शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ध्येय, जिद्द, चिकाटी आवश्यक; विनोद बढे यांचा मराठा समाजातील तरुणांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 13:27 IST

तरुणांनो, उठा जागे व्हा. शिका, कष्ट करा, ध्येय ठेवा..यशस्वी उद्योजक व्हा, असा सल्ला मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक विनोद बढे यांनी मराठा समाजातील युवकांना दिला. उद्योग कितीही छोटा असला तरी त्याची लाज न बाळगता पुढे आले पाहिजे.

संडे स्पेशल मुलाखत / अनिल लगड ।  तरुणांनो, उठा जागे व्हा. शिका, कष्ट करा, ध्येय ठेवा..यशस्वी उद्योजक व्हा, असा सल्ला मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक विनोद बढे यांनी मराठा समाजातील युवकांना दिला. उद्योग कितीही छोटा असला तरी त्याची लाज न बाळगता पुढे आले पाहिजे. ही चळवळ कोणाच्या विरोधात नाही. कुणाशी स्पर्धा करण्याशी नाहीतर मराठा समाजातील उद्योजकांना सर्वांच्या बरोबरीने पुढे नेण्यासाठी आहे, असेही ते म्हणाले.  १९ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथे मराठा उद्योजक लॉबीचा मेळावा पार पडला. राज्यभरातून मराठा उद्योजक या मेळाव्यात सहभागी झाले होते. बढे यांनी आपल्या टिमसोबत ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत राजेश सोनवणे, धिरज मोढवे, राजेंद्र औताडे, संदीप खरमाळे, स्वप्नील काळे, चिंतेश्वर देवरे, सुदर्शन झिंजुर्डे उपस्थित होते. यावेळी ‘लोकमत’ने बढे  यांच्याशी संवाद साधला.  . उद्योग क्षेत्रात आपला प्रवास कसा राहिला?माझे मूळ गाव नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली. वडील नोकरीनिमित्त उल्हासनगरला आले. तेथे त्यांनी एका वायर फॅक्टरीत काम सुरू केले. दहा वर्षे कंपनीत काम केले. त्यानंतर वडिलांनी एका जैन समाजातील व्यक्तीबरोबर भागीदारीत व्यवसाय सुरू केला. त्यानंतर १९८७ मध्ये वडिलांनी जमीन विकून स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. आता जीन्स् पँट बनविण्याचा व्यवसाय आहे. यामुळे मला व्यवसायाचे लहानपणापासूनच धडे मिळाले आहेत. मराठा उद्योजक लॉबी कशासाठी? कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा सहभाग आहे. परंतु यात अवेळी पडणारा पाऊस, दुष्काळ यामुळे शेती क्षेत्र मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. मराठा समाज या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी धडपडत आहे. त्यातच मराठा समाजातील युवकांना नोकºयाही नाहीत. त्यामुळे अनेक तरुण छोट्या-मोठ्या उद्योगाकडे वळत आहेत. या तरुणांना मार्गदर्शन करण्याची खरी गरज आहे. उद्योजक लॉबीची संकल्पना कशी सुचली?मराठा उद्योजक लॉबीची संकल्पना मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने खºया अर्थाने मला सुचली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी क्रांती मोर्चा काढण्यात आला. याला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मराठा क्रांती मोर्चामुळे मराठा समाज एकवटला. एकजुटीची ताकद सरकारला देखील कळाली. पण क्रांती मोर्चाचा फक्त आरक्षण हाच विषय होता. माझा विषय मात्र वेगळा आहे. यातून मलाही मराठा उद्योजक लॉबीची कल्पना सुचली. मराठा लॉबीत आता किती जणांचा सहभाग आहे?एकीचे बळ काय असते हे मराठा क्रांती मोर्चाने दाखवून दिले. त्यातून आज मराठा उद्योजक लॉबी उभी राहिली आहे. ही लॉबी उभी करण्यासाठी मला सोशल मीडियाचा मोठा फायदा झाला. आज जवळपास फेसबुकवर साडेचार लाख उद्योजकांचा ग्रुप तयार झाला आहे. तर व्हॉटस् अ‍ॅपवर ७० ग्रुप तयार झाले आहेत. यात जवळपास दीड लाख उद्योजक जोडले गेले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना मराठा उद्योजक लॉबीचा हेल्पलाईन नंबर दिला आहे. याव्दारे कोणाला कोणतीही अडचण आली तर तत्काळ एकमेकांना मदत करुन सोडविली जाते.राज्यातील मराठा उद्योजकांना कसे एकत्र केले?उल्हासनगरला सिंधी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यात जिद्द आणि चिकाटी मोठी आहे. त्यांच्यातील लॉबिंग पाहिले आहे. त्यांची उद्योगातील देवाण-घेवाणीच्या पध्दती जाणल्या आहेत. त्यातून २०१७ मध्ये मराठा उद्योजक लॉबी उभी करण्याचे काम सुरू केले. मला युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. प्रथम मी हे काम मुंबई, उल्हासनगर, ठाणे, कोल्हापूर, भिवंडी, जळगाव येथे केले. तेथे मेळावे घेतले. संकल्पना समजून सांगितली. अडचणी समजून घेतल्या. त्या सोडविण्याचा प्रयत्न केला.  अहमदनगरच्या मेळाव्याला प्रतिसाद कसा राहिला?नगरला मेळावा खूप चांगला झाला. प्रतिसाद चांगला मिळाला. औरंगाबाद, नाशिक, बीड, जालना जिल्ह्यातून लोक आले होते. अनेक स्टॉल लागले होते. आता जानेवारीमध्ये नगरला नामवंत तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे. यात छोट्या अगदी चहा, पानटपरी, भाजीपाला विक्री करणाºयांना देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात व्यवसाय कसा निवडावा? भांडवल किती लागेल? भांडवलाची उभारणी कशी करावी? मालाचे ब्रँडींग कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.मराठा उद्योजक तरुणांना काय संदेश द्याल?मराठा समाजातील तरुणांनी चांगले शिक्षण घ्यावे. परंतु शिक्षणाबरोबरच व्यवसायाशी निगडीत शिक्षण घ्यायला हवे. कारण नोकरी मिळाली नाही तर किमान व्यवसाय कसा उभारता येईल, याचेही ज्ञान घ्यायला हवे. मराठा समाजातील तरुणांनी आज जागे होण्याची गरज आहे. कष्ट, जिद्द ठेवून स्वत:च्या पायावर उभे रहावे, ही अपेक्षा आहे.

मराठा उद्योजक लॉबी ही एक मराठा समाजातील प्रत्येक युवकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेली व्यावसायिक चळवळ आहे. आमच्या लॉबीत पद ही संकल्पना नाही. सर्वांना समान अधिकार आहे. राजकीय हस्तक्षेप तर मुळीच नाही.   -विनोद बढे 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmarathaमराठा