शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

सावधान ! या गावचे जावई व्हाल.., तर धोंड्याला मुकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 17:59 IST

अधिक मास आला की सर्वत्र आपल्या जावयांना धोंड्याचे गोडधोड जेवण देण्यासाठी सासुरवाडीच्या लोकांची लगबग सुरु होते. नवा जावई असला तर त्याची मोठी बडधास्त ठेवली जाते.

ठळक मुद्देनगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जेनी गावाने जपली परंपराकाहीतरी दुर्घटना घडते हि भावना या गावक-यांच्या मनात पक्की बसलीजावयांना धोंड्याचे जेवण खाऊ न घालण्याची प्रथा

योगेश गुंडअहमदनगर : अधिक मास आला की सर्वत्र आपल्या जावयांना धोंड्याचे गोडधोड जेवण देण्यासाठी सासुरवाडीच्या लोकांची लगबग सुरु होते. नवा जावई असला तर त्याची मोठी बडधास्त ठेवली जाते. आमरसाच्या जेवणाबरोबरच नवे कपडे, सोन्याचे दागिने, चांदीची भांडी तसेच इतर उपहार जावयाला देण्याची वषार्नुवर्षे चालत आलेली परंपरा आजही कायम आहे. मात्र नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जेनी हे गाव यासाठी अपवाद ठरत आहे. या गावातील जावयांना धोंडे खाऊ न घालण्याची प्रथा असून आजही ही प्रथा जपली जात आहे.अहमदनगरपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर पिंपळगाव उज्जेनी या गावाने वषार्नुवर्षे हि परंपरा जतन केली आहे. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातही या गावाने या प्रथेचे कडक पालन केले आहे. गावकरी मोठ्या श्रद्धेने या प्रथेचे पालन करत आहेत हे विशेष. अधिक मास आला कि प्रत्येक सासुरवाडीत आपल्या जावयांना धोंडे खाऊ घालण्याची परंपरा महाराष्ट्रात पाळली जाते. आंब्याचा हंगाम असल्याने या महिन्यात जावई व त्याच्या घरातील लोकांना आमरस व इतर गोडघोड जेवण खाऊ घातले जाते. त्यात जावई नवा असला तर त्याची जास्तच बडधास्त ठेवली जाते. सर्वजण जावयाची खातरदारी करण्यात बीझी असतात. जावयांना जेवणाबरोबर नवे कपडे व आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे इतर उपहार दिले जातात. हीच सर्वत्र परंपरा आहे. मात्र पिंपळगाव उज्जेनी गाव या परंपरेला अपवाद ठरले आहे.या गावची अधिक मासातील प्रथा नेमकी उलटी आहे. या गावात जावयांना कुणीच धोंड्याचे जेवण खाऊ घालत नाहीत. हि प्रथा कशी पडली व या प्रथेचे नेमके कारणे काय याची माहिती गावातील कोणालाही पक्के सांगता येत नाही, इतकी हि परंपरा जुनी आहे. गावातील लोकांशी चर्चा केल्यानंतर काही बाबी समोर आल्या. गावात कधी काळी कोणीतरी जावयांना अधिक मासात धोंडे खाऊ घातल. आणि जावयाच्या घरी दुर्घटना घडली असा अनुभव जुन्या काळात अनेकांना आला. यामुळे गावक-यांचा पक्का समज झाला कि आपण धोंडे जेवण देण्याच्या प्रथेमुळेच या दुर्घटना घडत आहेत. काहीच्या मते, अधिक मासात जावयांना धोंडे खाऊ घातले आणि गावात रोगराई सुरु झाली. अनेकांचा जीव गेला. यामुळे गावाने अधिक मासात जावयांना जेवण खाऊ न घालण्याची प्रथाच एकमुखाने बंद केली. धोंडे खाऊ घातले कि काहीतरी दुर्घटना घडते हि भावना या गावक-यांच्या मनात पक्की बसली आणि तेथून पुढे या गावाने हि प्रथाच बंद करून टाकली. तेव्हापासून गावातील कोणताच सासरा आपल्या जावयाला अधिक मासात आपल्या घरी धोंडे खायला बोलवत नाही. जावई हि ‘जान है तो जहान है’ म्हणत धोंडे खायचे नावही काढत नाहीत. जेवणासाठी दुर्घटनेची भीती कशाला यामुळे आजपर्यंत हि परंपरा गावात टिकून आहे. परंपरा नेमकी कधीपासून सुरु झाली याची निश्चित माहिती गावातील जुन्या-जाणत्या लोकांनाही सांगता आली नाही. आमच्या आज्यापासून आम्ही हे पाळतो एवढेच जुने लोक सांगतात.गावातील जावयांना मात्र धोंडे चालतातपिंपळगाव उज्जेनी गावाचे जे जावई आहेत त्यांच्यासाठी धोंडे खाण्याची प्रथा बंद असली तरी या गावाचे गावकरी ज्या गावाचे जावई आहेत तेथे हि प्रथा असल्याने ते आपल्या सासूरवाडीत धोंडे खाण्यास जाऊ शकतात. म्हणजे धोंडे खाऊ घालण्याची प्रथा नसली तरी धोंडे खाण्याची प्रथा मात्र आहे.‘‘आमच्या आजोबांनी आम्हाला जावयाला धोंडे न देण्याची गावाची परंपरा असल्याचे सांगितले. त्या काळात जुन्या लोकांचे गांभीर्याने ऐकले जायचे. त्यामुळे आमच्या पिढीने हि परंपरा गावात टिकून ठेवली आहे.आजही आमच्या गावात कोणीच जावयांना धोंडे खाऊ घालत नाहीत.’’ - प्रल्हाद मोरे ( गावकरी)‘‘आमच्या गावात जावयांना धोंडे खाऊ न घालण्याची जुनी प्रथा आहे. याचे नेमके कारण माहित असले तरी जुन्या काळात या प्रथेमुळे गावात रोगराई पसरून अनेकांचा जीव गेला,असे जुने लोक सांगत होते. यामुळे त्याकाळीच धोंड्याची प्रथा बंद झाली आहे.’’ - जगन्नाथ मगर ( माजी सरपंच)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmarriageलग्न