शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संशोधकांना या वर्षीपासून पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST

राहुरी (जि. अहमदनगर) : शेतकऱ्यांचे कष्ट कमी करता येतील, उत्पादन आणि उत्पन्न कसे वाढवता येईल, यासाठी चांगले संशोधन होणे ...

राहुरी (जि. अहमदनगर) : शेतकऱ्यांचे कष्ट कमी करता येतील, उत्पादन आणि उत्पन्न कसे वाढवता येईल, यासाठी चांगले संशोधन होणे आवश्यक आहे. शेतकरी म्हणजेच अन्नदेवतेसाठी असे संशोधन करणे हे पुण्याचे काम आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी यावर्षीपासून उत्तम प्रतिचे कृषी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित आढावा बैठकीत कृषिमंत्री भुसे यांनी ऑनलाइन उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विद्यापीठाचे कुलगुरू पी.जी. पाटील, शरद गडाख, विकास पाटील उपस्थित होते.

भुसे म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शेतकऱ्यांसाठी कार्य फार मोठे आहे. पण यापुढे नावीण्यपूर्ण संशोधनाला चालना देणे गरजेचे आहे. कमी खर्चाचे आणि शेतकऱ्यांना शेतीवर वापरता येईल, अशी सूक्ष्म सिंचन पध्दती विकसित होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा विद्यापीठाच्या बियाण्यावर विश्वास असून त्याची मागणी वाढली आहे. विद्यापीठांनी जास्तीत जास्त बियाण्यांचे उत्पादन वाढवावे. उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनाला चालना द्यावी. कमी दरात उच्च प्रतिचे बियाणे शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पिकाच्या उत्पादकतेबरोबर पोषकता वाढण्यासाठी संशोधनात भर द्यावा. नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांशी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने समन्वय ठेवावा. परदेशी भाजीपाला व फळ यावर कृषी विद्यापीठांनी संशोधन करावे. बाजारपेठेच्या मागणीनुसार वाण विकसित करणे, परदेशी पिकांचा संशोधनात आंतरभाव करणे व त्याचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

..............

रिक्त जागा भरण्यास परवानगी द्या

कुलगुरू पी.जी. पाटील म्हणाले, कृषिमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार कृषी विद्यापीठामध्ये विविध संशोधन, शिक्षण व विस्तार कार्य प्रगतीपथावर सुरू आहे. विद्यापीठाच्या संशोधनाला गती देण्यासाठी बंद झालेला विद्यापीठ आकस्मिक निधी पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे. विद्यापीठ मॉडेल ॲक्ट अंमलात आणला तर कृषी विद्यापीठांना सहाय्य होईल. विद्यापीठातील ५० टक्के जागा रिक्त जागा भरण्यास शासन स्तरावर परवानगी मिळावी.

.............

विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी दिले ६५ लाख

कोविड आपत्तीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्यावतीने ६५लाख रुपयांचा धनादेश चार हजारचा धनादेश कुलगुरू पी. जी. पाटील यांचे हस्ते यांचे हस्ते कृषिमंत्र्यांना सुपुर्द करण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे संचालक फलोत्पादन कैलास मोते, विशेष कार्य अधिकारी रफिक नायकवाडी, सुधाकर बोराळे उपस्थित होते.

280621\1612-img-20210628-wa0078.jpg

कष्टकरी शेतकर्यांसाठी संशोधन करणे हे पुण्याचे काम

- कृषि मंत्री. दादाजी भुसे