शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

भीमा-कोरेगाव प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यात दुस-या दिवशीही ठिकठिकाणी बंद, मोर्चे, तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 12:23 IST

सलग दुस-या दिवशीही नगर जिल्ह्यात उमटले असून, महाराष्ट्र बंदच्या घोषणेला प्रतिसाद देत नगर जिल्ह्यात बुधवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात आली. काही ठिकाणी आंदोलनर्त्यांनी दूध संघांची कार्यालये फोडली तर काही ठिकाणी एस टी बस फोडल्या. 

अहमदनगर : सोमवारी पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथे किरकोळ वादातून झालेल्या दगडफेक, तोडफोडीचे पडसाद बुधवारी सलग दुस-या दिवशीही नगर जिल्ह्यात उमटले असून, महाराष्ट्र बंदच्या घोषणेला प्रतिसाद देत नगर जिल्ह्यात बुधवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्यात आली. काही ठिकाणी आंदोलनर्त्यांनी दूध संघांची कार्यालये फोडली तर काही ठिकाणी एस टी बस फोडल्या. नगर शहरातही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, नेप्ती कांदा मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. मार्केटमध्ये आलेल्या कांद्याचे गुरुवारी सकाळी अकरा वाजता लिलाव होणार असल्याचे सांगण्यात आले.जामखेड तालुक्यातील जवळा येथे सात वाजण्याच्या सुमारास जामखेड-करमाळा बसवर दगडफेक करुन काचा फोडण्यात आल्या. जवळा येथील बंदला हिंसक वळण मिळाले असून, क्रांती ज्योती दूध संघाच्या काचा आंदोलकांनी फोडल्या. तसेच दूध ओतून देण्यात आले. जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून, खर्डा, नान्नज, अरणगाव, सोनेगाव, हळगाव, जातेगाव, दिघोळ आदी गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.

राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे कडकडीत बंद पाळून गावात निषेध रॅली काढण्यात आली. म्हैसगाव सकाळपासून बंद पाळण्यात आला.

पारनेर तालुक्यातील विविध ठिकाणी बंद पाठण्यात आला. ढवळपुरी, भाळवणीत कडकडीत बंद पाळण्यात आला. पारनेर एस. टी. आगार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. निघोजमध्ये शांतता असल्याचे सांगण्यात येते.नगर तालुक्यातील निंबळक, इसळक, जेऊन येथे बंद पाळण्यात आला.श्रीगोंदा तालुक्यातील कडकडीत बंद पाळण्यात आला. टाकळी कडेवळीत व मांडवगण वगळता इतर मार्गावरील बसेस सुरु असल्याचे सांगण्यात येते.संगमनेरमध्येही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शासनाच्या निषेधार्थ संगमनेर शहरात रॅली काढण्यात आली आहे. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

शाळांना अघोषित सुट्टी

अनेक गावांमध्ये बंद पाळण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. विद्यार्थ्यांअभावी शाळा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे जे विद्यार्थी शाळेत पोहोचले होते, त्यांनाही पुन्हा घरी परतावे लागले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार