडळी धास्तावली आहेत. त्यांनी मोदी लाट अडविण्याऐवजी त्या लाटेवरच स्वार होण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यात दक्षिणेतील राष्ट्रवादी आणि उत्तरेतील एका काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या झंझावातात आपली वाताहत होण्याची भीती या नेत्यांना आहे. पराभवाचे विश्लेषण करण्याऐवजी बहुतांशी नेते आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी कामाला लागले आहेत. भाजपामधील मित्रांचा त्यासाठी उपयोग केला जात आहे. दक्षिणेतील एका नेत्याची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी भाजपाशी निवडणुकीपूर्वीच सलगी केली आहे. मात्र, त्यांच्यावर कडी करण्यासाठी त्या नेत्यानेच भाजपचा थिंक टँक म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांची भेट घेतली. याची गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. एक नेता पत्नीला भाजपाची उमेदवारी मिळवून देण्यासाठी कामाला लागला. मात्र, या ‘राज’कारणाला किती यश मिळते. हा काळच ठरविल. उत्तरेतील एका नेत्यालाही कमळाचा सुगंध आवडू लागला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हातात कमळ घेऊन लढण्याची शक्यता आहे. या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यास जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलून जातील. भाजपामधून रूसून गेलेले नेतेही परतीच्या वाटेवर आहेत. निवडणुकीचा अंदाजच न आल्याने त्यांची अशी गोची झाली आहे. तेही खासगीत हे मान्य करीत आहेत. निष्ठावान भाजपा व संघ कार्यकर्त्यांना या परक्यांबद्दल मनात अढी आहे. परक्यांमुळे निष्ठावानांवर गंडांतरांची शक्यता आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) लोढांना आमंत्रण पूर्वाश्रमीचे भाजपावासी असलेल्या वसंत लोढा यांना स्वगृही परतण्याचे निमंत्रण आले आहे. लोढा सध्या मनसैनिक झाले आहेत. त्यांना भाजपात घेऊन जिल्हाध्यक्षपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातही भाजपामधील एक गट सक्रिय झाला आहे. मनसेमध्येही सध्या दोन गट पडले आहेत. या पार्श्वभूमीवर ते भाजपात जातील, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, स्वत: लोढांनी निमंत्रण आले आहे. पण, मी मनसैनिक म्हणूनच काम करणार असल्याचा खुलासा केला. मोदींच्या प्रभावामुळेच गैरकाँग्रेसी सरकार बहुमतात आले आहे. राज्यात २४५ मतदारसंघात महायुतीला आघाडी आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रभावित झाले आहेत. त्यामुळे साहजिकच १९९५ प्रमाणे भाजपामध्ये येण्यासाठी रांगा लागतील. यावर प्रदेश भाजपच्या बैठकीत अप्रत्यक्षरित्या चर्चाही झाली आहे. मात्र, शिवशाही सरकारमधील अनुभव चांगला नाही. ‘दूध पोळल्याने ताकही फुंकून पिण्याचा’ निर्णय भाजपाने घेतला आहे. प्रवेशाबाबत राजकीय विश्लेषण केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. -आ. राम शिंदे, महामंत्री, भाजपा.