शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना पॅकेज हवे; नगरमध्ये कारखानदारांची गुप्त बैठक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 16:22 IST

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यांचा आर्थिक प्रश्न मिटविण्यासाठी आता भाजपमधील सर्वच कारखानदार एकत्र आले आहेत. 

अहमदनगर : महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. त्यांचा आर्थिक प्रश्न मिटविण्यासाठी आता भाजपमधील सर्वच कारखानदार एकत्र आले आहेत. 

    केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली नगरमधील विळद घाटातील विखे फाउंडेशनच्या परिसरात शनिवारी बैठक झाली. या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे साखर कारखानदार उपस्थित होते.

अतिशय गोपनीय झालेल्या या बैठकीत फक्त कारखान्यांच्या आर्थिक स्थितीचाच विषय होता. या बैठकीला माजीमंत्री राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील, राहुल कूल, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील १५ साखर कारखान्यांचे प्रमुख उपस्थित होते.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे. अनेक कारखान्यांवर बँकांचे कर्ज आहे. लॉकडाऊननंतरही परिस्थितीमध्ये सुधारणा होईल, याची शक्यता नाही. या कारखान्यांना उभारी देण्यासाठी राज्य सरकारकडून अपेक्षा व्यर्थ आहे. त्यामुळे कारखान्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक पॅकेज मिळण्याची गरज आहे, याची बैठकीत चर्चा झाली. याबाबतचे एक अंदाजपत्रक निश्चित करण्यासाठी दानवे यांनी विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली.  प्रस्ताव तयार केल्यानंतर तो अर्थमंत्रालयाला सादर केला जाणार आहे. विशेषत: जे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत, अशा आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांचे साखर कारखान्यांचाच विषय बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे जे सध्या भाजपात आहेत, असेच कारखानदार बैठकीला उपस्थित होते.

साखर कारखान्यांसह रोजगार, राज्यातील शेतकºयांची कर्जमाफी या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. हे प्रश्न पक्षश्रेष्ठींकडे मांडणार असल्याची ग्वाही दानवे यांनी या बैठकीत दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने