शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

भाजपाचे सरकार हुकूमशाहीच्या दिशेने; हा देशासाठी सर्वात मोठा धोका : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 16:38 IST

लोकपाल, लोकायुक्त यांना कमजोर बनविणारा कायदा केवळ तीन दिवसात भाजपा सरकारने केला आहे. सरकार कोणत्याही चर्चेशिवाय असा कायदा तयार करीत असल्यामुळे हे सरकार हुकूमशाहीच्या दिशेने चालले आहे. हा देशासाठी सर्वात मोठा धोका आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देलोकपाल, लोकायुक्त यांना कमजोर बनविणारा कायदा केवळ तीन दिवसात भाजपा सरकारने केला आहे.सरकार कोणत्याही चर्चेशिवाय असा कायदा तयार करीत असल्यामुळे हे सरकार हुकूमशाहीच्या दिशेने चालले आहे.हा देशासाठी सर्वात मोठा धोका आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार काहीही ठोस पावले उचलत नाही. सरकारला जशी उद्योगपतींची काळजी आहे, तशी शेतक-यांची नाही.

राळेगणसिद्धी : लोकपाल, लोकायुक्त यांना कमजोर बनविणारा कायदा केवळ तीन दिवसात भाजपासरकारने केला आहे. सरकार कोणत्याही चर्चेशिवाय असा कायदा तयार करीत असल्यामुळे हे सरकार हुकूमशाहीच्या दिशेने चालले आहे. हा देशासाठी सर्वात मोठा धोका आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.२३ मार्च २०१८ रोजी दिल्लीमध्ये शहिद दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी अण्णांनी कार्यकर्त्यांना एक पत्र पाठविले आहे. त्या पत्रात म्हटले आहे, लाखो शेतक-यांनी शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांबाबत सरकार काहीही बोलत नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार काहीही ठोस पावले उचलत नाही. सरकारला जशी उद्योगपतींची काळजी आहे, तशी शेतक-यांची नाही.भ्रष्टामुक्तीसाठी बनविलेले लोकपाल, लोकायुक्त विधेयकातील नियम ४४ मध्ये सरकारने बदल करुन हे नियम ४४ काढून टाकले आहे. त्यामुळे आता सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना भ्रष्टाचारासाठी मोकळे रान मिळाले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकारात २७ जुलै २०१६ रोजी लोकसभेत कोणत्याही चर्चेशिवाय नियम ४४ चा नियम रद्द ठरविला. त्यानंतर २८ जुलै रोजी राज्यसभेत एका दिवसात हे लोकपाल, लोकायुक्त विधेयकाला कमजोर बनविणारा कायदा संमत केला. त्यानंतर दुस-याच दिवसी म्हणजे २९ जुलैला राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली. केवळ तीन दिवसात कोणत्याही चर्चेशिवाय हा कायदा करण्यात आला. सरकारची ही हुकूमशाहीकडे वाटचाल आहे आणि देशासाठी हा सर्वात मोठा धोका आहे. म्हणूनच लोकपाल, लोकायुक्त सक्षम करण्यासाठी २३ मार्च रोजी दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे, असे सांगत अण्णांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारेGovernmentसरकारBJPभाजपा