शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! या गावचे जावई व्हाल.., तर धोंड्याला मुकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 17:59 IST

अधिक मास आला की सर्वत्र आपल्या जावयांना धोंड्याचे गोडधोड जेवण देण्यासाठी सासुरवाडीच्या लोकांची लगबग सुरु होते. नवा जावई असला तर त्याची मोठी बडधास्त ठेवली जाते.

ठळक मुद्देनगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जेनी गावाने जपली परंपराकाहीतरी दुर्घटना घडते हि भावना या गावक-यांच्या मनात पक्की बसलीजावयांना धोंड्याचे जेवण खाऊ न घालण्याची प्रथा

योगेश गुंडअहमदनगर : अधिक मास आला की सर्वत्र आपल्या जावयांना धोंड्याचे गोडधोड जेवण देण्यासाठी सासुरवाडीच्या लोकांची लगबग सुरु होते. नवा जावई असला तर त्याची मोठी बडधास्त ठेवली जाते. आमरसाच्या जेवणाबरोबरच नवे कपडे, सोन्याचे दागिने, चांदीची भांडी तसेच इतर उपहार जावयाला देण्याची वषार्नुवर्षे चालत आलेली परंपरा आजही कायम आहे. मात्र नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जेनी हे गाव यासाठी अपवाद ठरत आहे. या गावातील जावयांना धोंडे खाऊ न घालण्याची प्रथा असून आजही ही प्रथा जपली जात आहे.अहमदनगरपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर पिंपळगाव उज्जेनी या गावाने वषार्नुवर्षे हि परंपरा जतन केली आहे. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातही या गावाने या प्रथेचे कडक पालन केले आहे. गावकरी मोठ्या श्रद्धेने या प्रथेचे पालन करत आहेत हे विशेष. अधिक मास आला कि प्रत्येक सासुरवाडीत आपल्या जावयांना धोंडे खाऊ घालण्याची परंपरा महाराष्ट्रात पाळली जाते. आंब्याचा हंगाम असल्याने या महिन्यात जावई व त्याच्या घरातील लोकांना आमरस व इतर गोडघोड जेवण खाऊ घातले जाते. त्यात जावई नवा असला तर त्याची जास्तच बडधास्त ठेवली जाते. सर्वजण जावयाची खातरदारी करण्यात बीझी असतात. जावयांना जेवणाबरोबर नवे कपडे व आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे इतर उपहार दिले जातात. हीच सर्वत्र परंपरा आहे. मात्र पिंपळगाव उज्जेनी गाव या परंपरेला अपवाद ठरले आहे.या गावची अधिक मासातील प्रथा नेमकी उलटी आहे. या गावात जावयांना कुणीच धोंड्याचे जेवण खाऊ घालत नाहीत. हि प्रथा कशी पडली व या प्रथेचे नेमके कारणे काय याची माहिती गावातील कोणालाही पक्के सांगता येत नाही, इतकी हि परंपरा जुनी आहे. गावातील लोकांशी चर्चा केल्यानंतर काही बाबी समोर आल्या. गावात कधी काळी कोणीतरी जावयांना अधिक मासात धोंडे खाऊ घातल. आणि जावयाच्या घरी दुर्घटना घडली असा अनुभव जुन्या काळात अनेकांना आला. यामुळे गावक-यांचा पक्का समज झाला कि आपण धोंडे जेवण देण्याच्या प्रथेमुळेच या दुर्घटना घडत आहेत. काहीच्या मते, अधिक मासात जावयांना धोंडे खाऊ घातले आणि गावात रोगराई सुरु झाली. अनेकांचा जीव गेला. यामुळे गावाने अधिक मासात जावयांना जेवण खाऊ न घालण्याची प्रथाच एकमुखाने बंद केली. धोंडे खाऊ घातले कि काहीतरी दुर्घटना घडते हि भावना या गावक-यांच्या मनात पक्की बसली आणि तेथून पुढे या गावाने हि प्रथाच बंद करून टाकली. तेव्हापासून गावातील कोणताच सासरा आपल्या जावयाला अधिक मासात आपल्या घरी धोंडे खायला बोलवत नाही. जावई हि ‘जान है तो जहान है’ म्हणत धोंडे खायचे नावही काढत नाहीत. जेवणासाठी दुर्घटनेची भीती कशाला यामुळे आजपर्यंत हि परंपरा गावात टिकून आहे. परंपरा नेमकी कधीपासून सुरु झाली याची निश्चित माहिती गावातील जुन्या-जाणत्या लोकांनाही सांगता आली नाही. आमच्या आज्यापासून आम्ही हे पाळतो एवढेच जुने लोक सांगतात.गावातील जावयांना मात्र धोंडे चालतातपिंपळगाव उज्जेनी गावाचे जे जावई आहेत त्यांच्यासाठी धोंडे खाण्याची प्रथा बंद असली तरी या गावाचे गावकरी ज्या गावाचे जावई आहेत तेथे हि प्रथा असल्याने ते आपल्या सासूरवाडीत धोंडे खाण्यास जाऊ शकतात. म्हणजे धोंडे खाऊ घालण्याची प्रथा नसली तरी धोंडे खाण्याची प्रथा मात्र आहे.‘‘आमच्या आजोबांनी आम्हाला जावयाला धोंडे न देण्याची गावाची परंपरा असल्याचे सांगितले. त्या काळात जुन्या लोकांचे गांभीर्याने ऐकले जायचे. त्यामुळे आमच्या पिढीने हि परंपरा गावात टिकून ठेवली आहे.आजही आमच्या गावात कोणीच जावयांना धोंडे खाऊ घालत नाहीत.’’ - प्रल्हाद मोरे ( गावकरी)‘‘आमच्या गावात जावयांना धोंडे खाऊ न घालण्याची जुनी प्रथा आहे. याचे नेमके कारण माहित असले तरी जुन्या काळात या प्रथेमुळे गावात रोगराई पसरून अनेकांचा जीव गेला,असे जुने लोक सांगत होते. यामुळे त्याकाळीच धोंड्याची प्रथा बंद झाली आहे.’’ - जगन्नाथ मगर ( माजी सरपंच)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmarriageलग्न