शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

पिचडांची दुराग्रही भूमिका योग्य नाही - आ. बाळासाहेब थोरात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 20:46 IST

'आम्ही ज्येष्ठ नेते म्हणून पिचडांचा कायमच आदर केला, मात्र निळवंडे कालव्यांच्या संदर्भाने त्यांनी घेतलेली दुराग्रही भूमिका चुकीची आहे.

संगमनेर  - 'आम्ही ज्येष्ठ नेते म्हणून पिचडांचा कायमच आदर केला, मात्र निळवंडे कालव्यांच्या संदर्भाने त्यांनी घेतलेली दुराग्रही भूमिका चुकीची आहे. आगोदरच शासकीय अनास्थेमुळे पाच वर्षे रखडलेल्या कालव्यांना पिचडांनी राजकीय हेतूने विरोध करू नये, याप्रकरणी दुष्काळी जनतेच्या भावना तीव्र आहे, असा इशारा आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रक प्रसिद्ध करून निळवंडे कालव्यांसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. चार दिवसांपूर्वीच थोरात यांनी अकोलेकरांना विरोध सोडण्याचे आवाहन केले होते.

आमदार थोरात म्हणाले, 'भूमिगत कालवे होणारच नाही, त्यासंदर्भातील भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट केली आहे, त्यामुळे आकोल्यातून सुरू असलेला विरोध हा राजकीय भावनेतून सुरू आहे. निळवंडे प्रकल्पच मुळात दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी उभारला गेला आहे. सन 1991 पासून निळवंडे प्रकल्पासाठी अकोले आणि संगमनेरने एकत्रित प्रयत्न केले आहेत, असे असतांना अकोले तालुक्यात होणाऱ्या कालव्यांना विरोध करून पिचड चुकीचे वागत आहे.

'निळवंडे कालवे हे दुष्काळी भागाच्या भावनेचा विषय आहे आणि तेथील जनतेच्या भावना तीव्र आहे. हात तोंडाशी आलेला पाण्याचा घास हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. दुष्काळी भागातील जनता उद्रेकाच्या तयारीत आहे, त्यामुळे अकोले येथून सुरू असलेले कालव्यांचे राजकारण बंद करावे.' असेही थोरात म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात