शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बाळासाहेब थोरातांचा राजकीय वारसदार ठरला; लेकीची महत्त्वाच्या पदावर वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 19:02 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्याही आता राजकारण सक्रीय होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Congress Balasaheb Thorat ( Marathi News ) : राजकीय नेत्यांच्या मुलांचा राजकारणात होणारा प्रवेश ही नवी गोष्ट नाही. मुलांसोबतच आता राजकीय नेत्यांची मुलीही आपल्या पित्याचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी मैदानात उतरत असल्याचं चित्र अलीकडच्या काळात दिसून येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्याही आता राजकारणात सक्रीय होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण जयश्री थोरात यांची आज संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात हेदेखील काँग्रेसमध्ये होते. थोरात कुटुंबाचं संगमनेर विधानसभा मतदारसंघावर गेल्या अनेक दशकांपासून एकहाती वर्चस्व राहिलं आहे. याच मतदारसंघातून बाळासाहेब थोरात हे सलग तब्बल आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात महत्त्वाच्या मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळलेले थोरात हे राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अशा स्थितीत त्यांनी आपली कन्या जयश्री थोरात यांना तालुका स्तरावर सक्रिय करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे.

जयश्री थोरात या मागील काही काळापासून सोशल मीडियावरही राजकीय घडामोडींवर व्यक्त होत असतात. आता त्यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्याकडे बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जात आहे. आगामी काळात त्या संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

विजय वडेट्टीवारांची कन्याही मैदानात

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी नुकतंच आपण इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. या मतदारसंघातून आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याचंही शिवानी वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. शिवानी वडेट्टीवार यांनी आपल्या एक्स हँडलवर याबाबतची पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "गेल्या सात वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करत असताना खरं तर मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करायची होती. मात्र लोकशाही संपवू पाहणाऱ्या या सरकारने जिल्हा परिषद निवडणुकाच घेतल्या नाही. त्यामुळे आता संसदेतूनच आवाज उठवणार," असा निर्धार शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातAhmednagarअहमदनगरcongressकाँग्रेस