शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

पाणीपट्टी दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे नगर महापालिकेत बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 18:38 IST

अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील पाणीपट्टीत सुमारे एक हजार रुपयांनी दरवाढीची शिफारस केली आहे. याच्या निषेधार्थ शहर युवक काँग्रेसच्या वतीने तेलीखुंट चौकात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांनी रिकामे हंडे घेवून सहभाग घेतला.

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील पाणीपट्टीत सुमारे एक हजार रुपयांनी दरवाढीची शिफारस केली आहे. याच्या निषेधार्थ शहर युवक काँग्रेसच्या वतीने तेलीखुंट चौकात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांनी रिकामे हंडे घेवून सहभाग घेतला. पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, जेवढे दिवस नळाला पाणी येते, तेवढ्याच दिवसांची पाणीपट्टी आकारण्याची मागणी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गौरव ढोणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मुबीन शेख, गणेश भोसले, अमित चव्हाण, मयुर पाटोळे, सागर आडसुळ, पप्पू साळवे, मयुर उन्हाळे आदींनी सहभाग घेतला़ युवक काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरात चार ते पाच वर्षापासून दिवसाआड पाणी पुरवठा चालू आहे. ३६५ दिवसांची पाणीपट्टी आकारुन १५० दिवसांचेच पाणी देण्यात येते. याप्रमाणे पाणीपट्टी देखील १५० दिवसांचीच आकारण्यात यावी. पाणी पुरवठा योजनेचा खर्च व उत्पन्न याचा मेळ घालण्यासाठी पाणीपट्टी वाढ हा पर्याय नसून, शहरातील बेकायदा नळ कनेक्शन शोधणे व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे, बोगस नळ कनेक्शन नियमीत करावेत, पाणी पुरवठा व्यवस्थेचे वॉटर आॅडिट करावे, बेकायदा व बोगस नळ कनेक्शनला जबाबदार असणा-या पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी व अधिका-यांवर आयुक्तांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. पाणीपट्टीतील प्रस्तावित दरवाढ मागे घेऊन नगरकरांना सुरळीत पाणी पुरवठा करावा, अशी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाcongressकाँग्रेस