शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

आठवड गावात ४० एकरवर फुलविले जैव विविधता उद्यान;  पाच हजार झाडांचे संगोपन; रोपवाटिका, विश्रामगृहाची व्यवस्था

By अनिल लगड | Updated: June 5, 2020 12:49 IST

नगर तालुक्यातील आठवड येथे सरकारच्या माध्यमातून स्व. उत्तमराव पाटील यांच्या नावाने जैव विविधता उद्यान साकारले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे ४० एकर जमिनीवर हे उद्यान उभारले आहे. या उद्यानात सुमारे ५ हजार झाडांचे संगोपन केले जात आहे. हे उद्यान पर्यावरणप्रेमी, पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.

जागतिक वन दिन विशेष /   

अहमदनगर : नगर तालुक्यातील आठवड येथे सरकारच्या माध्यमातून स्व. उत्तमराव पाटील यांच्या नावाने जैव विविधता उद्यान साकारले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे ४० एकर जमिनीवर हे उद्यान उभारले आहे. या उद्यानात सुमारे ५ हजार झाडांचे संगोपन केले जात आहे. हे उद्यान पर्यावरणप्रेमी, पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.

नगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवरील नगर -जामखेड रोडवरील आठवड हे छोटेसे गाव. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीला स्मार्टग्राम पुरस्कार मिळाला. यासाठी गावचे सरपंच राजेंद्र मोरे, सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले़ आठवड ग्रामपंचायतीला पडीक जमिनीचे मोठे क्षेत्र आहे. या ठिकाणी म्हसोबा देवस्थानची ४० एकर जमीन आहे. या जमिनीचा ग्रामपंचायतीमार्फत ६ ते ७ हजाराला तीन वर्षासाठी लिलाव होत असे. हा लिलाव पिढ्यान्पिढ्या चालू होता. अनेक जण दोन दोन हजार रुपये गोळा करुन लिलाव घेत. जमीन कसत. यावरुन अनेकात मतभेद होत. पुढे ही जमीन उद्योजक विजय मोरे यांनी ५० हजाराने लिलावाने घेतली. लिलावाची रक्कम ग्रामपंचायतीला विकासासाठी दिली जाते.

 राज्य सरकारमार्फत स्व. उत्तमराव पाटील यांच्या नावाने एक कोटी खर्चून जैव विविधता उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सरकारतर्फे नगर जिल्ह्यात आठवड (ता. नगर) व संगमनेर तालुक्यातील नांदुर्खी या दोन गावांची निवड झाली. आठवड येथे म्हसोबा देवस्थानची ४० एकर जमीन यासाठी दिली. सरकारमार्फत तीन वर्षापूर्वी या ठिकाणी काम सुरू झाले. या उद्यानात सुमारे ५ हजार लहान मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यात गेस्ट हाऊस, वनौद्यात येणा-या नागरिकांसाठी बसण्यासाठी बाकडे, लहान मुलांची खेळणी, प्राण्यांचे पुतळे, वेलवर्गीय झाडे लावली. ही झाडे सध्या चांगली बहरली आहेत. यातून गावातील २० ते २५ तरुणांना रोजगार मिळाला आहे.  

उद्यानात रोपवाटिका उभारली आहे.  यामुळे उद्यानाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. या उद्यानाला भेट देण्यासाठी येथे परजिल्ह्यातून पर्यटनप्रेमींची वर्दळ वाढत आहे. या उद्यानामुळे परिसरात पर्यावरणाला चालना मिळाली. गावात दहा वर्षापूर्वी ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या ९ एकर पडीक जागेवरही ८ हजार झाडांचे वृक्षारोपण केले आहे. यावर चिंच, जांभूळ, आंबा व इतर झाडे फुलविली आहेत. यामुळे गावचे निसर्गसौंदर्य चांगले फुलले आहे. स्वखर्चातून गावात कामेआठवड गावात अनेक सुशोभिकरणाची कामे स्वखर्चाने केली आहे. यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक विजय मोरे यांचे मोठे योगदान आहे. गावाच्या विकासासाठी ते स्वत: निधी देतात. त्यांनी गावातील मागासवर्गीय अनेक नागरिकांना स्वखर्चातून शौचालये बांधून दिली आहेत. गावात स्वच्छता, भुयारी गटार योजना, ग्रामपंचायत इमारत, रस्ते काँक्रिटीकरण ही कामे ग्रामपंचायतीने केली आहेत. दोन वर्षापासून मी स्वत: स्वखर्चाने कचरा गाडीने गावातील कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावत आहे, असे सरपंच राजेंद्र मोरे यांनी सांगितले.

 उद्यानाचे काम पूर्ण झाले आहे. शासनामार्फत या उद्यानाची देखरेख होत आहे. सरकार हे उद्यान ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्याच्या तयारीत आहे. परंतु या उद्यानाची देखभाल ग्रामपंचायत करु शकत नाही. यासाठी निधीची आवश्यकता भासेल. सध्या येथे शासनाची रोपवाटिका आहे. त्यामुळे त्याची देखरेख चांगली होत आहे.-राजेंद्र मोरे, सरपंच, आठवड, ता. नगर.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरenvironmentपर्यावरण