शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

भाजपाच्या वाटेवर नेत्यांची गर्दी!

By admin | Updated: May 22, 2014 00:01 IST

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे विरोधी पक्षांतील नेतेमंडळी धास्तावली आहेत. त्यांनी मोदी लाट अडविण्याऐवजी त्या लाटेवरच स्वार होण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे विरोधी पक्षांतील नेतेमंडळी धास्तावली आहेत. त्यांनी मोदी लाट अडविण्याऐवजी त्या लाटेवरच स्वार होण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यात दक्षिणेतील राष्ट्रवादी आणि उत्तरेतील एका काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या झंझावातात आपली वाताहत होण्याची भीती या नेत्यांना आहे. पराभवाचे विश्लेषण करण्याऐवजी बहुतांशी नेते आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी कामाला लागले आहेत. भाजपामधील मित्रांचा त्यासाठी उपयोग केला जात आहे. दक्षिणेतील एका नेत्याची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी भाजपाशी निवडणुकीपूर्वीच सलगी केली आहे. मात्र, त्यांच्यावर कडी करण्यासाठी त्या नेत्यानेच भाजपचा थिंक टँक म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांची भेट घेतली. याची गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. एक नेता पत्नीला भाजपाची उमेदवारी मिळवून देण्यासाठी कामाला लागला. मात्र, या ‘राज’कारणाला किती यश मिळते. हा काळच ठरविल. उत्तरेतील एका नेत्यालाही कमळाचा सुगंध आवडू लागला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हातात कमळ घेऊन लढण्याची शक्यता आहे. या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यास जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलून जातील. भाजपामधून रूसून गेलेले नेतेही परतीच्या वाटेवर आहेत. निवडणुकीचा अंदाजच न आल्याने त्यांची अशी गोची झाली आहे. तेही खासगीत हे मान्य करीत आहेत. निष्ठावान भाजपा व संघ कार्यकर्त्यांना या परक्यांबद्दल मनात अढी आहे. परक्यांमुळे निष्ठावानांवर गंडांतरांची शक्यता आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) लोढांना आमंत्रण पूर्वाश्रमीचे भाजपावासी असलेल्या वसंत लोढा यांना स्वगृही परतण्याचे निमंत्रण आले आहे. लोढा सध्या मनसैनिक झाले आहेत. त्यांना भाजपात घेऊन जिल्हाध्यक्षपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातही भाजपामधील एक गट सक्रिय झाला आहे. मनसेमध्येही सध्या दोन गट पडले आहेत. या पार्श्वभूमीवर ते भाजपात जातील, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, स्वत: लोढांनी निमंत्रण आले आहे. पण, मी मनसैनिक म्हणूनच काम करणार असल्याचा खुलासा केला. मोदींच्या प्रभावामुळेच गैरकाँग्रेसी सरकार बहुमतात आले आहे. राज्यात २४५ मतदारसंघात महायुतीला आघाडी आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रभावित झाले आहेत. त्यामुळे साहजिकच १९९५ प्रमाणे भाजपामध्ये येण्यासाठी रांगा लागतील. यावर प्रदेश भाजपच्या बैठकीत अप्रत्यक्षरित्या चर्चाही झाली आहे. मात्र, शिवशाही सरकारमधील अनुभव चांगला नाही. ‘दूध पोळल्याने ताकही फुंकून पिण्याचा’ निर्णय भाजपाने घेतला आहे. प्रवेशाबाबत राजकीय विश्लेषण केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. -आ. राम शिंदे, महामंत्री, भाजपा.