शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम अभिनयाने रंगले ‘मोमोज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:02 IST

मोबाईल गेम्स्च्या आहारी गेलेल्या तरुणाईची व्यथा आणि कुटुंबावर बेतणा-या दु:खद प्रसंगावर बेतलेले ‘मोमोज’ हे नाटक बुधवारी (दि़४) नगर केंद्रावर सादर झाले. मोमोज या मोबाईल गेम्स्मुळे कोवळ्या वयात मुलांचे जीव जातात, यावर भाष्य करणा-या या नाटकाचे लेखन अ‍ॅड़ चंद्रकांत शिंदे यांनी केले.

नाट्य समीक्षण / साहेबराव नरसाळे /मोबाईल गेम्स्च्या आहारी गेलेल्या तरुणाईची व्यथा आणि कुटुंबावर बेतणा-या दु:खद प्रसंगावर बेतलेले ‘मोमोज’ हे नाटक बुधवारी (दि़४) नगर केंद्रावर सादर झाले. मोमोज या मोबाईल गेम्स्मुळे कोवळ्या वयात मुलांचे जीव जातात, यावर भाष्य करणा-या या नाटकाचे लेखन अ‍ॅड़ चंद्रकांत शिंदे यांनी केले. तर दिग्दर्शन उर्मिला सतीश लोटके यांनी केले. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अहमदनगर जिल्हा हौशी नाट्य संघाच्यावतीने हे नाटक सादर करण्यात आले. एका सुखवस्तू कुटुंबात सुरेखा व श्रीधर यांच्या संवादाने नाटकाचा पडदा उघडतो. सुरेखा ही गृहिणी तर श्रीधर हा नोकरदार असतो़. सुरेखा सतत श्रीधरच्या मागावर असते. श्रीधर कोणासोबत चॅटींग करतो, कोणासोबत बोलतो, हे पाहण्यासाठी ती सतत त्याचा मोबाईल चेक करीत असते. नंतर पूर्ण घरच मोबाईलच्या अतिवापराचा बळी ठरल्याचे समजते. सुरेखा व श्रीधरचा मुलगा टोटो हा मोमोज गेमच्या आहारी गेलेला असतो. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याची मैत्रिण मोमोज गेमचे चॅलेंज स्वीकारुन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या करते. टोटोलाही आपल्याच बहिणीचा खून करण्याचे चॅलेंज मिळालेले असते. मोमोजच्या आभासी जगतात तो पूर्णपणे फसलेला असतो. त्यामुळे त्याचे वागणेही विक्षिप्त असते. त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याचे आई-वडील, बहीण कुकु हे प्रयत्न करतात. तो दोन वेळा कुकुचा खून करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, आई-वडील तिला वाचवितात़ नंतर हे चॅलेंज बदलून त्याला वडिलांनाच मारण्याचे चॅलेंज मोमोज गेममध्ये मिळते. तो वडिलांनाही मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यशस्वी होत नाही़ म्हणून तोच स्वत: आत्महत्या करतो, असे या नाटकाचे कथानक़ केवळ काही तासाचे हे कथानक असल्यामुळे वेगवान घटना घडत राहतात. या घटना प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. पहिल्या प्रवेशानंतर नाटकाची गती एकदम वाढते. ही गती शेवटपर्यंत टिकविण्यात दिग्दर्शक उर्मिला लोटके यांना यश आले. त्यांनी पात्र निवड उत्तम केली. कलाकारांकडून अभिनय करवून घेण्यात त्या यशस्वी झाल्या. दोन ठिकाणी संवादात विरोधाभास जाणवला. हा विरोधाभास संवादातील अडथळ्यांमुळे की त्या लेखनातील त्रुटी होत्या, याबाबत संशय आहे. मात्र, या त्रुटी वगळता नाटक ठराविक गतीने पुढे नेण्यात त्या यशस्वी झाल्य. या उत्कंठावर्धक नाटकाचा शेवट अरुचकर झाला. शेवटी सूत्रधाराकरवी दिलेला संदेश मोलाचा असला तरी प्रेक्षकांना एकदम चमच्याने भरविण्याचा मोह टाळता आला असता, असे वाटते.नाटकातील टोटो ही प्रमुख भूमिका मार्दव लोटके याने साकारली़ सहज सुंदर अभिनय करुन त्याने नाटकात रंगत आणली. टोटोच्या मनाचा कल क्षणाक्षणाला बदलत असतो़ त्यानुसार मार्दवने पकडलेली बेअरिंग उत्तमच़ एका क्षणात त्याच्या चेह-यावर दु:खी भाव तर दुस-या क्षणाला हसरा चेहरा आणि त्यायोग्य संवादफेक करण्याची कसरत त्याने लिलया पेलली. आवाजातील चढउतार, संवादानुरुप आवाजातील विविध रस, अचूक टायमिंग साधत घेतलेले पंच यामुळे मार्दवने पे्रक्षकांवर छाप सोडली. रंगमंचावरील त्याचा सहज वावर आणि देहबोली अप्रतिमच होती. मोमोजच्या आभासी जाळ्यात अडकलेला टोटो साकारताना भावमुद्रा, हालचाली, नजरेतला विशिष्ट कटाक्ष अशा विविध बाबींचा त्याने उत्तम अभ्यास केला असावा, असे दिसते. मोमोजच्या आभासी जगतातून बाहेर आल्यानंतर चेह-यावरील निरागस भाव आणि आवाजातील निरागसता तसेच काहीच सेकंदात पुन्हा त्या आभासी जगतात जाऊन ती बेअरिंग पकडणे अवघड होते. पण मार्दवने ते सहज साध्य केले़ म्हणूनच त्याची भूमिका लक्षवेधी ठरली.कुकुची भूमिका कोजागरी जोशी हिने केली. मार्दवला उत्तम साथ देत तिने नाटकातील रंजकता अधिक वाढवली. कोजागरीची देहबोली, भावमुद्रा आणि संवादफेक उत्तम होती. संवाद घेताना दोन वेळा ती अडखळली. मात्र, एकूणच तिचा अभिनय उत्तम राहिला. सुरेखाची भूमिका कल्पना नवले यांनी साकारली. सुरेखाच्या भूमिकेला त्यांनी न्याय दिला. संशयी गृहिणी, उतावीळपणा, बापावरचे अवलंबित्व या भूमिकेतील विविध छटा त्यांनी उत्तम रंगवल्या. संवादातील आरोहअवरोह, भावमुद्रा आणि रंगमंचावरील त्यांचा सहज वावर कौतुकास पात्र ठरतो. श्रीधरची भूमिका रवींद्र काळे यांनी साकारली. आवाजातील चढउतार, विविध ढंगातील संवाद आणि अचूक टायमिंग साधत त्यांनी श्रीधरची भूमिका फुलविली. शेखर वाघ यांनी विश्वासराव ही भूमिका साकारली. निवृत्त अधिकाºयाची भूमिका साकारताना त्यांचा कस लागला. त्यांच्या वाट्याला त्रोटक संवाद होते़ ते त्यांना अधिक फुलविता आले असते, असे वाटते़ निर्मला रोहोकले यांनी मोमोची भूमिका साकारली. मोमोची बेअरिंग त्यांनी उत्तम सांभाळली. मनिषा लहारे यांनी मोमोसाठी आवाज दिला. नाटकाचा अचूक परिणाम साधण्यासाठी त्यांच्या आवाजाचे मोठे योगदान राहिले. धनश्री सुडके, नाना मोरेंनी उत्तम नेपथ्य केले़ सुखवस्तू कुटुंबाचे घर भासावे यासाठी घरात विविध वस्तू ठेवलेल्या होत्या. एक भरलेले घर हुबेहूब त्यांनी उभे केले. कलाकारांनीही बहुतांश वस्तुंचा वापर करुन हे नेपथ्य आवाजवी वाटू दिले नाही़. उत्तम नेपथ्य ही या नाटकाची जमेची बाजू म्हणावी लागेल. विनोद राठोड यांनी प्रकाश योजना करताना आपले कौशल्य पणाला लावले. प्रकाश योजनेत विविध छटा वापरुन त्यांनी अपेक्षित परिणाम साधला. शेवटी टोटो इमारतीवरुन आत्महत्या करतो, हे दृष्य उत्तम प्रकाश योजनेमुळेच भासमान ठरविण्यात त्यांना यश आले. मोमोजच्या प्रवेशावेळी लवकर फेडइन घेतला, ही चूक वगळता उत्तम प्रकाश योजना करण्यात त्यांना यश आले.अजय इंगळे यांची संगीत योजना गरजेनुरुप योग्य होती. काही ठिकाणी ती लाऊड वाटली़ पण अपेक्षित परिणाम साधण्यासाठी तसे करणेही गरजेचे होते.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNatakनाटक